Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ठ असून सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली नुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच जळगांव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरीकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते. जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी आमदार राजुमामा भोळे यांचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.  अखेर आज १४ जळगाव शहरासाठी अत्यंत आनंदाची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील सुकळी येथे ट्रकने दुचाकीला कट‎ मारला. या अपघातात दुचाकीवरील चार वर्षांची‎ मुलगी ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारीला दुपारी‎ दीड वाजेच्या सुमारास घडली.‎ याबाबत मीराबाई भरत विसावे (वय‎ ३५,रा.मांडवे बुद्रुक ता.जामनेर) यांनी मुक्ताईनगर‎ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेली माहिती अशी कि,  १४ फेब्रुवारीला‎ दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुकळी गावाच्या‎ रस्त्यावर ट्रक (क्रमांक आरजेजीए.८५०८) वरील‎ चालक गिरधारीलाल मेघवाल (रा.राजस्थान) याने‎ फिर्यादीचा मुलगा विजय हा चालवत असलेल्या‎ दुचाकीला (क्रमांक एमएच-१९.डीझेड.९५५४) कट‎ मारला. त्यात अपघात होऊन फिर्यादीची भाची‎ वेदिका अमोल तायडे (वय ४ वर्षे, रा. नांद्रा हवेली,‎ ता.जामनेर) जिल्हा मागील चाकात येऊन गंभीर‎ जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी‎…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील नागलवाडी येथे सासू व सुनेचे एकाच दिवशी निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघींची अंत्ययात्रा १४ तारखेला सायंकाळी पाच वाजता एकाच वेळी काढण्यात आली. दोघींचाही मृत्यु किरकोळ आजाराने झाला. अरुणाबाई यशवंत राजपूत (६५) यांचे किरकोळ आजाराने पहाटे सात वाजून दहा मिनिटांनी चोपडा येथील दवाखान्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नागलवाडी येथे घरी आणण्यात आले, त्यांच्या निधनाची वार्ता गावात व नातेवाईकांना सर्वत्र देण्यात आली. दुपारी दोन वाजता अरुणाबाई याच्यावर अंत्यसंस्कार होणार होते मात्र याच वेळी वयोवृद्ध सासुबाई कौसाबाई हुकुमसिंग राजपूत (९३) यांचा देखील वृद्धापकाळाने दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले. सुनेचे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी येथील आधार बहुउद्देशीय संस्था सध्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधे जाऊन नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत दत्त विद्या मंदिर पातोंडा, आदर्श विद्यालय अंमळगाव, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, माध्यमिक विद्यालय वावडे, अंतुर्ली, मंगरूळ, सारबेटे, गडखांब आश्रम शाळा, रणाईचे या सह एकुण २७ शाळांमधे डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून, डोळ्यांचा नंबर काढणे, नंबर लागला तर मोफत चष्मा बनवून देणे व ठराविक विद्यार्थ्यांमधे काही विशेष बाब आढळून आल्यास सदर विद्यार्थ्यांस अमळनेर येथील डाॅ राहूल मुठे यांच्याकडे आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत उपचार करवून घेत…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत गणेश संजय सोळुंखे (वय-23) आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे गणेश सोळुंखे हा आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टरवर चालकाचे काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास घरात कुणाला काहीही न सांगता थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर गेला. तिथे त्याने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्याने तापी नदीत उडी घेतल्याचे काटावर गुरे चारणार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावाकर्‍यांना ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरातील २८ वर्षीय तरुणाला पाच जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार वस्तूंसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नागसेन नगरात मुकेश रोहिदास झाल्टे (वय-२८) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर कॉलनीतील पाच जणांनी फरशी, चॉपर, लोखंडी रॉड, दारूची बाटली आणि काठी याने बेदम मारहाण करून डोक्याला, हाताला, मानेला आणि…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कजगावनजीक मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अमरावती येथून मालेगाव येथे नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. यातून नवरदेवासह पाचजण सुखरूपपणे बचावले आहेत. मिळालेली माहिती अशी कि, अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी ते नातेवाइकांसह इनोव्हा कारने (एमएच २७ बीव्ही ७९५६) निघाले होते. कजगावनजीक गाडीमधील चालकाच्या वायर जळाल्याचे लक्षात आले. कार रस्त्याच्या बाजूला घेत असतानाच तिने पेट घेतला. चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. कारला लागलेली आग विझवण्यासाठी रस्त्यावर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कार काही मिनिटांत जळून खाक झाली. गाडीने पेट घेताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानकात दि. ०९ रोजी ज्वेलरी दुकानाचे शटरच्या कुलूपास लावलेले पट्टया कापून दुकानातून ४५,०००/- रुपयाचा सोन्या-चांदीचे दागिने, बेनटेक्सचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आला असता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किसन नजनपाटील यांनी त्यांना मिळालेली गोपनिय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात गजानन सोपान शिंगाळे रा. पाचन वडगाव ता. जि. जालना हा अट्टल गुन्हेगार आलेला आहे. तो वेगवेगळया जिल्हयांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे करतो. सदर बातमीची खात्री करण्यासाठी त्यांचे अधिनस्त पोउनि, श्री. अमोल देवढे, पोहेकॉ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावात आतेभावाच्‍या लग्‍नानिमित्‍ताने धरणगावातून येत असलेल्‍या विवाहितेचा पाळधीजवळ महामार्गावर झालेल्‍या अपघातात मृत्‍यू झाला. कविता प्रशांत चौधरी असे विवाहितेचा नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास देवीदास चौधरी हे गंभीर जखमी आहेत. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात राहतात. आत्याच्या मुलाचे लग्‍न असल्‍याने हळदीसाठी त्‍या सोमवारी शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांच्‍यासोबत दुचाकीवरुन येत होत्‍या. परंतु, पाळधीच्या पुढे आल्‍यावर मागून भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपरने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता हे रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा हा गिरणा नदी पात्रातून होत असतांना आज दुपारच्या सुमारास अचानक गिरणा नदी पत्रात पोलिसांनी धडक कारवाई केल्याने वाळूमाफियामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहराला लागून असलेल्या बांभोरी गावानजीकच्या गिरणा नदी पात्रात आज धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी थेट नदीपात्रात जात वाळूमाफियांना पोलिसांचे पथक दिसताच वाळूमाफियानी या परिसरातून सर्वच वाहनाची पळवापळव केली, पोलीस निरीक्षक राहुल खताळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट वाळू भरणाऱ्या मजुरांना चांगलाच धडा शिकविला आहे. आजपासून पुढे कधीही या नदीत चोरटी वाळू भरायची नाही असा दमच त्यांनी यावेळी मजुरांना दिला असल्याने…

Read More