Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते कुसुंबा दरम्यान रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश घनश्याम सोनार (वय २६) हा कुसुंबा गावात आई आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. तो जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री उशीर सर्व काम आटोपून गणेश हा रात्री दहाच्या सुमारास जळगाववरून कुसुंबा येथे घरी जाण्यासाठी निघाला. मात्र जळगाव- संभाजीनगर महामार्गावरील विमानतळाजवळ आला. दरम्यान रात्रीच्या अंधारात महामार्गावरून दुचाकी चालवीत असताना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान आज (सोमवार) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडावर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटकांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले…

Read More

बोदवड  : प्रतिनिधी गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा सुरू केली. पावसाळा सुरू झाला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार सात आठ महिने अगोदर पासुन मेहनत घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड येथील संतोष मंगळकर, विनोद मायकर, समाधान मंगळकर यांच्या गणेश मुर्ती घडविण्याच्या कारखान्याला भेट दिली आणि मुर्तिकारांशी संवाद साधुन त्यांच्या कले विषयी आणि या व्यवसायातील समस्यां विषयी जाणून घेतले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, गणेश मुर्तिकारांची रोजी-रोटी या व्यवसायावरच अवलंबून आहे. वर्षातले सहा-सात महिने…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शिरसाळा मारोती मंदिर येथे नवस फेडण्यासाठी जाणारे चारचाकी माल वाहतुक वाहन हतनूर ते फॅक्टरी मार्गावर पलटी झाल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना आज रविवार दि. ७ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सुर्यवशी कुंटूबातील मनोज ज्ञानेश्वर सुर्यवंशी याचा एक वर्षीय बालकाचा नवस फेडण्यासाठी शिरसाळा मारोती मंदिर येथे जात होते. आडगाव येथून बोलेरो पीकअप वाहतूक वाहन क्रमाक एम एच १५ एफ व्ही २९०२ मध्ये कुटूंबासह वाहनात नवसाचे साहित्य घेऊन सकाळी ८ वाजेच्या सुमारास निघाले मात्र प्रवासा दरम्यान हतनूर फाटा ते वरणगाव फॅक्टरी मार्गावर एका चहळ उतारा ठिकाणी चालक राजेंद्र पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पतीच्या विवाह बाह्य संबंधाला विरोध केल्याचा राग आल्याने पतीकडून पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नीच्या डोक्याला टाके पडले असून उजवा हात फॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोकलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अयोध्या नगरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून याबाबत विवाहितेला माहीत झाले. विवाहितेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला असता, त्याचा राग आल्याने दि. ४ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पतीने पत्नीला शिवीगाळ करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गतीरोधकावरुन दुचाकी उधळून दुभाजकावर आदळल्याने महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी, ह. मु. एमआयडीसी) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुनसगाजवह घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत राहणारा महेश रमेश माळी हा आई, वडीलांसह काही वर्षांपुर्वी याठिकाणी वास्तव्यास होता. परंतु काही वर्षांपुर्वीच त्याने कुटुंबियांना एमआयडीसी परिसरात स्थलातंर केले होते. एमआयडीसी पसिरातील एका दाल मिल कंपनीत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी यावल रस्त्यावर हरियालीजवळ दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (वय २१) हा जागीच ठार झाला. सविस्तर वृत्त असे कि, दि. ७ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास यावल-चोपडा रस्त्यावर चोपडापासून ३ कि.मी. अंतरावर हरियालीजवळ चोपडाकडून माचला येथे जाणाऱ्या दुचाकीस्वारास मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात कुलदीप अशोक पगारे (२१, माचला, ता. चोपडा) या युवकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरा सुखरूप बचावला. अपघात करणारा ट्रकचालक पसार झाला आहे. या युवकास माचला येथील नितीन निकम, शिक्षक सतीश बोरसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. मयताच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खंडेरावनगर परिसरामध्ये नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय बालक हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरामध्ये शनिवारी दुपारी १ ते ५ या वेळेमध्ये दमदार पाऊस पडला. खंडेरावनगरमधील नाल्याजवळ काही मुले खेळत असताना, त्यात सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठलनगर, जळगाव) हा चेंडू घेण्यासाठी गेला असता नाल्यात वाहून गेला होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक तरुण व अग्निशमन दल, मनपा प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रेल्वेतून प्रवास करताना धावत्या रेल्वेतून पडून, वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परप्रांतीय तरुणाचा रविवारी सकाळी ६ वाजता माहेजी रेल्वेस्थानकाजवळ तर एका प्रौढाचा भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील आउटरजवळ मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांबाबत रेल्वे पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सोनाराम सोरेन (वय ४०, रा विष्णूवेडा, पोस्ट खुडीसर पितोड, जि. घिरडी, झारखंड) हा तरुण मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला होता. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता सोनाराम हा त्याचा मित्र मुसुदन टुडू याच्यासोबत मुंबईहून झारखंडकडे जात असताना माहेजी रेल्वे स्टेशनजवळ तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मयत सोनाराम हा मुंबई येथील…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूरनजीक सोनाळा फाट्याजवळ रविवारी सकाळी ९:१५ वाजता जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह ११ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. जखमी प्रवासी हे बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही जीप जामनेरहून पहूरकडे येत होती. सोनाळा फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह अकरा प्रवासी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांच्यासह नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा हे रस्त्याने असताना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व सोबतचे इरफान शेख यांनी जामनेरकडे जाणाऱ्या…

Read More