चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारें आमदार मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” हा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार दि.७ जुलै रोजी वैश्यवाणी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समारंभाला राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे यंदा राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता ब्राह्मण समाज सभागृह बळीराम पेठ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाला बळ देत करिअरच्या पुढील वाटा सुकर होण्यासाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुणगौरव सोहळ्याची संकल्पना वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे चेतन वाणी, भुषण वाणी, राकेश वाणी यांची असून नियोजन समितीचे योगेश शेटे, पुरुषोत्तम शेटे, संजय शेटे, योगेश…
इगतपुरी : वृत्तसंस्था राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना कसारा जवळ घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडहुन मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी एक्सप्रेसने शनिवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक कपलिंग तुटली. यामुळे इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघुन गेली तर बाकी पंचवटी एक्सप्रेसच्या बोग्या मागे राहिल्या. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने इंचिन थांबवून पुन्हा इंजिन मागे आणून बाकी बोग्यांना जोडण्यात आले. यानंतर ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना…
जळगांव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातून बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षापासून आक्रमक पवित्रा घेत असतांना नेहमीच दिसून येत आहे मात्र आजपासून पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, ”हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ नारायण सपकाळे (वय-३०) रा. किनोद ता.जि. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, गोपाल सपकाळे हा आई पत्नी दोन मुलांसह विनोद गावात वास्तव्याला होता. शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली…
धरणगाव : प्रतिनिधी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, फुलपाट येथील तरुण दत्तू प्रकाश पाटील (वय ३५) हे आपली दुचाकी (एमएच – १९, बीटी – १०१५) ने दुपारी ५ वाजेचा सुमारास काम आटोपून घरी चालले होते. याच वेळी महामार्गावरून भरधाव वेगाने डंपर (एमएच १९, झेड-३७५१) हा जळगावकडे जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून डोक्याला गंभीर इजा व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार…
भडगाव : प्रतिनिधी कजगाव चाळीसगाव मार्गावरील वळण रस्त्यावर दि. ४ च्या रात्री १० वाजता चारचाकी कारचा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानेच हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते चांदवड हा महामार्ग गेल्या चार वर्षांपासून नव्याने बनला आहे.मात्र या महामार्गावर अडथळे कायम आहेत. कजगाव-चाळीसगाव मार्गावर पाटील नगर जवळ मोठे वळण आहे. या वळणावर दिशादर्शक फलक व रात्रीचे इंडिकेटर लावणे गरजेचे आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने या वळणावर गेल्या चार वर्षात अनेक अपघात झाले आहेत. याच वळणावर चालकाने समयसूचकता दाखवल्याने दि.४ रोजी मोठा अपघात टळला. भाजप शहर अध्यक्ष रवींद्र…
जळगाव : प्रतिनिधी त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४ या कालावधीतील शासनाकडे पाठपुरावा केला होता. तथापी ४६ वर्ष लढा देवुनही या कर्मचा-याना शासनाकडुन न्याय मिळालेला नव्हता. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गांभीर्य पूर्वक ऐतिहासिक निर्णय घेवून राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील हातपंप/विजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गातील १०७४ कर्मचाऱ्यांच्या वेतन/निवृत्तीवेतनाचा…
धरणगाव : प्रतिनिधी गुलाबरावजी पाटील साहेब फाउंडेशन यांच्या सहकार्याने धरणगाव शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम धरणगाव शहरात दिनांक : ५ जुलै २०२४ शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय आदर्श विद्यालय परा विद्यालय या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे युवा नेते माजी जि.प.सदस्य श्री.प्रतापराव पाटील यांनी सांगितले की मंत्री महोदयांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदार संघात अनेक वर्षापासून मोफत वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना विठुरायांचे दर्शन घेण्याकरिता बसेस मधून त्यांना…

