नागपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निराश होऊ नका, मी तीन महिन्यांत महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. ते नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला. आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली. त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे, आता मी तीन महिन्यात आपले सरकार आणतो. आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर मोसमी पाऊस विश्रांती घेणार आहे. 9 आणि 10 तारखे नंतर राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकरी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असून, यामुळे खरीपच्या पीकांचे नुकसान होत आहे. दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन, नांगरणी, फवारणी ही कामे देखील करता येत नाहीत. शेतांमध्ये गवत वाढले आहे.…
जळगाव : प्रतिनिधी फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी एका तरुणाने आपल्या मित्राला फोनवर ‘मित्रा माझा हा तुला शेवटचा फोन आहे, यापुढे माझा तुला कधी फोन येणार नाही. मी तुला पुढे त्रास देणार नाही’… असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. किरण रमेश शिंपी (वय २२, रा. शिंदी, ता. भडगाव, ह.मु, रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. किरण शिंपी हा तरुण आई, भाऊ आणि वहिनीसोबत भडगाव तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्याला होता. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका ठिबक कंपनीत कामाला होता. तसेच रामेश्वर कॉलनीत एका भाड्याच्या रूममध्ये तो…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी सुरू आहे. पोलिस प्रशासनातर्फे वारंवार कारवाई होत आहे. असे असली तरी गुटखा तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्करी करणारी एक कार पकडली. या कारमध्ये ५ लाखांचा गुटखा आढळला. गुटख्यासोबतच ७ लाखांची कारही जप्त केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सोमवारी सकाळी आमदार चारठाणा येथे जात असताना त्यांच्या सुरक्षारक्षकाने एक संशयास्पद जात असलेले वाहन अडवले असता त्या वाहनात अवैधरीत्या गुटखा तस्करी होत असल्याचे आढळून आले. यानंतर हे वाहन (एम. एच. ०२/ बीएम…
जळगाव : प्रतिनिधी पोलिस ठाण्याच्या आवारात साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विषारी औषध गेल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय दिलीप गोयर (वय ३९, रा. पहूर, ता. जामनेर) असे मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विजय दिलीप गोयर हे आई, पत्नी, दोन मुलं यांच्यासह पहूर येथे वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून पहूर पोलिस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारात स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे त्यातील…
जामनेर : प्रतिनिधी गेल्या चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीला घरगुती वादातून लाकडी दांड्याने मारहाण करत पतीने ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी या महिलेचे नातेवाईक गोद्री येथे पोहोचले त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. विशाल चव्हाण नावाच्या पतीसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, काजल चव्हाण (१८, रा. गोद्री, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. मुसळी फाटा (ता. धरणगाव) येथे तिचे माहेर आहे. यंदा २८ एप्रिल रोजी तिचा विवाह विशाल याच्याशी झाला होता. रविवारी रात्री पती-पत्नीत घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन विशालने काजलच्या तोंडावर व नाकावर…
मेष राशी दिवसाची सुरुवात तणावाने होऊ शकते. नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. संयम ठेवा. अन्यथा केलेले काम बिघडू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामासह इतर जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस वाटेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी राजकारणात रुची वाढेल. एखाद्या कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त धावपळ करावी लागेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास घातक ठरू शकतो. कुटुंबात काही सुखद घटना घडू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची बातमी मिळेल. ऑटोमोबाईल उद्योगाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश…
रावेर : प्रतिनिधी जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरु आहे. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील एका घराची भिंत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने कुटुंबातील सर्व बचावले मात्र काही सदस्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी हे त्याठिकाणी पोहचले. कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य आणि काही आर्थिक मदत दिली. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणाऱ्या बाळू भगवान सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसली…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेत चक्कर येऊन पडल्याने नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला हा नऊ वर्षाचा विद्याथ शिकत होता. आज सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. मयत फुलसिंग बारेला हा हिंगोणा येथील रहिवासी होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अजून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पवन…

