धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील गंगापुरी गावातील दलित वस्ती अंतर्गत असलेले सार्वजनिक शौचालयाची पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहिरीची वरचा लोखंडी पाईप व सत्तर फूट वायर व फिल्टरची प्लॅनरची कॉइन बॉक्स चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मौजे गंगापुरी येथे दलित वस्ती अंतर्गत सार्वजनिक शौचालयावरील सेलिस्टच्या पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहिरीवरील लोखंडी पाईप तसेच सत्तर फूट वायर टाटा व फिल्टर प्लॅनर कॉइन बॉक्स कुलूप तोंडून आतील चिल्लर चोरांनी इत्यादी साहित्य लंपास केले असून अनोळखी चोरांना योग्य लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई व्हावी यासाठी पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रामस्थांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रात प्रधानमंत्री, रमाई, शबरी यांसारख्या योजना मार्फत ग्रामीण भागातील लोकांना घरकुले दिली जातात. आता मोदी आवास योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सदरील लाभार्थीना पूर्ण सहकार्य करून त्यांच्या स्वप्नातील घरे पूर्ण करीत असतात. परंतु त्यांना किमान वेतन ही लागू नाही, त्यांना मिळणारे २०१६ पासून अत्यंत तटपुंजे प्रती घरकुल ७५०/- रुपये मानधन मिळत असून त्यातही जाचक अटींचा समावेश आहे. ते देखील वर्ष – वर्ष मिळत नाही त्यामुळे सदरील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे बेरोजगार युवकांवर एकप्रकारे मुघली अन्याय – अत्याचार करीत आहे. ग्रामीण गृहनिर्माण अभियंतांना आजच्या महागाईच्या विळख्यात प्रपंच चालवणे कठीण जात असून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणीसह अल्पवयीन मुली महिला यांना पळवून नेण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायला सुरू झाले आहे. यातच एक कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. एक २४ वर्ष तरुणी सुट्टी झाल्यावर आपल्या दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाली असता पण मूळ गावी चक्क पोहोचली नसल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर तिचा मृतदेह देखील सापडल्याने हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. काय घडली घटना कोकणातील चिपळूण तालुक्यातील ओंबली गावाचे रहिवासी असलेले 24 वर्षे तरुणी नोकरी निमित्त दापोलीत राहत होती दापोलीत राहून बँकेत नोकरी करून आपल्या आई-वडिलांना शनिवारी व रविवारी बँकेला सुट्टी असल्याच्या…
धरणगाव : प्रतिनिधी बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान माननीय नायब तहसीदार लक्ष्मण सातपुते व सहाय्यक गट विकास अधिकारी कैलाश पाटील तसेच प्रकल्प अधिकारी वर्ल्ड व्हिजन इंडिया जितेंद्र गोरे यांच्या हस्ते बाल विवाह थांबवणे जनजागृती अभियान मोहीम कार्यास हिरवे झेंडे दाखवून कार्यक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. या वेळेस महसूल विभाग व पंचायत समिती येथील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. हे जनजागृती अभियान धरणगाव तालुक्यातील एकूण 30 गावामध्ये हे अभियान राबवण्यात येईल. या वेळेस माननीय नायब तहसिलदार तथा दंडाधिकारी लक्ष्मण सातपुते साहेबांनी या जाणीव – जागृती अभियानाला शुभेच्छा देऊन बाल विवाह थांबवला पाहिजे या शासनाच्या अभियानाला आपण सगळ्यांनी हात भार लावला पाहिजे व…
जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील एका गावात पत्नीने बाजार करून आणण्यास सांगितले असता याचे पतीला वाईट वाटल्याने त्याने पत्नीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात पती विरोधात पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहुर पेठ या गावी एका ३५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून ती शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे. दिनांक ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास सदरील महिलेने आपल्या पतीला बाजार करून आणणेबाबत बोलली असता या बोलण्याचे पतीला वाईट वाटल्याने त्याने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला लाथा बुक्क्यांनी पाठीवर व तोंडावर मारहाण करीत पत्नीच्या तोंडातील दात पाडले जर तू यापुढे मला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात सुरु असलेल्या जबरी चोरीसह घरफोडीतील एका चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून अटक केली आहे. चोरीतील मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला असून संशयिताला जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अरबाज आरीफ पटेल (जाम मोहल्ला, भुसावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात एकाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित भुसावळातील असल्याचे स्पष्ट होताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील हवालदार विजयसिंग पाटील, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन, ईश्वर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून घरफोडीचे प्रमाण वाढत चालले असून यात पुन्हा एकदा भर पडली आहे. शहरातील अयोध्या नगर परिसरात जबरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील रामचंद्र नगरातील रहिवासी नरेंद्र मानसिंग पाटील (वय ३२) हे व्यापारी असून त्यांच्या बंद घरातून दरवाज्याची कडी व कोंडा चोरून बेडरूम मधील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या ,कानातील साखळ्या, सोन्याची चैन ,चांदीचे ब्रेसलेट ,पैंजण ,चांदीचे कडे , आदी सोन्या-चांदीचा एकूण 41 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची घटना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटननेमध्ये नियमित वाढ होत असतांना आता हरियाणातील नूह जिल्ह्यात हिंसाचार सुरु झालेला असून राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरताना दिसत आहे. सोमवारपासून सुरु झालेला हिंसाचार बुधवारीही सुरु आहे. हरियाणाच्या गुरुग्रामसह इतर काही जिल्ह्यातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहे. हरियाणातील अशांत परिस्थिती पाहता देशाची राजधानी दिल्लीमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्लीच्या अनेक भागात पोलिस आणि पॅरामिलिट्री तैनात करण्यात आली आहे. कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी ही तयारी केली जात आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी VHP दिल्ली-फरीदाबाद रस्ता बंद केल्याची माहिती आहे. बदरपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले…
मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीवर एक मोठी शोककळा पोहचली असून नुकतेच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी 2 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे चार वाजता गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सफाई कामगार सफाईसाठी त्यांच्या रुममध्ये गेला असता नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. नितीन देसाई यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’,…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्याच गावातील अल्पवयीन मुलाने पळवून नेत अत्याचार केला होता. शिवाय मोबाइल मधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला होता. पोलिसांनी तपासात ज्या ठिकाणी पीडितेवर अत्याचार करण्यात आला, त्या खोलीच्या महिला मालकांचा शोध घेत त्यांना या गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांना अटक केली आहे. संशयित महिला अल्पवयीन मुलांना शरीरसंबंधासाठी पाचशे रुपये घेऊन खोली उपलब्ध करून देत असल्याने त्यांना आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शीतल ज्ञानेश्वर राठोड (५१) व लताबाई दीपक पाटील (४५, दोन्ही मालेगावरोड, चाळीसगाव) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी…

