जळगाव : प्रतीनिधी राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री महाजन म्हणाले की, माहे मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली असून यात जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यात ७ कोटी २५ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गावअंतर्गत काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात महिलासह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नियमित वाढ झाली असून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूर रेल्वे स्टेशनमधून रिक्षाने घरी जाणाऱ्या महिलेचे पाच जणांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्या नराधमांनी तेवढ्यावरच न थांबता महिलेला बेशुद्ध होईपर्यंत तिचे लचके तोडून यूट्यूब आणि रिल्ससाठी अश्लील व्हिडीओही चित्रित केले. मिळालेली माहितीनुसार, पीडित महिला संत कबीरनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी रात्री ती बस्तीहून ट्रेनने गोरखपूरला पोहोचली. पहाटे तीन वाजता ती रेल्वे स्थानकावरून रिक्षाने नौसादला जात होती. त्याचदरम्यान नराधमांनी तिचे अपहरण केले. राजघाट पुलाजवळ पाच तरुणांनी रिक्षा थांबवून महिलेचे अपहरण केले आणि जबरदस्तीने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक शहरातून गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीसह तरुणी व महिला गायब होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच बाल लैंगिक शोषणाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांवर सखोल विवेचन केलं. महिला बेपत्ता होण्यात आणि बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र कितवा आहे याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. तसेच महिला बेपत्ता झाल्याच नाही पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केले. विधान परिषदेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. त्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालके गायब…
भडगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेच्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलिसांनी बंदोबस्तात आणले असता. यावेळी संशयितास आमच्या हवाली करा म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांशी गोंधळ घातला. त्यातच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे ३ पोलीस जखमी झाले आहेत. परिणामी पोलिसांनी लाठीचार्ज करीत गर्दी पांगवली आहे. यात पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे. यामुळे गोंडगावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुकयातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव एलसीबीने कसून तपास करीत त्याला जेरबंद केले. या संशयिताला कायदेशीर कार्यवाहीकरिता संध्याकाळी ५५ ते ६० फौजफाट्यासह…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून अनेक पर्यटक पर्यटन करण्यासाठी जात आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला होता. मात्र थंडी तसेच पावसात काकडल्याने एकाची प्रकृती खालावली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्यय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सहा…
मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मंगळवारी मध्यरात्री एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्याआधी 15 दिवसांपूर्वी त्यांनी जे केलं होतं ते फार कमी लोकांना जमतं. ते स्वत: आर्थिक अडचणीत असताना त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता मदतीचा हात पुढे केला. हा किस्सा सांगत असताना रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे हे देखील भावूक झाले. पंधरा दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेच्या दिवशी मध्यरात्री नितीन देसाई यांनी दाखवलेल्या तत्परतेच कौतुक करत रायगड पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंधरा दिवसांपूर्वीच इर्शाळवाडी गावावरती डोंगर कोसळून जवळपास 70 ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून एका प्रेमस्टोरीची मोठी चर्चा सुरु आहे. आज देखील ती चर्चा कुठेही थांबायचे नाव घेत आहे. ती म्हणजे पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतीय प्रेमी सचिनसाठी सीमा ओलांडून आली आहे. ती गुप्तहेर असल्याचा संशय असल्याने तिची चौकशी केली जात आहे. पण सध्या सीमा व सचिन या जोडप्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. दोघांना कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशातच आता सीमाला चित्रपटात काम मिळालं आहे. ‘युपी तक’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार, जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम सीमा हैदरला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक जयंत…
यावल : प्रतिनिधी येथे चोपडा रोडवरील मोमीन वाड्यात २ व ३ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस अंगावर चिखल उडण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. या घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेत सातजण जखमी झाले असून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना यावल येथून ग्रामीण रुग्णालयात प्राथक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेख फारूक शेख फिर्यादी याचा नातेवाईक शेख शोएब शेख शकील यांच्या अंगावर शेख शोएब शेख असलम याने चिखलाचे शिंतोडे उडवल्या रागातून बुधवारी कुरेशी मांडेवाला यांच्या दुकानासमोर सार्वजनिक…
धरणगाव : प्रतिनधी जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात निवडणुकविषयी मार्गदर्शन व नवीन मतदारांची नावनोंदणीचा कार्यक्रमाला सुरुवात झाली असून नुकतेच धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे येथील आबासाहेब सीताराम पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बैठक देखील झाली. धरणगाव निवडणूक नायब तहसीलदारसी.बी.देवराज यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.३ रोजी धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे येथील आबासाहेब सीताराम पाटील पॉलिटेक्निक कॉलेज येथे बैठक घेण्यात आली. यावेळी श्री.देवराज यांनी निवडणुकविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यात येऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपल श्री लाडवंजारी, आय टी आय कोलेजचे प्रिन्सिपल रोहित पाटील सर ,महेंद्र पवार (पिंटूभाऊ) तह.कार्या. व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

