धरणगाव : प्रतिनिधी शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाचे पैसे लांबवून पलायन करणाऱ्या दोन युवकांना धरणगाव पोलिसांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, वाघळूद बुद्रुक येथील अशोक त्र्यंबक पाटील (७६) हे १६ हजार रुपये घेऊन धरणगाव येथील बैल बाजारात बैल घेण्यासाठी आले होते. परंतु बैल पसंत न पडल्याने ते धरणगाव बस स्थानकातून पिप्री खुर्दकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये गायब आहेत. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांना दोन युवक पळताना दिसले. त्यांनी आरडाओरड केली असता बस स्थानकावर हजर असलेले हवालदार संजय सूर्यवंशी व समाधान भागवत यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. धरणगाव बस स्थानकामागील अर्बन बँकेजवळ त्यांना…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गुजरात येथील वलसाड शहरातील जलाराम इंडस्ट्रियल पार्क परिसरात एका व्यक्तीचा खून करून पळालेल्या पती-पत्नीला जळगाव स्टेशन येथील रेल्वे पोलिसांनी अमदाबाद-हावडा एक्स्प्रेसच्या सामान्य डब्यातून प्रवास करताना गुरुवारी सकाळी दहा वाजता पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, विकास उर्फ बुधन मांझी, वय-३० वर्षे, पत्ता-कुन्हाडीह, पोस्ट मथुरापूर, बिहार, व चंपा देवी, (वय-३४) अशी या दोघा संशयितांची नावे असून त्यांना गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहित कुमार, कॉन्स्टेबल पंकज वाघ, एसपी गिरी आणि सीआयबी भुसावळचे कर्मचारी एएसआय शिवानंद गीते यांनी ही कारवाई केली.
अमळनेर : प्रतिनिधी बाजाराला सोबत नेले नाही, या कारणामुळे पिळोदे (ता. अमळनेर) येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घटना गुरुवारी घडली आहे. माया सुधाकर कोळी (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदे येथील मालूबाई सुधाकर कोळी बाजार करण्यासाठी अमळनेर जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मलगी माया ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र, मालूबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई बाजाराला गेल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत…
मेष राशी तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून काही शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल. उद्योगातील अडथळे दूर होतील. परदेशी किंवा लांब सहलीला जाऊ शकता. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व साहित्य मिळेल. बौद्धिक कार्यातून लोकांना आर्थिक फायदा होईल. आध्यात्मिक कार्यातून आर्थिक लाभ होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. वृषभ राशी आईशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. किंवा तुम्हाला दूर जावे लागेल. कार्यक्षेत्रात आराम आणि सुविधांचा अभाव जाणवेल. काही महत्त्वाच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. प्रवासादरम्यान विरुद्ध लिंगाच्या जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल. पण घाईगडबडीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. आणि उतावळेपणा टाळा. मिथुन राशी व्यवसायात नवीन…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नाही. देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत, राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे. पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार आहेत, असे ते म्हणालेत. मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, मी एवढे रडके सरकार केव्हाच पाहिले नाही. आतापर्यंत मला देवेंद्र फडणवीस फारच हुशार…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना अनेक नेते मंडळी आपआपल्या मतदार संघातील बाप्पांच्या आरतीसाठी जात आहे. यावेळी देखील हे नेते टीका करण्याची एक हि संधी सोडत नसताना दिसून आले आहे. नुकतेच पुणे शहरातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर खा.अमोल कोल्हे यांनी विखारी टीका केली आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांच्या झालेल्या मेगा भरतीला शरीरसौष्ठव म्हणायचे की सूज, हे येत्या काळात आपल्याला कळेल. पावडर खावून बनविलेली बॉडी आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही, अशी टीका शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर केली. खासदार कोल्हे…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने जागावाटपात आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदाही झाला होता. याऊलट शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महायुतीला जबर फटका बसला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीपुढे हीच परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात असताना आता महाविकास आघाडीतही अनेक जागांवर मतभेद असल्याचे समोर येत आहे. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत 125 जागांवर मतैक्य असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली. त्यांच्या या विधानामुळे मविआत 288 पैकी उर्वरित 163 जागांवर मतभेद आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत…
जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ वसतिगृहातील एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे अमरावती येथिल अठरा वर्षीय तरुण प्रतीक विजयराव गोरडे या तरुणाने दोन दिवसा पूर्वी प्लॅस्टिक डिप्लोमा कोर्सचा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. त्याने तेथीलच वसतिगृहात प्रवेश घेवून तेथेच वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार, दि.११ रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजेचा दरम्यान त्याचा खोलीतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्या मुळे तेथील वॉर्डन यांनी खोलीत प्रवेश घेतला त्या वेळी त्यांना हा तरुण गळफास घेतला असल्याचे दिसले त्याला तातडीने विद्यापीठाचा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. या वेळी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 128 झिका रुग्णांची नोंद झाली आहेत. यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात झिका…
पुणे : वृत्तसंस्था लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षात तिच्या आईच्या घरासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रियकराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी सोमनाथ सुपेकर असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. विनायक अनिल आवळे असे पसार झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभूमीजवळ राहते. तर संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत वास्तव्यास आहे. त्याला २० वर्षांचा एक मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून विनायक आणि शिवानी…

