चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात शुल्लक कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे वाजता हरगीरबाबा नगरात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (वय २१) हा मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरुसाकडे जात होता. हरगीरबाबा नगर पाटणारोड येथून जात असताना कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी हे मोटारसायकलवरून आले. तेव्हा कन्हैयाने माझ्याकडे काय बघत आहे. असे सांगून शिवीगाळ केली. त्यात मनोज लोटन भोई याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील आंतरवासिता प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील छात्राध्यापकांचा आंतरवासिता उपक्रम सुरू आहे. आंतरवासिता उपक्रमांतर्गत छात्र अध्यापकांनी शालेय स्तरावर मुख्याध्यापकांच्या परवानगीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासो डी डी पाटील, प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर कोळी आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस तुषार संदानशिव. मुख्याध्यापक श्री के डी पाटील प्रा. यु.बी. पाटील, प्रा. डॉ.जितेश चव्हाण पर्यवेक्षक सोनवणेसर तसेच विद्यालयातील सर्व…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून एका व्यक्तीची मालवाहू गाडी चोरीला गेल्या घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुजराथी गल्लीतील रहिवासी असलेले सचिन मधुकर पाटील हे शेती व अक्वाचा व्यवसाय आहे. त्यांच्या बहिण वैभव नगरात वास्तव्यास असून त्यांनी त्यांची मालवाहू महेद्र कंपनीची पिकअप गाडी एम.एच.१९.एस.७३९९ घराबाहेर लावलेली असतांना दि ८ रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी तेथून ती गाडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी भडगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने परिसरातून बेड्या ठोकल्या. विजय दशरथ पाटील (२५, रा. यशवंत नगर, भडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी भडगाव बसस्थानक बलात्कारातील संशयित आरोपी विजय पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो भडगाव बसस्थानक परिसरामध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. यांनी केली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाने पोह लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला नुकतीच गर्भधारणेची घोषणा केली होती. आज बुधवारी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात बाळ झाले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना आहे. “सकाळी 9.30 च्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला,” असे ट्रान्स जोडप्यापैकी एक झिया पावल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे झियाने पुढे सांगितले. तथापि, ट्रान्स व्यक्तीने नवजात मुलाची लिंग ओळख उघड करण्यास नकार दिला आणि सांगितले की, ते आत्ताच सार्वजनिक करू इच्छित नाहीत. झिया पावलने अलीकडेच इंस्टाग्रामवर जहाद आठ महिन्यांची गरोदर असल्याचे जाहीर केले होते. पोस्टमध्ये म्हटले होते की, “आम्ही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील नुकतेच लग्न झाल्यावर नवरी फरार होण्याच्या घटना नेहमी घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये नव्या नवरीने एक खतरनाक कारनामा केला आहे. लग्न करून मरूधर एक्सप्रेसने सासरी जात असलेल्या नवरीने रेल्वेतच सासरच्या लोकांना विष दिलं आणि संधी बघून फरार झाली. घटनेनंतर सासरच्या लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या सगळ्यांची स्थिती चांगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असं सांगण्यात आलं की, त्यांच्यासोबत असलेल्या नवरीने सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. मीडिया रिपोर्टनुसार, मरूधर एक्सप्रेसने…
मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. १४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व…
जळगाव : प्रतिनिधी खान्देशातील केळीची नेहमीच देशभरात मागणी असते. पण जळगाव जिल्ह्याच्या केळीला उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 50 ते 60 रुपये प्रति डझन केळीला भाऊ देऊनही चांगल्या दर्जाची केळी ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसल्याची खंत ग्राहक व्यक्त करीत आहे. सद्यस्थितीत कमी दर्जाच्या केळीला तीस ते चाळीस रुपये प्रती डझन विक्रमी भाव मिळत असून केळी उत्पादनात घट झाल्याने मात्र केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्वाधिक केळी उत्पन्न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातच सध्या बाजारपेठेत ग्राहकांना केळी मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत असून 50 ते 60 रुपये प्रति डझन भाव देऊनही ग्राहकांना केळी मिळत नसल्याने केळी…
औरंगाबाद : वृत्तसंस्था युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता. मिरवणूकीवेळी डीजे बंद करायला सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता.तसेच काही प्रमाणात गाड्यांच्या…
जगभरात सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डेच्या दिवशी प्रेमी एकमेकांशी आपल्या हृदयातील गोष्टी बोलतात. हा दरवर्षी फक्त 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रपोज डे ला खूप महत्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या मनातील भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर मनमोकळेपणाने बोलू शकाल. प्रपोज डे का साजरा करतात? प्रपोज डे साजरा करण्यामागे कोणतीही ऐतिहासिक कथा नाही. वर्षानुवर्षे पाश्चिमात्य…

