• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्याचा मोदी सरकार पुरस्कार देतेय ; राऊत आक्रमक !

editor desk by editor desk
January 28, 2023
in राजकारण, राज्य
0
कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्याचा मोदी सरकार पुरस्कार देतेय ; राऊत आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था 

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, अशा नुसत्या पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांचा सन्मान व्हावा, यासाठी हे सरकार काय करतंय, हेदेखील पाहावे लागेल. दुसरीकडे कारसेवकांवर गोळीबार करणाऱ्या मुलायमसिंहांचा मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. मात्र,मोदी सरकारला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर पडला, अशी टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंग यादव यांनी कारसेवकांवर निर्घृणपणे गोळ्या चालवल्या. त्यात शंभरांवर साधू-संत, कारसेवक मारले गेले व अनेकांची प्रेते तर शरयू नदीत फेकण्यात आली. त्याच मुलायमसिंह यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. केवळ राजकीय दृष्टीकोनातूनच मुलायमसिंह यांना पद्म विभूषण पुरस्कारने गौरवण्यात आले. मात्र, असे करताना हिंदुत्ववादी भाजप सरकारला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विसर कसा काय पडला?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, मुलायमसिंह हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. राजकारणात, समाजकारणात त्यांचे कार्य मोठेच आहे, पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळ्या चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंह यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? संजय राऊत म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.
संजय राऊत म्हणाले, अयोध्येत आता राममंदिर उभे राहात आहे व त्याच राममंदिराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत मते मागितली गेली, पण 1990 साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्यानंतर मुलायमसिंह यांनी असेही सांगितले की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूंना गोळ्या घालाव्या लागल्या असत्या तरी मागे-पुढे पाहिले नसते.’ मुलायमसिंह यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजप व त्यांच्या परिवाराने मुलायमसिंग यांच्यावर हिंदूंच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण त्याच मुलायमसिंह यांना आता मोदी सरकारने नागरी पुरस्कार दिला. मुलायमसिंह यांच्या नातेवाईकांनीही याबद्दल मागणी केली नव्हती. तरीदेखील सरकारने केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून हा पुरस्कार दिला, असे संजय राऊत म्हणाले.

Previous Post

ब्रेकिंग : ३ हवाई दलाच्या विमानाचा मोठा अपघात !

Next Post

बायकोला लागली नवऱ्याच्या अफेअरची भनक ; झोपेत करून बसली असे काम !

Next Post
बायकोला लागली नवऱ्याच्या अफेअरची भनक ; झोपेत करून बसली असे काम !

बायकोला लागली नवऱ्याच्या अफेअरची भनक ; झोपेत करून बसली असे काम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group