Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. ते आज रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रत्नागिरीमध्ये पोहचले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले कि, तुरुंगात मला मारण्याचा प्रयत्न झाला. सध्या देशात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. न्यायालये, उद्योगपती, माध्यमे तुमच्या खिशात आहेत. लोकशाहीच्या सर्व स्तंभाची मालखी तुमच्या ताब्यात आहे. निवडणूक आयोग तुमचे ऐकते, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आडवे येणाऱ्याचे असे खून करणे सुरू आहे. मात्र, किती खून करणार. मला ही जवळजवळ मारण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला माणसे संपवण्यासाठी सत्तेवर आणले आहे का,…

Read More

देशातील सर्वात विश्वसनीय सरकारी संस्थांपैकी एक पोस्ट ऑफिस हे आहे. देशातील कोट्यवधी लोक बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसचे जाळेही देशभर पसरलेय. परंतु अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे कनेक्टिव्हिटी तितकीशी चांगली नाही. आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी, इंडियन पोस्टने काही काळापूर्वी फ्रँचायझी सेवा सुरू केली होती. यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी सहज घेऊ शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या परिसरात पोस्ट ऑफिसची सुविधाही देऊ शकता. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल… पोस्ट ऑफिसमध्ये फ्रँचायझी योजना पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत. प्रथम आउटलेट फ्रेंचाइजी आणि फ्रेंचाइजी पोस्टल एजंट. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही फ्रँचायझी योजना निवडू शकता. कोण अर्ज…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा सुरु असतांना याठीकाणी चोरट्यांचा चांगलाच हात साफ करायचे पाहायला मिळाळे आहे. एका शेतकरी खिश्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची घटना घडल्यानंतर पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी  कि, जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने पारोळा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारोळा तालुक्यासह शहरातील अनेक नागरिक या सभेत उपस्थित झाले होते. यावेळी तुफान गर्दी पाहून चोरट्यांनी आलेल्या लोकांचे खिश्यातून चांगलीच लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालक्यातील देवगाव येथील रहिवासी सुनील युवराज पाटील (वय ३६) हे दि १६ रोजी मुख्यमंत्री…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  शिंदे-फडणवीस सरकार जेव्हापासून आले आहे तेव्हा पासून कामांचा झपाटा लावला आहे. आमच्या कडे असलेल्या या वेळेत आम्ही ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच प्रमाणे आम्ही कामांचा जनतेला कामे करण्याचा धडाका सुरू आहे. राज्यातील उद्योजक, जनता आदी क्षेत्रातील समस्या सोडविण्याचा आमचा पारदर्शक कारभार राहणार असणार आहे, असे शाब्दीक टिका ठाकरे सरकारवर यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत जळगाव येथे विकास परिषद कार्यक्रमात त्यांनी केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यामाने जळगाव जिल्हा विकास परिषद गुरूवारी जळगाव येथील छत्रपती संभाजी राज्य नाट्यगृहात झाली. परिषदेच्या प्रमुख पाहूणे म्हणून रेाज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकार, महाराष्ट्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून महिलांचे फोटो टाकून अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका महिलेच्या पतीने सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यानुसार, ५ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत त्यांच्या भाचीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून एकाने त्यांची पत्नी व मामीचा फोटो अपलोड केले.

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव शहरातील मेडिकल व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याची दुचाकी अडवली आणि त्याच्याकडील दोन लाख ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. येथील संजय हशमतराम मंदानी (४४) हे शांतीनगरात परिवारासह वास्तव्यास आहेत. मिळालेली माहिती अशी कि, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते विक्री व उधारीची जमा झालेली २ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम बॅगेत ठेवून मोटारसायकलने घराकडे निघाले. मंदानी हे घरापर्यंत आले असता त्यांचा पाठलाग करत दोन दुचाकी तिथे आल्या. एकाने दुचाकी समोर आडवी लावली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन जणांनी मंदानी यांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  सुरक्षीत तसेच शिस्तबध्द कामकाजासाठी ओळखले जाणार्या रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघकीस आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रेल्वे सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी निघालेली नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी ही चार ते पाच दिवसात जेएनपीटी बंदरात पोहोचणे अपेक्षित होते. पण तेरा दिवसानंतरही ही मालगाडी जेएनपीटी बंदरात पोहोचली नाही. जणू ही गाडी चक्क गायब झाल्या सारखाच प्रकार घडला. FOIS मधून गाडी झाली अदृष्य….. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली रेल्वे PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल बारा वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शोएब निसार शेख (३५ रा.मदिना चौक) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०११ पासून प्रेमसंबध आहेत. गेल्या बारा वर्षांच्या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या पूर्वीच्या राहत्या घरात तसेच सापूतारा, मुंबई व त्र्यंबकेश्वर आणि शहरातील विविध लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला. लग्नानंतर घर घ्यावे लागेल असा बहाणा करून त्याने पीडितेकडून भाडेतत्वावरील घराच्या डिपॉझिटसाठी तीन लाख रूपये घेतले. तसेच बुलेट आणि अ‍ॅक्सेस दुचाकी खरेदीसाठी सुमारे १ लाख ६० हजार…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका २५ वर्षीय तरुणीचा एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी  कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. गेल्या २०२१ पासून ते आजपर्यत नांद्रे गावातील संशयित आरोपी समाधान पाटील (वय २७) याने तरुणीला तु माझ्याशी लग्न कर असे बोलून त्यास तरुणीने नकार दिल्याने त्याचे वाईट वाटून तरुणीच्या गावात येत तरुणीवर लक्ष ठेवत तरुणी घराबाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करीत तिला शिवीगाळ व दमदाटी करून तिला धमकी दिली कि माझे जगून फायदा नाही मी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून दुकानाबाहेरून अनोळखी चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील अंजनविहरे या गावातील रविद्र रघुनाथ चव्हाण यांच्या मालकीच्या किराणा दुकानाबाहेरून दि १३ ते १४ फेब्रुवारी रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.जीजे.१८ सीएस.६०६५ या नंबरची चोरून नेल्याने रविद्र चव्हाण यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.राजू पाटील हे करीत आहेत.

Read More