मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून अनेक अल्पवयीन मुला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याने त्यांच्या सोबत अनेक धक्कादायक घटना घडू लागल्याचे प्रमाण वाढत आहे. रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात सेक्सटॉर्षणची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर ओळख करत तरुणाला सेक्सटॉर्षणमध्ये अडकवण्यात आले. यानंतर वारंवार धमकी देत आणि ब्लॅकमेल करत त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात येत होती. अखेर या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशनराम भंवरलाल पातीर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राजस्थानमधील टोळीने चिपळूणमधील 19 वर्षीय तरुणाशी सोशल माडियाच्या माध्यमातून ओळख केली.…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सतत घडत असतांना आज पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. आठ वर्षांच्या मुलीशी तिच्या चुलत्याने अश्लील वर्तन केले. हा प्रकार माहिती असूनही पतीने लपवून ठेवला म्हणून पीडितेच्या आईने पतीसह, दीराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. जेलरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील पीडितेच्या पित्यास अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागामध्ये पीडितेची आई तिच्या तीन मुली आणि पतीसह राहते. तिन्ही मुली झाल्याने पतीशी भांडण होऊन १२ ऑगस्टपासून पीडितेची आई व मुली वेगळे राहतात. पीडितेची आई खासगी नोकरी करते. आठ वर्षांच्या मुलीला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका गावात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. हर्षल विनोद राजपूत असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, अशोक पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी गोपनीय माहितीवरून ही कारवाई…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पथकाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील पिंप्री सिम येथील सुनील भिल यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात रक्षाबंधनाचा उत्सव सुरु असून या सणाच्या निमित्नाने भाऊ-बहिणीचं प्रेम दृढ होतं. मात्र सणाचा हाच दिवस एका बहिणीसाठी आयुष्यातील अतिशय वाईट,काळा दिवस ठरला. तेलंगण येथील एका महिलेसाठी सणाचा हा दिवस आनंद नाही तर जन्मभराचं दु:ख घेऊन आला. तिथे रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलेच्या भावाचा हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. त्यानंतर शोकाकुल बहिणीने तिच्या भावाच्या मनगटावर अखेरची राखी बांधली. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली घटना तेलंगणामधील पेद्दापल्ली गावातील आहे. तेथे हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून सर्वच हबकले. तेथे एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली. ते पाहून सर्वांनाच अश्रू अनावर…
धरणगाव : प्रातिनिधी शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पारधी वाडा येथे एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे (पारधी वाडा, धरणगाव) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले. यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असताना रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. लोखंडी कपाटातील 20 हजार रुपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील एका २४ वर्षीय विवाहितेला मुलाला मारण्याची धमकी देत एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विवाहिता आपल्या मुलासह वास्तव्यास असून ती शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते 29 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडीतेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पतीने पाहिल्यानंतर भयानक कृत्य उत्तर प्रदेशमधील रायबरेलीत घडले आहे. रामविलास (३८) या व्यक्तीने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रागाच्याभरात तिला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली आहे. मयत महिलेचं नाव मिथिलेश असून तिचा प्रियकर लक्ष्मी शंकर हा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्याचे प्राण वाचले. या भयावह घटनेनंतर पोलिसांनी रामविलास याला अटक केली आहे, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे रामविलासला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं की, तो सोमवारी रात्री घरी परतला तेव्हा त्याला त्याची पत्नी मिथलेश एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. पोलिसांनी सांगितलं की, शेजाऱ्यांनी रामविलास यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात अक्षय ठुबे राहत होता. अक्षय ठुबे याच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा उपशाखा प्रमुख पदाची जबाबदारी होती.अक्षय 29 तारखेपासून गायब होता, तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. त्यानंतर काल रात्री त्याचा मृतदेह सापडला आहे. आर्थिक देवाणघेवाण यातून ही हत्या झाल्याचं समोर आले आहे. ठाण्यातील चीतळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील मुख्य मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३९ लाख रुपये असलेले अख्खे एटीएम मशीनच चोरट्यांनी बुधवारी पहाटे लंपास केले. या घटनेनंतर पोलिसांची शोधपथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजचीही तपासात मदत घेतली जात आहे. कळंब शहरातील ढोकी रोडवरील एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविलेले आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी ३९ लाख रुपयांसह एटीएम मशीन लंपास केल्याचे सकाळी समोर आले पोलिसांनी या भागाची पाहणी केली असता एका वाहनात दोरीच्या साहाय्याने ही मशीन उचकटून चोरटे घेऊन गेले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सीसीटीव्हीत संशयास्पद रिक्षा चोरी झालेल्या परिसरातील एका दुकानाच्या…

