Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  बिअरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वॉइन शॉपमध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने शॉपमधील व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून ५ हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या नगरातील चिराग विष्णू गारानी हे गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वाइन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती शॉपमध्ये आला. त्याने तीन बिअर आणि एका हाफ व्हिस्कीची मागणी केली. यावेळी आधी पैसे दे, असे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धुळे येथील कॅम्ब्रिज स्कूलमध्ये धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची सुपुत्री कु.सर्वज्ञा नितीनकुमार देवरे हिस शालेय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वेशभूषा व पोज यासाठी प्रथम पुरस्कार रुपये अकरा हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर प्रशस्तीपत्र शाळेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते,भारतीय धावपटू व धुळे येथील रहिवासी योगेश्वरी मिस्त्री व मान्यवरांच्या हस्ते कु.सर्वज्ञा हिला देण्यात आले.शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.सर्वज्ञा चे कौतुक करण्यासाठी आजोबा राजाराम देवरे,आजी सिंधुबाई देवरे,वडील नितीनकुमार देवरे,आई निकिता देवरे व भाऊ सौनित देवरे हजर होते. सदर पुरस्कारासोबतच सर्वज्ञाला उत्कृष्ट फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ही द्वितीय पारितोषिक मिळाले या यशासाठी सर्वज्ञाचे सर्वत्र कौतुक…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतांना अनेक पक्षातील शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत (शिंदे गटात) येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. त्यापूर्वीच धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्षांनी गटनेटे पप्पू भावे यांच्या उपस्थिती केला. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्वच पक्षातील शेकडो कार्यकर्ते आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात आज अनेक पक्षांना धक्का बसणार असून काल दि १५ फेब्रुवारी रोजी धरणगावच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संभाजी कंखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम करून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल वसंतराव गाढे (२८, रा. आव्हाणे शिवार) यांना २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयितांनी कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहिल गाढे हे पाळधी येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन २०२० मध्ये ते मालवाहू वाहन पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०१२ मध्ये गाढे यांनी चव्हाण यांच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील नांदगाव रोडवर शहरालगत असलेेल्या पाटखडकी जवळ साईनाथ पेट्रोल समोर दोन दुचाकीच्या समोरासमोरा झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. हि घटना दि,१५ रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती. मिळालेली माहिती अशी की, योगेश आनंदा जाधव(४७) व विजय नारायण सोनजे(६३) दोघे रा.नांदगाव हे दोघे त्यांच्या दुचाकीने चाळीसगाव नांदगाव रोडवरुन नांदगावहुन चाळीसगावकडेे येत असता समोरुन चाळीसगावकडून नांदगावकडे नाना रामचंद्र वाघ(५८) रा.परधाडी, ता.नांदगाव हे देखील दुचाकीने जात असताना, तालुक्यताील पाटखडकी गावाजवळ साईनाथ पेट्रोल पंपाच्या समोर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जबरदस्त धडक झाली. यात दुचाकीचा पुढील भागाचा अक्षशा;…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती प्रमोद पाटील (५५) यांची २१ हजार रुपयांची रोख व मोबाइल ठेवलेली हॅण्ड पर्स गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना मंगळवारी दुपारी नवीन बसस्थानक येथे घडली. मिळालेली माहिती अशी कि, पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती पाटील या शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी शहरातील गुलमोहर कॉलनीमध्ये राहणाऱ्या सासूकडे आल्या होत्या. काम आटोपून त्या मंगळवारी १ वाजता पिंपळगाव हरेश्वर जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या. पाचोरा बसमध्ये चढताना त्यांना लक्षात आले की, मोठ्या पर्समधील हॅण्ड पर्स कुणीतरी काढून घेतली. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील तमाम शिवप्रेमींसाठी मोठ्या उत्साहाच सन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. याला केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली आहे. आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करणार असल्याचं महाराष्ट्रातील खासगी संस्थेनं जाहीर केलं होतं. पण पुरातत्व विभागानं यावर आक्षेप घेतला होता. यानंतर या संस्थेनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर कोर्टानं यावर निर्णय देताना जर राज्य सरकार या संस्थेसोबत सहआयोजक होण्यास तयार असेल तर हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यास हरकत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर महाराष्ट्र सरकार यासाठी सहआयोजक होण्यास तयार आहे. त्यामुळं लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा करणारे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध सिटकॉमने केला आहे. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळते. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही तारक मेहता मालिकेतील ‘बबिता जी’च्या मागे वेडे झाले आहेत. मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते. आता अशीच एक चर्चा होताना दिसत आहे. पुन्हा एकदा या अभिनेत्रीचं नाव टप्पूसोबत जोडलं जात आहे. त्याच्यासोबतचा पिक्चर समोर आला आहे, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसलेली…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था  नुकताच जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी आपलं लग्न व्हावे, असे प्रत्येक प्रेमीयुगुलांना वाटत असते. दरम्यान यासाठी अनेक प्रेमीयुगुलांकडून मुद्रांक नोंदणी विभागात नोंदणी केली जाते. तर औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी 150 रुपये प्रमाणे अवघ्या 1 हजार 50 रुपयांत सातही जोडप्यांच्या लग्नाचा बार उडाला. यावेळी नववधू-वरांचे नातेवाईक, मित्र परिवारांची उपस्थिती होती. औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. आनंदात एकमेकांना मिठाई…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर आता बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या गटनेते पदाच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. थोरात यांनी राजीनामा दिलं ना पत्र दिलं असं पटोले यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर बसून हा वाद सोडवू असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी समेटीची तयारी नाना पटोले यांनी दाखवली आहे. एका चर्चेमधून…

Read More