मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास देवीच्या मंदिरात जाऊन येते असे सांगून घरून गेल्यावर घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत कुणीतरी खुश लावून पळून नेला प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे का विनोद श्रीनाथ हे करीत आहे.
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत सोने-चांदीचे दागिने मागितल्या प्रकरणी एका विरोधात जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने त्याच्या राहत्या घरी बोलवून एकांताचा फायदा घेत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्या आईचे दागिने मला आणून दे अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेल तसेच तुझ्या भावास जीवे मारून टाकेल अशी संशयित आरोपी नितेश शंकर राठोड याने धमकी दिली या प्रकरणी २ जानेवारी रोजी जामनेर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षे विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील महावीर नगरातील २२ वर्षीय विवाहिता सुकेशनी रोहिणी मेंढे हिच्या माहेरच्यांनी आपल्या पतीला व सासूला हुंडा न दिल्याच्य कारणावरून तिला शिवीगाळ व मारहाण करीत मानसिक त्रास देऊन तिने घराच्या बाथरूम मधील लायझर नावाचे टॉयलेट क्लीनर पिल्याने ती गंभीर होवून विवाहिता उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सासू आशाबाई मिलिंद मेंढे व पती रोहित मिलिंद मेंढे दोन्ही राहणार महावीर नगर जळगाव यांच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. अजित गुजर बारेला (रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून |तिस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, गोरख बागुल, पो.ना. प्रविण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परिसरातून अजित बारेला यास गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसाआधी ट्विटर काही काळ बंद पडलेले होते. त्यानंतर नेटकऱ्यानी सोशल मिडीयावर एलॉन मस्क यांना ट्रोल केले जात होते. तर नुकतेच मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशात 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण, नग्नता आणि संबंधित पोस्ट केल्या जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही खाती 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान बंद करण्यात आली आहेत. ट्विटरने दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या 3035 खात्यांवरही कारवाई केली आहे. ट्विटरने भारतात एकूण 48 हजार 624 खात्यांवर बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भावना भडकवणाऱ्या पोस्टला आळा बसावा, या करता ट्विटरने हा…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील पाषाण परिसरात १०० रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला आहे. या घटनेप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहायला आहेत. 31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले.…
मुंबई : वृत्तसंस्था कुठलाही विषय नसताना अजितदादा छत्रपती संभाजी महाराजांवर का बोलले? याला मुद्दाम समाजातील वातावरण गढूळ करणे म्हणतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. भाजप…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांची 24 डिसेंबरपासून विरोधकांच्या टीकेवर शहाजीबापूंची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. यापाठीमागे काय होते कारण तर ते बंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यानंतर यांनी तब्बल ९ किलो वजन कमी केले आहे.ते पुन्हा एकदा नव्या जोमाने विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयार आहेत. 24 डिसेंबरपासून शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी गेले होते. त्यामुळे गेले 8 दिवस विरोधकांवर धडाडणारी ही तोफ शांत होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यावेळी सांगोल्यात आलेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदार संघात शिंदे गटाचा नियमित बोलबाला सुरूच आहे, नियमित विविध पक्षाचे कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. धरणगाव येथील रवींद्र कडरे व संजय पवार यांनी आज दि.२ रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी त्यांच्या पाळधी येथे सत्कार केला. सत्कार प्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन ,मच्छिंद्र पाटील, वाल्मीक पाटील,प्रशांत देशमुख,बोरगावचे सरपंच दिनकर पाटील,चेतन पाटील,भैया पाटील, जि.प.सदस गोपाल चौधरी आदी उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय जिल्हा प्रमुख…
मुंबई : वृत्तसंस्था मोदी सरकारच्या या नव्या ‘अर्थशास्त्रा’मुळे 2022 हे पूर्ण वर्ष सामान्य माणूस महागाईच्या वरवंटय़ाखाली चिरडला गेला. आता 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ होणार असल्याने महागाईचा हा वरवंटा आणखी जोरात फिरणार आहे. महागाई हा जनतेचा सर्वाधिक जिव्हाळय़ाचा विषय, पण मोदी सरकारने 2022 मध्ये त्याकडे साफ दुर्लक्ष केले. महागाईवर आपल्या सरकारची ‘करडी नजर’ आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले खरे, परंतु या करडय़ा नजरेला ‘महंगाई डायन’ गेल्या वर्षभरात अजिबात घाबरली नाही. नवीन वर्षातही त्यापेक्षा वेगळे घडेल असे दिसत नाही. नव्या वर्षात देखील सिलिंडर भाववाढीवरुन केंद्र सरकारवर शिवसेसेनेकडून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. वर्ष बदलले मात्र…

