Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पुणे येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, एक तर तू राहशील किंवा मी राहिल, असे आवाहन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुण्यात दरोडा टाकून पसार झालेल्या जितेंद्र उर्फ जितू प्रदिप वाघ वय ३२, रा. वाघनगर, भूषण गोकुळ कोळी वय २७, रा. समता नगर व चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख वय २३, रा. महाबळ या तिघ संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कानळदा येथून मुसक्या आवळल्या. सविस्तर वृत्त असे कि, पुणे येथील चतृः श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेले संशयित हे कानळदा गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोकॉ रविंद्र कापडणे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने सापळा रचून कानळदा ते भोकर रस्त्यावर गावाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशाच्या वादातून एका तरुणावर तीन जणांनी पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमी झालेल्या तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या वय २८, रा जोशी कॉलनी जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे या नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशावरून झालेल्या वादातून एक अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या या तरुणावर अज्ञात तीन जणांनी धारदार शास्त्राने छातीवर व पोटावर वार करून गंभीर दुखापत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून संजय बापू पाटील (४२, रा. धानवड, ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२ ऑगस्ट) उमाळा शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धानवड येथील शेतकरी संजय पाटील यांचे उमाळा शिवारात शेत आहे. शुक्रवारी सकाळी ते पत्नी, भावजयी व पुतणीसह शेतातील पाणी काढण्यासाठी गेले होते. यासाठी मोटार सुरु करण्यासाठी पाटील हे गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मजुरांच्या मदतीने पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील जयेश वासुदेव महाजन (माळी) (२०) हे त्यांची मालवाहू वाहन घेऊन जळगावात आले होते. त्यांनी दाणाबाजार परिसरात त्यांचे उभे केले. त्या वेळी चालकाच्या सीटच्या मागील पाकिटामध्ये २५ हजार रुपये ठेवलेले होते. चोरट्याने ही रक्कम लांबविले. महाजन पैसे घेण्यासाठी गेले त्या वेळी ही चोरी लक्षात आली. त्यांनी शोधाशोध केला, मात्र रक्कम सापडली नाही. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों किशोर निकुंभ करीत आहेत.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भरधाव डंपरने चारचाकीला धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनसगाव जवळ झाला. सविस्तर वृत्त असे कि, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी वाहनाने शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी जळगाव येथे येत होते. त्यावेळी सुनसगाव नजीक त्यांच्या चारचाकी वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये चारचाकीमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष बावस्कर (५२), कारकून रामदास मोरे (५०), प्रकाश सोनार (४०), चालक कैलास सुशीर (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना सुशीर (३१) यांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. सोम रहिम पवार (१४) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चार ओळींची सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे. त्यात वरील उल्लेख केला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  जळगावनजीक वाघाची कातडी जप्त करण्यात आल्याची घटना २७ जुलै रोजी घडली होती. यात सहा जणांना वनविभागाने अटक केली होती. यात सोम याचे वडील रहिम रफीक पवार (४०) आणि आई तेवाबाई पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचाही समावेश होता. या गुन्ह्याच्या…

Read More

मेष राशी तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्यावर जळतील. पण खटपटी करूनही त्यांना तुमचं काहीच करता येणार नाही. कारण ते तुमच्या बाजूने असतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाल. त्यामुळे तुमचा सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. नोकरीत तुमच्यावर ताण असेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी नवीन कोर्सला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. मनपसंत ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. वृषभ राशी आजचा दिवस शुभ राहणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी दिवस घालवाल. तुम्हाला मनपसंत जेवणाचा आनंद घेता येईल. आज दुपारी तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते. तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. समाजात तुमचा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी चांगलेच रान पेटविले होते मात्र आता मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितले आहेत. गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, राज्यांना नाव बदलण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती ह्रषिकेश रॉय आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे आणि महसूल विभागांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाने निर्णय घेतला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे…

Read More