मेष राशी आज आप अफवांवर लक्ष देऊ नका. निरर्थक पूर्वग्रहांपासून दूर रहा. आजूबाजूच्या लोकांवर लगेच विश्वास करण्याची सवय सोडा. वरिष्ठांच्या मदतीने आपल्या कार्यालयात आपली जागा टिकवून ठेवा. भौतिक सुविधा आणि साधनसंपत्ती वाढवा. तथ्यात्मक सौद्यांना आणि करारांना चालना द्या. आपल्या संपर्काचा व्यास वाढवा. आपल्या जवळच्या लोकांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी आज तुम्ही सर्वांशी चांगला संवाद साधण्यात यशस्वी व्हाल. सकारात्मक बदल आणि सुधारणांना वेग मिळेल. सामाजिक प्रश्नांमध्ये तुम्ही प्रभावी राहाल. नातेवाईकांसोबत सुखकर वेळ घालवाल. तथ्यात्मक गोष्टींवर भर द्याल. तुमची बुद्धिमत्ता अधिक चांगली राहील. इतरांच्या बोलण्यात येणार नाही. जबाबदार लोकांशी भेट होईल. भेटवार्ता आणि प्रभाव कायम राहील. आत्मविश्वासाने पुढे जाणार. कला…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली आणि एक्स्प्रेस वेच्या खाली खड्ड्यात पडली. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इटावा एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी अपघाताची माहिती दिली. रायबरेलीहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस रात्री साडेबारा वाजता एका कारला धडकली. बसमध्ये ६० लोक होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०-२५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला.…
जळगाव : प्रतिनिधी उसनवारीच्या पैसे मागितल्याच्या कारणावरुन अविनाश किशोर जोशी वय २५, रा. संजय गांधी नगर, या तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घडली होती. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी विजय उर्फ भूरा मधुकर जोशी या संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांच्या मागावर पथक रवाना झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, संजय गांधी नगरात अविनाश जोशी हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळील विजय उर्फ भूरा जोशी याने अविनाश जोशी याच्याकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले होते.…
धरणगाव : प्रतिनिधी मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर एकाने अत्याचार केला, तर दोघांनी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिकेत जिजाबराव पाटील याने पीडितेसोबत मैत्री केली. दोघे जण फोनवर बोलत असत व सोशल मीडियावर मॅसेज करत असत. दरम्यान, पीडिताला घरी एकटी असताना जून २०२४ मध्ये तीनवेळा घरात येऊन जबरदस्तीने संबंध ठेवले, तसेच गावातील धीरज भाऊसाहेब पाटील, नीलेश ऊर्फ बाळा मनोहर पाटील, हिरालाल ऊर्फ बाळा शांताराम पाटील यांनी पीडिता घरात एकटी असताना घरात घुसून धमकी दिली. कोणास काही सांगितल्यास नवऱ्यास जिवे मारण्याची…
जळगाव : प्रतिनिधी आजाराला कंटाळून अश्विनी प्रकाश पाटील (१८, रा. कासमवाडी) या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अश्विनी पाटील ही कासमवाडी परिसरात आई, वडील, दोन भावांसह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खासगी वाहनांवर चालक आहे. काही दिवसांपासून तिला आजार होता. त्यामुळे ती तणावात होती. शनिवारी (३ ऑगस्ट) घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला जीएमसीता दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव मालेगाव रोडवरील हॉटेलजवळ चाळीसगावकडून मालेगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृतांची ओळख पटलेली नाही. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. घटना घडताच पिकअप वाहनचालक वाहनासह पळून जात असताना पोलिस व नागरिकांनी त्याचा पाठलाग करीत बेलगंगा साखर कारखान्याजवळ पकडले. मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास पिकअप वाहनचालकाने भरधाव वेगाने मालेगावकडून चाळीसगावकडे येत असताना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेलसमोर चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास जोराने धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्यास जबर मार लागून तो जागीच ठार…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत. मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (१६, दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (१४, रा. रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता; तो दोन दिवसांपूर्वीच मालेगावहून पारोळा येथे आला होता. सविस्तर वृत्त असे कि, बडा मोहल्ला भागातील मुले शनिवारी दुपारी भोकरबारी धरणाकडे गेले होते. तिथे…
मेष राशी प्रेमी युगुलांमधील गैरसमज दूर होतील. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबांपासून थोडा काळ दूर राहावं लागणार आहे. नव्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्याची अंमलबजावणी आतापासूनच करा. जमीन जुमल्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज कामाचा व्याप असेल. सकारात्मक भूमिका, आत्मविश्वास यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. वृषभ राशी प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी अनुकूल दिवस. आज तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तुम्ही नेहमीच पर्यटनाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असता. आजपासून तुमच्या या रोजनिशीला सुरुवात होणार आहे. व्यवसायात आज मोठी देवाणघेवाण होईल. आज तुम्ही जे काम कराल ते यशस्वी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा- खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून “धर्मवीर – २” चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली असून आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून “धर्मवीर – २” ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकहीं करण्यात आले होते. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला “धर्मवीर २” हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत…

