मुंबई : वृत्तसंस्था एकीकडे चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल याचे राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गट यात सोशल मिडीयावर शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकामागे एक विकास कामांचा झंझावात सुरु असतानाच महाविकास आघाडीला धक्के देणे सुरु ठेवले आहे. बोढरे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच बंजारा समाजाचे जेष्ठ नेते श्री.रामदास रायसिंग जाधव यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तालुकाभरात रामदासभाऊ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पद…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा – सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एकाचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील रहिवासी सौभाग्य चित्तरंजन सेनापती (वय-२८) हा तरुण आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून दि.२ जुलै ते ६ जुलैच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच लोक रक्कम असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतांना नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर पनवेल येथील एमजीएम आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हौसाबाई पाटील रा. घेसर, गुरुनाथ महाराज पाटील रा. नारिवली, रामदास नारायण मुकादम रा. नावाळी, अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. अपघातानंतर मुंबई एक्स्प्रेस हायवेची मुंबई-लोणावळा लेन तीन तास बंद होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर पुन्हा वाहनांची वाहतूक…
जळगाव : प्रतिनिधी शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी ४५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करणारे कंत्राटदार अजय भागवत बढे यांना सोमवारी (१५ जुलै) तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांच्या नावाने धमकावण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या पंकज वासुदेव नेमाडेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी बढे यांच्या मोबाईलवर ‘व्ही.डी. पाटील यांना चांगले ओळखतात, तुम्ही जे केले त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. नंतर नेमाडे याने तो मेसेज डिलिट करून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जळगाव : प्रतिनिधी मुलीच्या लग्न सोहळ्यादरम्यान तिच्या आईने दागिन्यांची ‘हॅण्ड बॅग’ एका कोपऱ्यात ठेवली आणि काही क्षणात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल, रोख रक्कम असलेली बॅग लांबविली. ही घटना रविवारी (१४ जुलै) सुरभी लॉन या लग्नाच्या हॉलमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, महिला महाविद्यालयात उपप्राचार्य असलेले सतीश गुलाबराव जाधव (५२, रा. कोल्हे नगर) यांची मुलगी अचला हिचा लग्नसोहळा रविवारी औद्योगिक वसाहत परिसरातील सुरभी लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान नववधूच्या आईने त्यांचे चार लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख दोन हजार रुपये, एक मोबाईल असा…
रावेर : प्रतिनिधी घरभरणीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला बसने धडक दिली. यात महिला चाकाखाली बसच्या आल्याने चिरडून ठार झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलचे नाव आरती संदीप पाटील (३२, रा. आमोदा, ता यावल) असे आहे. याप्रकरणी बसचालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मोरगाव खुर्द (ता. रावेर) येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कन्येचा शाहपूर (मध्यप्रदेश) येथे रविवारी विवाह झाला. सोमवारी बंभाडा, जि. ब-हाणपूरला घरभरणीचा कार्यक्रम आटोपून संदीप सीताराम पाटील व आरती पाटील हे दाम्पत्य मोटारसायकलने (एम. एच. १४/ए क्यू ११९६) आमोदा येथे जात असताना रावेरनजीक बालाजी टोलनाक्यासमोर भरधाव…
मेष राशी आज प्रेमसंबंधांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. वाद शांततेने सोडवा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये वैवाहिक सुखाची कमतरता जाणवू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सामाजिक कार्यात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. तुमच्या कामाने लोकांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही नवीन मित्र बनवाल. वृषभ राशी आज मित्राकडून मनोबल मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्याबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल. तुम्ही मित्रांसोबत मजा करायला उत्सुक असाल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमच्या पालकांचा…
जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी हे अत्यंत महत्वाचे होते. म्हणून गेल्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी DPDC च्या माध्यमातून 15 कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांच्या हस्ते सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मोड्युलर आय. सी. यु. आणि मोड्युलर ऑपरेशन थियटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा.…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील विविध धरणे, नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नाशिकमधून देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजनेरी गडावर रविवारी दहा पर्यटक अडकून पडले होते. मात्र आता अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १० पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे पर्यटक अंजनेरी गडावर फिरायला आले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. मात्र…

