धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाली गल्लीतील रहिवासी संजय विठ्ठल वाणी यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.19.डी.डी ०४५४ सुमारे ४५ हजार रुपये किमतीची युनिकॉन ही दुचाकी दिनांक २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संजय वाणी यांनी धरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.रामदास पावरा हे करीत आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात तब्बल चार लाखांची घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील अयोध्या नगर परिसरातील अशोक नगर मधील उषा रेसीडन्सी मधील फ्लॅट क्रमांक ५ मधील रहिवासी सनी विकास सोनार यांच्या मालकीच्या फ्लॅटमधून दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ९७ हजार ९१५ रुपयाचे सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दिनांक ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पुढील तपास करीत…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादी तेजस्विनी धर्मराज बाविस्कर यांचे लग्न मनुदेवी आडगाव ता. यावल येथील धर्मराज रामदास बाविस्कर यांच्यासोबत झाले. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी दागिने काढून घेत सोन्याची ब्रासलेट व पाच लाख रुपये हुंडा द्यायला हवा होता म्हणून छळ सुरु केला. एप्रिल महिन्यात मुलीसह विवाहितेला माहेरी हाकलून लावले. त्यानतंर 18 डिसेंबर रोजी विवाहितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याचे समजल्याने सासरची मंडळीनी निम येथे येवून तक्रार का केली अशी विचारणा करत विवाहितेच्या वडिलांना मारहाण व शिवीगाळ करून पाच लाख रुपये…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातलाय, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. नारायण राणे लोकसभेची पायरी विसरले आहेत. पीएला काढा, नाहीतर मंत्रिपद घेणार, अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केलाय. “नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. पीएची कामं पटवापटवीची. अनेकांना पटवून गंडा घातला. मोदींच्या ते लक्षात आलं आणि वॉर्निंग दिली की, पहिले त्याला हाकलून दे, नाहीतर मंत्रीपद काढून घेणार”, असा दावा विनायक राऊतांनी केला.“नारायण राणे लोकसभेची…
जळगाव : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनानंतर सर्वच नेत्यासह आमदार आपापल्या मतदार संघात येवून पोहचले आहेत. तर राज्यात भाजपचे लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. काय म्हणाले गुलाबराव पाटील ? ‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून तरुणाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील शहा आलम नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय इमरान खान हबीब खान पठाण या तरुणाची दुचाकी घराच्या बाहेर लावलेली असताना दिनांक १ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दुचाकी एम.एच.१९.६१५८ ही ३० हजार रुपये किमतीची चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात दिनांक दोन रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोहेको प्रमोद पाटील हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणासाठीचं त्याचं योगदान चिरंतन आहे. प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी बु. येथिल ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पाटील, सरपंच प्रकाशनाना पाटील , ग्रामविकास अधिकारी दिपक पाठक, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश ठाकूर, तुषार मोरे, यशवंत पाटील, गोकुळनाना पाटील, बबलू पाटील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ…
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रेयसीच्या लग्नाला आलेल्या प्रियकराने असं काही केलं की तिथे बसलेला नवरदेवही स्तब्ध झाला. आपले काम करून प्रियकर तिथून चालत गेला. https://www.instagram.com/p/Cm5zXGzhzUT/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसले आहेत. त्यांच्याकडे पाहून त्या दोघांचाही विधी पूर्ण झाला आहे, असे वाटते. लोक आळीपाळीने त्यांना आशीर्वाद देत आहेत. इतक्यात नववधूचा कथित प्रियकर मफलर बांधून स्टेजवर येतो. तो खिशातून सिंदूरने भरलेला डबा बाहेर काढतो आणि वधूला तो सिंदूर लावायला जातो. त्याला असे करताना पाहून नवरी सुरुवातीला…
अमळनेर : प्रतिनिधी येथील खा. शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डाॅ. एम.एस.वाघ नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि.२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य-प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्हि. भलकार प्रा. सी.बी. सूर्यवंशी, संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.सुनिल पाटील व संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे, प्रा.किरण पाटील, प्रा.जी.एल. धनगर, प्रा.विलास पाटील, प्रा.सी.आर. पाटील, प्रा. आर.एस. महाजन, प्रा.पी.एम. तायडे, प्रा.एम.एन. भामरे, प्रा. लांडगे व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक बंधु- भगिनी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा.आर.एम. पारधी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. सी.बी. सुर्यवंशी यांनी केले.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ व अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये कपड्यांवरुन वाद सुरु आहे. यानंतर पुणे येथे एका पक्षाच्या नेत्याने उर्फीविरोधात तक्रार सुद्धा दिली आहे. आता या वादात आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर केला आहे. आणि भली मोठी पोस्ट लिहिली आहे. https://www.facebook.com/andhare.sushama/posts/5929303393757081 नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल. असा सवाल अंधारे यांनी उपस्थिती केला आहे.“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर…

