मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले. IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील २४ तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात तलवार, कट्टा,पिस्तूलासह फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रसारीत करुन समाजात दहशत निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळील दोन तलवार, एक चॉपर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी शहर पोलिस ठाण्याचे आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे यांना गोपनीय खबर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील यासीन नगर भागात काही मुले हातात तलवार व चॉपर घेऊन दहशत माजवत आहेत. तसेच हत्यारासह फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारीत करीत आहेत, अशी माहिती समजली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व त्यांच्यासोबत पोलिस नाईक राहुल सोनवणे, महेद्र पाटील, भूषण पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे,…
जळगाव : प्रतिनिधी दि.१८ रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पडघा या ठिकाणी ट्रक व कालीपिवळीमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात यावल तालुक्यातील न्हावी येथील २२ वर्षीय प्रज्वल शंकर फिरके निधन झाले. तो सेवानिवृत्त शिक्षक तथा मठवाडा, न्हावी येथील शंकर फिरके यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील शंकर फिरके (दोडके), आई व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा बुधवार, १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पडघा येथील निवासस्थानापासून निघणार आहे. फिरके परिवार हा अनेक वर्षांपासून पडघा येथे निवासी आहे. दरम्यान, या अपघातात आणखी काही जण ठार झाल्याचे समजते. एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाने फिरके परिवारावर दःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ असलेल्या बिबण्या नाल्यावर पाचोरा येथून सातगाव डोंगरीला कापूस भरण्यासाठी जात असलेला ट्रक सातगाव (डोंगरी) येथे मुक्कामी असलेली पाचोरा आगाराच्या बसवर जावून घडल्याने अपघात झाला. यात बस मधील १३ शाळकरी विद्यार्थी, बसचालक, २३ जण किरकोळ जखमी झाले. अपघाताचे वास्तव पाहून ट्रक चालक आपले वाहन जागेवरच सोडून पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा-मोंढाळा रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्यासमोर मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोऱ्याच्या दिशेने येणारी बस क्रमांक (एमएच १० बीएल १६१८) आणि पाचोराकडून (सातंगाव डोंगरी) मोंढाळाकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २०- ७५२१) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह २०…
मुंबई : वृत्तसंस्था सोमवारपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह मुंबई, ठाणे भागात चांगला पाऊस पडतो आहे. नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागांसह ठाणे आणि सातारा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी गेल्या दोन आठवड्यापूर्वी शिंदे व फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे तर त्यानंतर चक्क दोन वेळेस शरद पवारांची भेट सुद्धा झाली असतांना एका बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान(केआरके) यांच्या ट्वीटमुळे भाजप व शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर केआरकेने ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांसह बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे. केआरकेने याबाबच केलेलं ट्वीट चर्चेत आहे. “NCP मध्ये कधीच…
मुंबई : वृत्तसंस्था नुकतेच एका मराठी वृत्तवाहिणीने किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत चर्चासत्र सुरु असतांना यावेळी विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले आहे तर या व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. अंबादास दानवे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी फक्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गप्पा मारते. या व्हिडिओ प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून महिला आमच्याशी संपर्क साधत आहे. येत्या काळात या महिला किरीट सोमय्या यांचे वेगवेगळे विषय जनतेसमोर मांडणार आहे. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना…
ठाणे : वृत्तसंस्था आज सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ काळी पिवळी जीप प्रवाशांना घेऊन निघाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २२) याला रामेश्वर कॉलनी भागातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, विशालवर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्यासाठीच त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. सोमवारी एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना विशाल दाभाडे हा त्याच्या घरातील परिसरात शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत रामेश्वर कॉलनी भागातील चांगापाचा मंदिराजवळ आले. याठिकाणी विशाल आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी सुरा सापडला. त्यानंतर पंचनामा करून, त्याला ताब्यात घेण्यात आले.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लहासर गावाजवळील सागवान जंगलातील नाल्यात सुमारे ४५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोत्यात मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृताच्या तोंडावर प्लॅस्टीक गुंडाळले होते. तसेच हात व पाय बांधलेले होते. जांभुळ येथील एक इसम तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या मारेकऱ्यास पहूर पोलिसांनी अटक केली होती, मात्र मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली याबाबत त्याचेकडून कोणतीच माहिती मिळत नव्हती. या अनुषंगाने पहूर पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी घटनास्थळी पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस…

