नागपूर : वृत्तसंस्था नागपुरातील एका मोठ्या कोळसा उद्योजकाकडून केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे नाव वापरुन एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी असल्याचा दावा करणाऱ्या एका भामट्यासह तीन पत्रकारांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशातून चालणाऱ्या एका साप्ताहिकाचे दोन संपादक तसेच त्यांचा नागपुरातील रिपोर्टर हे तिघे नोव्हेंबर 2022 पासून नागपुरातील एका कोळसा व्यापाराच्या विरोधात बातम्या छापून त्याच्यावर खंडणीसाठी दबाव आणत होते. मात्र तरीही कोळसा व्यापारी खंडणी देत नाही, हे पाहून तिघांनी दोन महिन्यांपूर्वी वंश अग्रवाल नावाच्या एका भामट्याला आपल्यासोबत सहभागी करुन घेतले. वंश अग्रवाल हरिद्वारचा राहणारा असून त्याने कोळसा व्यापाऱ्याला…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गुरुकृपा कॉलनीतील २८ वर्षीय महिला आपल्या १२ वर्षीय मुलीसोबत बेपत्ता झाली. महिलेच्या आईने पोलिसात हरवल्याची नोंद केली आहे. पोलिस महिला व मुलीचा शोध घेत आहेत. ही महिला मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील राहणारी असून सध्या ती गुरुकृपा कॉलनीत राहत होती. या दोघी ५ रोजी कामाला जाते व शाळेत जाते, असे सांगून घरातून बेपत्ता झाल्या. त्या परत आल्या नाहीत. या दोघींचाही नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्या कोठेही न सापडल्याने महिलेच्या आईने अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. महिला व मुलगी आढळून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ परिसराती सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कर्मचारी असल्याचे भासवून दोन चोरट्यांनी सेवानिवृत्त बीडीओ वसंत किसन साळूंखे यांची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साळूंखे हे गणेश कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. दुचाकीची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सोमवारी दुपारी ते आयएमआर महाविद्यालयाजवळील बॅटरी रिचार्ज सेंटरवर आले होते. तेथून पायी परतताना त्यांना एकाने रस्त्यात अडवून मी पोलिस असून स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी आहे. खुप चोऱ्या होत असून दागिने सांभाळा असे म्हणाला. तेवढ्यात त्या व्यक्तीचा साथीदार दुचाकीवरून आला. त्या दोघांनी जवळच उभ्या असलेल्या एका…
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर एक महिला नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. तिथे डॉक्टरने तिच्या दोन्ही किडनी काढल्या आणि फरार झाला, त्या महिलेला तीन मुल आहेत. मोठ्या विश्वासाने ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तिथेच तिच्या दोन्ही किडनी चोरी करण्यात आल्या. इतकंच नाही तर ज्या पतीने आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं तोही सोडून गेला. तीन मुलं आहेत. मजुरी करून मुलांचं पालन पोषण करत होती. आता हॉस्पिटलमध्ये भरती आहे. शेवटचे दिवस मोजत आहे. माहीत नाही किती दिवस जगू शकेल. पण माझी चूक काय होती. माझ्यानंतर या मुलांचं काय होणा? ते कसे जगतील? बिहारच्या मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ अशी आर्त हाक घातली. पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २१ मार्च २०१६ रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर यांच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय…
मुंबई : वृत्तसंस्था अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २०२५ या सालाकरीता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. त्याप्रमाणे अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, वि. उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीस पदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष पदि – प्रमोद बळवंत जाधव, वि. चिटणीस पदी अतिश गायकवाड यांची निवड निर्णय अधिकारी अँड प्रविण गोगावले यांनी वाचून दाखविली व त्यास मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने राज्यांच्या मंजुरी दिली. सदर निवडणूक प्रक्रियेस काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केले होते. त्यास स्थागिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आज दि. २९/०१/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित असलेला अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आज देशातील दिग्गज नेत्यासह संत महात्मे उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाला आहे. जळगावमधील महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. परंतु आता ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या वतीने महाकुंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी…
केद्र सरकारने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर या योजनेचा त्यांना लाभ मिळेल का? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियमानुसार, हप्ते घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याचा कोणताही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदाराला या योजनेतील रक्कम मिळत राहील. ही रक्कम मिळवण्यासाठी वारसदाराला काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील. या अटी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था परिवारातील सातत्याने होणारे वाद मोठ्या टोकाला जात आहेत. अशीच एका पती आणि पत्नीमध्ये झालेले भांडण मोठ्या टोकाला जात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात हि घटना समोर आली आहे. पती-पत्नी वादातून भांडणं होणं ही काही नवीन बाब नाही. कधी कधी वाद वाढला तर एकमेकांना मारहाणही केली जाते. पण इथे रात्री घरी यायला इतका उशीर का झाला? असं विचारणाऱ्या पतीवर पत्नीने अॅसिडने हल्ला केला. ज्यामुळे पतीचा चेहरा गंभीरपणे भाजला गेला. पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोपरगंजची ही घटना आहे. पत्नी रात्री उशीरा घरी आली तेव्हा पतीने तिला उशीरा येण्याचं कारण विचारलं.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून भरदिवसा चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली महिलेची पर्स चोरी झाली आहे. यात महिलेचे तब्बल ४ लाख ३७ हजाराचा मुदेमाल लंपास झाला असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील तळेले कॉलनीतील रहिवासी असलेल्या मनीषा पाटील (वय ४२) या दि २८ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली पर्स अनोळखी चोरट्यांनी घेवून पसार झाले आहे. या पर्समध्ये तब्बल ३ लाख ८७ हजाराचे सोने व चांदीचे दागिने तर १० हजार रुपये किमतीचा मोबाईल यासह ४० हजार रुपये रोकड त्यासोबत चारचाकी गाडीचे आर.सीबुक यासह महत्वाची कागदपत्र चोरून नेले…

