जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेली गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना आता जिल्हा पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवीत आहेत. जिल्ह्यात महिन्याभरापासून गुन्हेगारावर मोक्क्याची कारवाईची आजची चौथी घटना आहे. आजच्या या कारवाईत चाळीसगाव तालुक्यातील ५ टोळीतील ११ सदस्यांना मोक्का लावलेला आहे. चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५/२०२२ भादंवि क, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,१२०(२) या गुन्हयांतील आरोपी टोळी प्रमुख) अमोल उगन गायकवाड वय २५ रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, B) (टोळी सदस्य) २) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, (अटकपूर्व जामीनावर) ३) कृष्णा उगन गायकवाड रा.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील २६ जानेवारीच्या दिवशी ग्रामसेवकाने लाच घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या घटनेला दोन दिवस होत नाही तोच जिल्ह्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पंटरच्या माध्यमातून लाच घेणे भोवले आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ग्रामीण भागातील अडावद पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक पंटरच्या माध्यमातून चार हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिकाकडून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याने ही कारवाई झाली आहे. वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या अडावदमधील पोलीस कर्मचार्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोसावी…
पालघर : वृत्तसंस्था राज्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला संपविले अशा घटना तुम्हा एकल्या असतील पण हि घटना जरा उलट आहे. चक्क महिलेने आपल्या पतीला संपविले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पालघरमध्ये एका महिलेने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेला तिच्या पतीचे अफेअर असल्याची भनक लागली होती. यानंतर तिने काही लोकांच्या मदतीने पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय महिलेसह इतर 4 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव संतोष टोकरे असल्याचे समजते. झोपत्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. 20 जानेवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाडा तालुक्यातील कोंडले-बंदनपाडा…
मुंबई : वृत्तसंस्था बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांचा सन्मान व्हावा, यासाठी हे सरकार काय करतंय, हेदेखील पाहावे लागेल. दुसरीकडे कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंहांचा मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. मात्र,मोदी सरकारला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर पडला, अशी टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. आज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील हवाईदलाच्या विमानाचे वेगवेगळ्या ठिकाणी तीन मोठे अपघात झाले आहे. राजस्थानमध्ये एका विमानाचा तर मध्यप्रदेशात २ हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळले. विमान क्रॅश होऊन आग लागली. माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. तसेच मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज (शनिवार) सकाळी मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते, जेथे सराव सुरू होता. पहाटे साडेपाच वाजता हे विमान कोसळले.…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील उत्राण येथील तरुण छायाचित्रकार कृष्णा दामू भोई (३२) हा व्यवसायानिमित्त तो मित्रांसोबत नाशिक येथे गेला होता. तेथील काम आटोपून तो कारने उत्राणकडे येत असतांना त्याच्या चारचाकीची एका नाल्यात जावून कोसळली. यात तो ठार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मालेगाव साकूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात उत्राण येथील तरुण छायाचित्रकार ठार झाला. मृत तरुणाचे नाव कृष्णा दामू भोई (३२) असे आहे. व्यवसायानिमित्त तो मित्रांसोबत नाशिक येथे गेला होता. तेथील काम आटोपून तो कारने उत्राणकडे येत होता रात्रीच्या सुमारास साकूर फाट्याजवळ कार अचानक नाल्यात जाऊन कोसळली. यात कृष्णा हा जखमी झाला. त्याला मालेगाव येथे दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महामार्गलगत असलेल्या हॉटेलमध्ये लग्न सोहळ्यातून नवरीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 3 लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरी करणारे चोरटे हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याबाबत शुक्रवारी 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, मनोज विक्रम कोळी (वय-51) रा. एसबीआय कॉलनी, महाबळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव तहसील कार्यालयात वाहन चालक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न गुरुवारी एका हॉटेलात झाले. सायंकाळी 7 वाजता लग्न सोहळ्यात रिसेप्शन व फोटोसेशन कार्यक्रम सुरू होते. वधूचे दागिने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परीसरात असलेल्या रामदेवबाबा मंदीरासमोर अज्ञात दोन इसमांनी एका व्यापारी असलेल्या वृद्धाची ८ लाखात लुट केल्याची घटना जळगावात घडली होती, त्याठिकाणी तत्काळ पोलीस पथक दाखल झाले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकाने आज २७ रोजी यातील पाच संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. काय घडली होती घटना ! दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री ९.२५ वाजेच्या सुमारास श्री.ईश्वर बारुमण मेघाणे, रा सिंधी कॉलनी, रामाराम नगर, जळगाव हे त्यांचे दाणा बाजार येथील बाबा हरदासराम ट्रेडर्स हे होलसेल मालाचे दुकान बंद करुन उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल विक्री करुन मिळालेले असे एकुण ८ लाख रु. एक लॅपटॉप, मोबाईल, चार्जर,…
जळगाव : प्रतिनिधी येथील सिंहगड कॉलनी मध्ये राहणारे हवालदार निलेश मल्हारराव देशमुख यांनी भारतीय सेना दलात आपली कामगिरी पार पाडताना भारत पाकिस्तान सीमेवर 19 डिसेंबर 2020 रोजी पाकिस्तानी अड्ड्यावर 84 मिलि मीटर रॉकेट लॉंच करून फायर केले. त्यात पाकिस्तानी दोन आतंकवादी जागीच ठार झाले व दोन जखमी झाले. या कामगिरीबद्दल त्यांना 26 जानेवारी 2022 रोजी सेना मेडल मिळाल्याचे घोषित करण्यात आले. व ते मेडल 15 जानेवारी 2023 रोजी भारतीय सेना दिवसानिमित्त बेंगलोर येथे निलेश मल्हारराव देशमुख यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल सिंहगड कॉलनीतील सर्व रहिवाशांनी मिळून त्यांचा सत्काराचे आयोजन केले त्यात शेखर पवार, कैलास ठाकूर, भूषण पाटील,…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक पदवीधर आणि चर्चेतील उमेदवार म्हणजे सत्यजित तांबे कॉंग्रेस मधून बंडखोरी करत अर्ज दाखल केल्यानंतर आपण भाजपसह इतर पक्षांचाही पाठिंबा घेणार असल्याचं तांबे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर भाजपही तांबे यांनाच पाठिंबा देणार असल्याचा चर्चांना सुरुवात झाली होती. अशात भाजपच्या पाठिंब्याबाबत एका दुसऱ्याच उमेदवाराने दावा केला आहे. त्यामुळे आता तांबे यांचाच गेम होणार आहे का? अशी राजकीय चर्चेला उधान आले आहे. भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळेल, असा दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत…

