मुंबई : वृत्तसंस्था रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या घटनेची माहिती घेतली आहे. सध्या प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत म्हटले आहे की, एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढणे व जखमींवर तातडीने उपचार करणे, याला आम्ही प्राधान्य देत आहोत. दरम्यान,घटनेची माहिती…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर आज सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट…
अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की लोक 30 फुटांपर्यंत दूरवर पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार कार ओव्हरब्रिजवर मागून येणाऱ्या डंपरला धडकली होती. हा अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर राजपथ क्लबकडून ताशी 160 किलोमीटर वेगाने येणाऱ्या जग्वारने जमावाला चिरडले. मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात जग्वारचा…
मुंबई : वृत्तसंस्था देशभर सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराने आता महाराष्ट्रात देखील पावसाचा जोरदार कहर दिसू लागला आहे. याचा फटका कोकणात मोठ्या प्रमाणात बसला असून रायगडजवळ असलेल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. या बचाव पथकांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील गावाजनीक आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने रोडवरील भिंतीला आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील शेख अफसर शेख तय्यब हे आपल्या परिवारासोबत बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीने धरणगावकडून अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले असतांना चारचाकीच्या पुढील शीटवर शरीफाबी शेख तय्यक (वय-५६) बसलेल्या होत्या. धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावानजीक भरधाव चारचाकीचे अचानक मुख्य रस्त्यावर टायर फुटले. त्यामुळे शेख अफसरचा चारचाकीचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली. यात…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे – फडणवीस सरकारने गेल्या काही महिन्याआधी तलाठी भरतीची मोठी घोषणा केली होती. या भरतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानपरीषदेत केली. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती. या प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे. तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे पण नेमकी किती तारखेपर्यंत ही मुदतवाढ असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही. यासंदर्भात…
पुणे : वृत्तसंस्था पुणेपोलिसांनी मोठी कारवाई करत NIA कडून वॉन्टेड घोषित करण्यात आलेल्या 2 कुख्यात दहशतवादयांना जेरबंद केले. मागील दीड वर्षांपासून ते फरार होते. दोघांवरही NIA ने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पुण्याच्या कोथरूड भागातून दोघांनाही अटक करण्यात आली. गस्तीवर असणाऱ्या कोथरूड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी संशयातून दोघांना पकडले आणि चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन गस्तीवर असताना त्यांनी या दोघांना…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात जबरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना दि.१५ ते १७ जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील रहिवासी रमेश सीताराम बडगुजर (वय ६३) हे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. दि. १५ ते १७ दरम्यान ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे कर्णफुल, पाच हजार रुपये किंमतीच्या साड्या व 18 हजारांची रोकड असा एकूण 55 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक दिवसापासून रखडलेली भारतीय जनता पक्षाने आज तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून या तिन्ही जागेंवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची तर रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. भाजपने नुकतेच जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली असून यात तिन्ही चेहरे नवीन आहे. जळगाव लोकसभेसाठी दिलेले ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते आपल्या कीर्तनातून राज्यभर प्रसिद्ध आहे तर दुसरे रावेर लोकसभेच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन तरुणासह एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास असून तिचे शिक्षण सुरु असतांना एका अल्पवयीन संशयित आरोपीने गेल्या आठ दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला आत्महत्या करेल तसेच पीडीतेच्या कुटूंबाला फसवेल, अशी धमकी देत शहरातील विविध भागात पिडीतेवर 29 जून 2023 ते त्यानंतरच्या आठ दिवसानंतर अत्याचार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या कृत्यात एका अनोळखी महिलेनेदेखील मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण…

