जळगाव : प्रतिनिधी १९ लाख रुपयांच्या गुटख्याच्या तस्करी प्रकरणात अजय लिलाधर गोसावी (वय ४०, रा.प्रजापत नगर) व मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून रविवारी त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणात ११ जणांविरुध्द औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील सिडको पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगावहून १९ लाख रुपये किमतीचा गुटखा भरुन जात असलेला ट्रक पकडला होता. यावेळी चालकाने पलायन केले होते तर क्लिनर पोलिसांच्या हाती लागला होता. त्याच्या चौकशीत हा गुटखा जळगावहून औरंगाबाद येथे आणला जात असल्याचे स्पष्ट झाले होते.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था प्रेम म्हटले कि कोणताही धर्म, जात हे कुणीही पाहत नसते पण या प्रेमवीरांची कहाणी जरा वेगळी आहे. तरुणीने आपला देश सोडून चक्क १० वर्ष सुरु असलेल्या प्रेमासाठी भारतात आली आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अवगढ या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या 30 वर्षीय पवन कुमारने शुक्रवारी स्वीडनच्या क्रिस्टल रेबर्गसोबत लग्नगाठ बांधली. 2012 मध्ये पवन कुमारने स्वीडनमधील रहिवासी असलेल्या क्रिस्टल रेबर्गशी फेसबुकवर मैत्री केली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पवन कुमार हा व्यवसायाने इंजिनिअर आहे, तर क्रिस्टल रेबर्गने स्वीडनमधून हॉटेल, टुरिझम आणि मार्केटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. याविषयी पवन म्हणतो की,10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आमची मैत्री…
धुळे : वृत्तसंस्था कौटुंबिक वादातून महिलेची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला देखील अटक केली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर या ठिकाणी हि घटना घडली आहे. दिपालीचा पती नागेश दगडू कानडे यानेच भरदिवसा आपल्या पत्नीवर धारदार हत्याराने वार करून तिला जखमी केले. यानंतर दीपालीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २८ रोजी दुपारी साक्री रोड परिसरात असलेल्या यशवंत नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून नागेश कानडे याने धारदार शस्त्राने पत्नी दिपालीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. जखमी दीपालीला तातडीने उपचारांसाठी दिर गणेश दगडू कानडे…
पुणे : वृत्तसंस्था एका ३७ वर्षीय तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार करीत तिच्याकडून लाखो रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. कोथरूड परिसरातील ३७ वर्षीय तरूण तपन अनंत थत्ते याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करीत वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली पाच लाख रुपये उकळल्याची घटना पुण्यातील कोथरुड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका युवकावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तपन थत्ते याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच आई आजारी असल्याचे सांगून तिच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत आपल्या मुलीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून वडिलांनी रागाच्या भरात मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे, यानंतर आरोपीने स्वत: पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली, या प्रकरणाचा उलघडा पोलीस तपासात झाला आहे. ऑनर किलिंगची ही घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरची आहे. मुलीच्या ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. इंटर विद्यार्थिनीची हत्या अन्य कोणी नसून तिच्या वडिलांनी प्रेम प्रकरणातून केली. मुलीचे गावातीलच मुलासोबत प्रेम होते, वडिलांनी मुलीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर मुलीच्या हत्येचा कट रचला. घरात नेऊन मुलीला मारहाण केली. यानंतर मृतदेह बांधून तिची सायकल, शाळेची दप्तर आणि कपडे घेऊन…
जळगाव : प्रतिनिधी जळगावात दि २८ रोजी झालेल्या उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीसीद्वारे मुंबईवरून नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांचा ‘डीपीडीसी’ खर्चाचा आढावा घेत २०२३-२४ वर्षासाठी मागणीचा प्रारूप आराखडा करण्यासाठी ही बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २५० कोटींचा अधिकच निधी द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे. जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून निधीची अधिक मागणी आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ४३२ कोटी २९ लाख मंजूर आहे. मात्र विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून विकासकामांसाठी एक हजार ५४ कोटींची मागणी आहे. ६२२ कोटी ६० लाखांचा निधी अतिरिक्त हवा आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटींचा निधी अधिक द्यावा, अशी मागणी पालकमंत्री…
जळगाव : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दरम्यान, दोन दुचाकी चोरट्यांची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील यांनी नितीन सुरेश सपकाळे (२३, रा. मालोद, ता. यावल)…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा ते लासूर ही मुक्कामी एसटी बस चोपड्याकडे येत असताना अकुलखेड्यानजीक अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उलटली. यात सहाजण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ६.२५ च्या सुमारास घडली. तालुक्यातील लासूर गावी मुक्कामी राहणारी एसटी बस शनिवारी सकाळी चोपड्याकडे निघाली होती. बसमध्ये २५ प्रवासी होते. हिंगोणा गावानजीक एका वाहनाला साइड देत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि काही कळण्याच्या आत बस नाल्यात जाऊन उलटली. यात सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये लहू खंडू माळी (६९), ओम रमेश महाजन (१५) रावसाहेब रमेश सोनगिरे (४८), रमेश देवराम महाजन, सागर सोपान पाटील (४७, सर्व रा. लासूर), राजेंद्र सदाशिव पाटील (३२, रा. मामलदे)…
जळगाव : प्रतिनिधी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून लग्न करण्यासाठी तिला संसार मोडण्यासाठी मुलाबाळांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र सुभाष पाटील (पुर्ण पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात 25 वर्षीय विवाहित महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्या घटस्फोट घेतलेला आहे. हे विवाहित महिलेला माहित नव्हते. त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशची ओळख निर्माण करून मोबाईलनंबर घेतला. पत्नीशी बोलायचे आहे असं सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा…
मुंबई : वृत्तसंस्था हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांच्यासह ४० जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे. यामुळे आता शिंदे गट चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. हिंगोलीतील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह महिला कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डाॅ. अशोक उपाध्याय यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे 18 जानेवारी रोजी महाविद्यालयात गेले असता महिला प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच मांडला होता. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यास…

