नागपूर : वृत्तसंस्था राज्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना नियमित घडत असून यामध्ये तरुणांसह अनेकांचे खून घटल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. नुकतेच एका घटनेने नागपूर शहर देखील हादरले आहे शहरातील एका अठरा वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रासोबत काही वाद झाला त्या वादात भांडण इतक्या टोकाला गेला की थेट तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील नंदनवन परिसरातील हिवरे नगर परिसरात एका दारूच्या भट्टी समोरील मोकळ्या जागेत तुषार किशोर इंगळे (वय १८) हा आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता दारू पीत असताना सोबत असलेल्या तरुणांमध्ये काहीतरी वाघ वाद झाला या रागाच्या भरात संशयित आरोपींनी अठरा वर्षे तरुणाला संपवला आहे हे घटना पहाटेच्या सुमारास…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक समस्या बाबत शहरात नुकतेच आंदोलन देखील केले होते. त्यानंतर आता आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी थेट प्रभागात जात पाहणी करीत समस्या सोडवत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. यात अयोध्या नगरातील एका परिसरात आयुक्त गेले असता एका वृद्धा आजी बाईनी थेट माय, तु माह्या मुलीसारखी हाय, माह्या रस्ता करू दे…व! अशी प्रेमाने विनंती करीत एका आजीने जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना आपल्या घराजवळील रस्ता दाखविला. गायकवाड सोपानदेव नगरमध्ये पाहणी करीत होत्या. अविश्वास ठरावाच्या स्थगितींनंतर बुधवारी त्यांनी रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली. त्यांनंतर दि.२ रोजी दुसऱ्या महापालिका आयुक्त ॲक्शनमोडवर आल्या. सकाळी दहा…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अपघातामध्ये वाढ होत असतांना भुसावळ तालुक्यातील दीपनगरनजीक एका ५६ वर्षीयाच्या दुचाकीस भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील न्यू आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या सुधाकर वानखेडे (वय ५६) यांचा दीपनगराजवळील कपिलवस्तू नगरानजीक भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. वानखेडे हे भुसावळातील बी.एन.अग्रवाल कॉन्ट्रक्टर्स यांच्याकडे चालक म्हणून कामाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बुधवारी सायंकाळी वानखेडे हे दुचाकी (एम.एच.19-4649) ने भुसावळकडे निघाल्यानंतर कपिलवस्तू नगराजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव होंडा सिटी कार (एम.एच.19 बी.यु.7131) ने धडक दिल्याने वानखेडे यांचा जबर मार बसल्याने जागीच…
जळगाव – जळगाव जिल्ह्यात अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक अर्थात वाळू माफिया विरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने आता त्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेसाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून सहा पथकांच्या वाहनांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी हिरवी झेंडे दाखवून मोहिमेला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व त्याचा वाहतूक सुसाट सुरू होती. त्यामुळे वाळू माफियांची मुजरी दिवसेंदिवस वाढत होती. तसेच अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना देखील वाढत होत्या. तसेच नदी पात्रात बेनुसार वाळू उत्खनन केल्यामुळे नदी लगत असलेल्या गावांमध्ये भूजल पातळी कमी होत होती. अशा विविध तक्रारीवरून महसूल व पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी शाळेतून घरी जाणाऱ्या आईसह चार वर्षाच्या चिमुकलीसह भरधाव डंपरने उडविल्याची घटना घडली असून उपचारापुर्वी चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाला असून नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका आक्रोश केल्याचे पहायला मिळाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माऊली नगरातील रहिवासी असलेले योगेश नेमाडे हे आपल्या पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा यांच्यासह राहण्यासाठी आहे. त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) हि जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत आहे. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटी (एमएच १२ ईडब्ल्यू ८८२९) घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज धरणगाव तालुक्यातील बांभुरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय आयुक्तांच्या हस्ते एका शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची ई-पीक पाहणी ही करण्यात आली. बांभुरी बुद्रुक येथील रघुनाथ साहेबराव पाटील या शेतकऱ्यांच्या गट नंबर ३३३ वरील कापूस पिकांची ई-पीक पाहणी विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांची शिवार रस्त्यावर बैठक घेण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या महसूल विषयक विविध अडचणी, प्रलंबीत प्रकरणांची माहिती जाणून घेत या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. सातबारा उताऱ्यावरून पोटखराब क्षेत्र वगळले का…
बॉलिवूड कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देसाई यांचा फाशीमुळे मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. नितीन देसाई यांचे बुधवारी 4 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण फाशी असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील स्टुडिओमध्ये ते मृतावस्थेत आढळले. रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी रात्री माहिती दिली की, नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांचा अंत्यसंस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहे. स्टुडिओमध्ये सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राचे निसर्गकवी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी ना.धो.महानोर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी ८.३० वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला आहे. ना.धो.महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका पळसखेड येथे दि.१६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला आहे. मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर राष्ट्र पुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवाजीनगर हुडको भागातील एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला व शिवाजी नगर हुडको परिसरातील रहिवासी प्रशिक दीपक ससाने ( वय १८) हा १ ऑगस्ट रोजी त्याच्या मोबाइलमध्ये इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना एका अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केलेला दिसला. सदर व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून तीन दिवसांपूर्वी अश्लील व आक्षेपार्ह कमेंट केलेली होती. सदर कमेंट ही राष्ट्रपुरुषांविषयी असल्याची खात्री झाल्याने तरुणाने समाज बांधवांना सांगितले. शिवराळ भाषेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, दोन समाजात…
चोपडा शहरातील बसस्थानकावर जळगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत खिसेकापूने एका प्रवाशाच्या पँटच्या डाव्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ३१ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चोपडा शहरातील शिव कॉलनीतील रहिवासी भय्यासाहेब विजय पाटील (३४) हे दुपारी १२ वाजता कामानिमित्त जळगाव जाण्यासाठी बसस्थानकावर आले. बसची वाट बघत असताना चोपडा धरणगावमार्गे जळगाव बस (एमएच २० बीएल १४०७) प्लॅटफार्मवर लागली असता प्रवाशांच्या गर्दीत पाटील जळगावला जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात खिसेकापूने त्यांच्या पँटच्या डाव्या खिशातून २० हजार रुपयांच्या नोटा लंपास केल्या. खिसा कापला गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले; परंतु तोपर्यंत अज्ञात चोरटा फरार झाला…

