मुंबई : वृत्तसंस्था २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीस अजित पवार व देवेद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून दोन्ही नेत्यांनी शपथ घेतली होती. या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी दावा केलाय की पहाटेचा शपथविधी शरद पवारांची खेळी असू शकते. असे गौप्यस्फोट जयंत पाटील त्याचवेळा का करत नाहीत, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. तसेच उशिरा सुचलेलं शहाणपण काहीच महत्त्वाचे नाही, असंही पाटील म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनास्थापन करण्याची जबाबदारी दिली होती. २६ जानेवारी रोजी आपण ती…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन आज देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर ध्वजारोहण केले. याप्रसंगी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. लोकशाहीत सर्वांना पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांचा ठाणे जिल्ह्यातील आजच्या दौऱ्यावर सीएम शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. आज उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये दौरा आहे. त्या ठिकाणी मोठी रॅली व सभा होणार आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही, अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागले? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यास महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील,…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एका २० वर्षीय तरुण विवाहितेचा एका २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २० विवाहित तरुणीला संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे यांनी दि ३ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान विवाहितेला तिच्या फोटोचा धाक दाखवीत व तुझ्या पतीसह तुझ्या वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपी जीवन अंबादास दांडगे याच्या विरोधात पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी संदीप…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका सायकलस्वारास मोटारसायकलने धडक दिल्याने त्यात सायकलस्वार इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धरणगाव- अमळनेर रस्त्यावरील म्हाडा सोसायटी समोर घडली. मोटारसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत छगन जगन लोंढे (५५, म्हाडा कॉलनी) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शौचास जाऊन येतो, असे सांगून सायकल घेऊन घरून निघाले होते. धरणगावकडून अमळनेरकडे येणाऱ्या विना क्रमांकच्या मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या हात, पाय व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. सुखदेव छगन लोंढे याने…
जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगरकडून जळगाव- जामोदकडे भरधाव जाणाऱ्या एस. टी. बस व राखेचा डंपर यांच्यात धडक झाली. या अपघातात डंपर व बसचालक आणि वाहकांसह दहा प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजता मुक्ताईनगरजवळ घडली. मुक्ताईनगरची बस (एमएच १३ सीयू ६९३१) ही मुक्ताईनगर येथून जळगाव जामोदकडे जात होती. सकाळी साडेआठच्या सुमारास या बसने चिंचखेडा (बु.) ते वढोदा गावादरम्यान खांडवीकडून येणाऱ्या राख वाहतूक करणाऱ्या रिकाम्या डंपरला समोरासमोर धडक दिली. त्यात डंपरचालक सुनील बाबूलाल काजदेकर (रा. उमापूर, ता. जळगाव जामोद), बसचालक नरेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. वरणगाव), वाहक प्रतिमा शांताराम अहिरे (रा. भुसावळ) यांच्यासह बाबूराव ठोसर, यमुनाबाई ठोसर (रा. चिंचखेडा बुदूक), गणेश…
जळगाव : प्रतिनिधी सध्या जिल्हा पोलिस दलाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून, शनिवारी मध्यरात्री जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अचानक नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. यात पाच तासांत १ हजार ६०० वाहनांची तर १०७ हॉटेल्स, लॉज, ढाब्यांची तपासणी करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजेपासून ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीसाठी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे यांच्यासह ४० पोलिस अधिकारी व २१५ पोलिस अंमलदार नेमण्यात आले होते. या पोलिसांकडून मध्यरात्री १६०० वाहनांची तपासणी करून त्यांच्याजवळून १ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय रेकॉर्डवरील १३२ गुन्हेगारांचीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन तपासणी…
धरणगाव : प्रतिनिधी महसूल विभागाने महसूल कराच्या वसुलीचा दणका लावलेला असून ज्या मोबाईल टोवर्स कंपन्यांनी महसूल कर भरणा केलेला नाही अशा तालुक्यातील दोनगाव, लाडली, चोरगाव, मुसळी, बाभूळगाव येथील एकूण 7 टॉवर्स ला सील ठोकण्याची कारवाई आज दि २४ रोजी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. याकामी तालुक्यातील मंडळनिहाय पथके तयार करण्यात आले असून तलाठी व कोतवाल हे सदस्य आहेत. यानंतर ही महसूल वसुलीची, अकृषक कराची थकबाकी बाकी असणाऱ्या खातेदारांवर ही अशीच कारवाई केली जाईल त्यासाठी तात्काळ थकीत व चालू कर भरण्याचे आवाहन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले आहे. यावेळी टॉवर सील करताना तलाठी राहुल ढेरंगे व मंडळ अधिकरी अविनाश…
मुंबई : वृत्तसंस्था देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली असतांना एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशात उघडकीला आलेले असून तिकमगड जिल्ह्यात अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाने आई आपल्याला जीव लावत नाही या भावनेतून आईवर गोळीबार करत तिचा जीव घेतलेला आहे. आई सतत ओरडायची आणि आपल्याला मारहाण करायची त्यामुळे आपण वैतागून गेलेलो होतो असे देखील त्याने म्हटले आणि वडिलांची बंदूक घेऊन आईवर गोळीबार केला त्यात आईचा मृत्यू झाला. तिकमगड येथील भरत नगर परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून सपना रजक असे मयत महिलेचे नाव आहे . आंघोळ केल्यानंतर आई बाहेर आली त्यावेळी आरोपी मुलगा हा समोरच उभा होता आणि त्याने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तार लवकर होईल या आश्वासनात हिवाळी अधिवेशण देखील आटोपून गेले पण आतापर्यत मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही पण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंबंधीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत…

