• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवघ्या १ हजार रुपयात सातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार !

editor desk by editor desk
February 15, 2023
in राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अवघ्या १ हजार रुपयात सातही जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार !

औरंगाबाद : वृत्तसंस्था 

नुकताच जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी आपलं लग्न व्हावे, असे प्रत्येक प्रेमीयुगुलांना वाटत असते. दरम्यान यासाठी अनेक प्रेमीयुगुलांकडून मुद्रांक नोंदणी विभागात नोंदणी केली जाते. तर औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी 150 रुपये प्रमाणे अवघ्या 1 हजार 50 रुपयांत सातही जोडप्यांच्या लग्नाचा बार उडाला. यावेळी नववधू-वरांचे नातेवाईक, मित्र परिवारांची उपस्थिती होती.

औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. आनंदात एकमेकांना मिठाई भरवून नवदाम्पत्यांनी निबंधक कार्यालय आवारात विवाह सोहळा साजरा केला. सहायक दुय्यम निबंधक तथा जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी एस.डी. कुलकर्णी यांनी सांगितले की, दिवसभरात 7 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. नोंदणी विवाह करणाऱ्यांमध्ये शहरातील 5 तर तालुक्यातील दोन जोडप्यांचा समावेश होता.

एका विवाह नोंदणीसाठी 150 रुपये…
दरम्यान सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात लग्न लावण्यासाठी 150 रुपये शुल्कात विवाहाची नोंदणी होते. त्यात नोटीस शुल्क 50 आणि नोंदणी 100 रुपयांचा समावेश आहे. दोघांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत, रहिवासी आणि वयाचा पुरावा लागतो, असे जिल्हा विवाह अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले. कोरोनामुळे गर्दीच्या निर्बंधामुळे नोंदणी विवाह करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. 2020 आणि 2021 या दोन वर्षांत नोंदणी विवाह मोठ्या प्रमाणात झाले, असल्याचं देखील ते म्हणाले.

नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये अर्ज आले होते
गेल्या चार वर्षांत 1805 नोंदणी विवाह झाले. यात 2019 मध्ये 495 तर 2020 मध्ये 319 विवाह झाले. 2020 च्या एप्रिल महिन्यात एकही नोंदणी विवाह झाला नाही. 2021 मध्ये 446 विवाह नोंदणी पद्धतीने झाले. 2022 मध्ये 569 च्या आसपास नोंदणी विवाह झाले. जानेवारी व फेब्रुवारी 2013 मध्ये 89 विवाह झाले. तर विवाह नोंदणीसाठी सह. दुय्यम निबंधकाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर विवाहाची तारीख दिली जाते. ज्यात 30 ते 90 दिवसांच्या दरम्यान विवाहासाठी तारीख मिळते. तसेच आपला विवाह नोंदणी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करण्यासाठी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये अर्ज आले होते.

Previous Post

कॉंग्रेसच्या त्या नाराजीवर पटोलेंनी दिली ही माहिती !

Next Post

तारक मेहता मधील ‘बबिता जी’ने दिली प्रेमाची कबुली !

Next Post
तारक मेहता मधील ‘बबिता जी’ने दिली प्रेमाची कबुली !

तारक मेहता मधील 'बबिता जी'ने दिली प्रेमाची कबुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group