नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात सोशल मिडीयाचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा एकदा डाऊन झाले आहेत. जगभरातील युजर्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकत नाहीत. दरम्यान १८ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे वृत्त देखील ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स डाऊन झाल्याने अनेक युजर्स चिंतेत आहेत. डाउन डिटेक्टरच्या म्हणण्यानुसार, फेसबुकच्या शेकडो युजर्संनी आज (दि.१५) या ॲप्समध्ये प्रवेश करताना समस्या नोंदवल्या. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्षणीय व्यत्यय आले, युजर्संना पृष्ठे लोड करण्यात आणि अॅप्समधील वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यात मोठ्या प्रमाणात समस्या आल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत खुलासा (Facebook, Instagram down) करण्यात आलेले…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच राज्यातील मराठी अभिनेते श्रेयस तळपदेचा आगामी चित्रपट कर्तम भुगतमची चर्चा होत असताना त्याने एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. निवडणुकीच्या वलयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन मनातील भावना व्यक्त केल्या. सध्या राजकीय परिस्थितीत मोदी निवडून येण्यासारखे वातावरण असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे. विचारलेल्या प्रश्नावर श्रेयसने उत्तम उत्तर दिल्याने त्याची चर्चा होताना दिसतेय. श्रेयस तळपदे काय म्हणाला? श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितले की, “सध्या देशातील राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. त्यांचं मला विशेष कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशात विकासकामे करत आहेत. ते आधी…
अमळनेरः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर न्यायालयातील न्या. पी. आर. चौधरी यांनी दिला. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल संतोष भागवत याने दि. ४ फेब्रुवारी रोजी वर्गाला खेळण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी पिण्यासाठी आली असता, सुनिल भागवत यांनी त्या मुलीचा हात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी शिक्षक त्या मुलीच्या घरी जावून त्याने तिच्या पालकांचा मोबाईल क्रमांकावरुन तिच्यासोबत अश्लिल…
जळगाव मिरर | १५ मे २०२४ तक्रार देण्यासाठी आलेल्या दिनेश दिलीप मांडोळे याने पोलिस ठाण्यात गळफास घेण्याची धमकी देत पोलिसांसोबत वाद घातला. तसेच रात्रीच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून देण्याची धमकी देत शांततेचा भंग केल्याची घटना घडली होती. सोमवार दि. १४ रोजी पुन्हा मांडोळे याने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिक नगरातील दिनेश दिलीप मांडोळे हा तरुण दि. १३ मे रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात आला. यावेळी त्याचया बरगळीजवळ जखम झालेली असल्याने त्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याची आई आशाबाई मांडोळे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आडगाव येथील पिंप्री प्र. दे. येथील शेतकरी रघुनाथ मांगो पाटील यांच्या शेतात बांधलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्याचवेळी बाजूच्या मुख्य रस्त्यावर वाहन आले. त्यामुळे या बिबट्याने पळ काढला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच शिवारात एका मादीने दोन बछड्यांना जन्म दिला होता. तेव्हापासून या शिवारात अनेक मुक्या प्राण्यांचा जीव गेल्याने शिवारात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस आधी बिबट्याच्या हल्ल्यात हरिण आणि तीन मोरांचा मृत्यू झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी या परिसरात बिबट्याला वावरताना प्रत्यक्ष पाहिले आहे. सकाळी वासरावर झालेल्या हल्ल्यानंतर या बाजूला कालव्याच्या मोरीचे काम करणारे…
अमळनेर : प्रतिनिधी मजा घेऊ नको सांगितल्याचा राग आल्याने एकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना दि. १२ रोजी विद्याविहार कॉलनीत घडली. अंकित चंद्रकांत देशमुख हा १२ रोजी रात्री विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत होता. त्यावेळी रवींद्र ऊर्फ विश्वनाथ पीतांबर पाटील आला. आणि त्याने अंकितच्या आईच्या नावाने गंमत सुरू केली. आईच्या नावाने गंमत करू नको, असे सांगितल्याचा रवींद्रला राग आला. त्याने अंकित याला लोखंडी रॉडने मारहाण केली. अंकित हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून रवींद्र पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेकॉ प्रमोद पाटील करीत आहेत.
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना चालकाचा तोल जाऊन पडल्याने रोटावेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी येथील विजय जानकीराम कोळी (३५) हे मंगळवारी रोटावेटर करीत होते. तोल जाऊन मागे पडल्याने ते रोटावेटरमध्ये अडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत केतन रेवा फालक यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५९ दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही कारवाई आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागातून उन्हाळी विशेष अशा १०६ प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या काळात तर तिकिटांचा अधिकच काळाबाजार होतो. त्यामुळे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध रेल्वे विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ विभागाच्या डीआरएम इती पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, प्रवाशांनी एजंटांना जादाचे पैसे मोजून तिकिटे खरेदी करू नयेत, असे आवाहन रेल्वे…
मेष : धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. वृषभ : परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची…
नांदगाव : वृत्तसंस्था नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले.मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे…

