Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सुरु असतांना आज पहाटे जळगाव जेलमधील एका आरोपीची काही तरी वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणाला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दत्तू प्रकाश पाटील (वय ३४, रा. फुलपाट, ता. धरणगाव) हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ जुलै रोजी घडली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरु असतांना चार दिवसानंतर त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात दत्तू पाटील हा तरूण आईवडील, पत्नी, भाऊ आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. टाकरखेडा येथील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होता. दैनंदिनीप्रमाणे शुक्रवारी ५ जुलै रोजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले खलील शेख अय्युब मणियार (वय ४५, रा. वराडसीम, ता. भुसावळ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना दि. ८ जुलै सोमवारी गोदावरी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील वराडसीम खलील शेख अय्युब मणियार हे दि. ८ जुलै रोजी सोमवारी भुसावळकडे जात होते. यावेळी त्यांना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकोद येथील १० मजूर फर्दापूर शिवारात शेतात काम करीत असताना मका पिकाच्या कीटकनाशकाच्या स्पर्शातून त्यांना विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून जळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यात सर्व महिला मजुरांचा समावेश आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई तेजराव जोशी (६५), सुनीता अशोक जोशी (३५), ज्योती विलास जोशी (३०), माधुरी शिवाजी जोशी (१६), उर्मिला शिवाजी जोशी (२५), छायाबाई गजानन जोशी (२८) पूजाबाई विजय जोशी (३०), उषाबाई संतोष जोशी (३५), मंगलाबाई शिवाजी जोशी (४०), गुंफाबाई उत्तम जोशी (२७ , सर्व वाकोद) हे फर्दापूर शिवारातील शेतात मजुरीसाठी गेले, यादरम्यान मका पिकाच्या पोंग्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुचाकी काढत असताना तिचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी विक्की सुनील सोनवणे (२४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शिवीगाळ करीत मारहाण केली. या तरुणाच्या – डोक्यावर व पाठीवर दगड, फरशीचे तुकडे मारल्याने त्याला दुखापत झाली आहे. ही घटना ७ जुलै रोजी भजे गल्लीतील एका हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, विक्की सोनवणे हा तरुण ७ जुलै रोजी, भजे गल्लीत मित्रांसह बसलेला होता. तो त्याची दुचाकी काढत असताना दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून त्याला दुसऱ्या दुचाकी चालकाने शिवीगाळ केली. याचा तरुणाने जाब विचारला असता त्याला…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी निमखेडी खुर्द येथील प्रसाद गजानन काळे (वय १९) हा आयटीआय झाल्यानंतर झारखंडमधील बिलासपूर येथे रेल्वेत अप्रेंटिसशिप (शिकावू) पदावर काम करीत असताना वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ९ जुलै रोजी घडली. सविस्तर वृत्त असे कि, प्रसाद गजानन काळे हा बिलासपूर (झारखंड) येथे रेल्वेत नुकताच शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला होता. मंगळवारी त्याला वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी रेल्वेचे फिल्टर बदलण्याची जबाबदारी दिली. याप्रसंगी वरिष्ठ तंत्रज्ञ व सहायक यांची उपस्थिती आवश्यक असताना वरिष्ठ तंत्रज्ञ तेथून दुसरीकडे गेला असता, प्रसाद याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. प्रसाद याला वाचवताना एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा तस्करी आणि विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या रमेश जेठानंद तेजवाणी (५८) व दीपक रमेश तेजवाणी (२४ दोघे रा. सिंधी कॉलनी) या दोघा पिता-पूत्राला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश दिले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश तेजवाणी व दीपक तेजवाणी हे अनेक वर्षापासून गुटख्याच्या व्यवसायात सक्रिय होते. रमेश तेजवाणी विरुद्ध चार तर मुलगा दीपक तेजवाणी याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटल, योगेश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज दि.१० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हे धक्के जाणवले आहेत. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात हे धक्के जाणवले.या धक्क्याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती. यासह…

Read More

मेष राशी प्रेम संबंधात तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. समन्वय निर्माण करण्याची गरज असेल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूलभूत भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कल्पना लादण्याचा प्रयत्न करू नका. पालकांचे वर्तन सहकार्याचे राहील. आरोग्याची काळजी घ्या इ. तुम्ही तुमच्या वागण्याने इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्हाला सामान्यतः कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य वाढेल. घरगुती समस्या सुटतील. वृषभ राशी कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा. पती-पत्नीमध्ये सामान्य समन्वय राहील. प्रेमसंबंधात वाद होतील. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात, इतरांशी विचारपूर्वक आणि संयमाने वागा. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची वागणूक प्रेमळ राहील. समाजात मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. अत्यंत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसेनंतर आता वसंत मोरे यांनी वंचितलाही रामराम केले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील मनसेचे तब्बल 23 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी मोठा धक्का असणार आहे. यावेळी बोलतांना हा माझा पक्षप्रवेश नसून मी स्वगृही परतलो आहे अशी प्रतिक्रिया मोरेंनी दिली. यावेळी बोलतांना वसंत मोरे म्हणाले, ”1993 यामध्ये पहिल्यांदा शाखाप्रमुख झालो. बारावी पास झाल्यानंतर मी शाखाप्रमुख होतो. 16 व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. माझा हा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेत…

Read More