अमरावती : वृत्तसंस्था जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपकडून या चर्चांचे ठाम शब्दांत खंडन करण्यात आले आहे. भाजपचे नेते अभय माथने यांनी भाजप–एमआयएम युती असल्याची माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट केले. अचलपूर नगरपालिकेतील शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी एमआयएमच्या नगरसेवकाची निवड झाल्यानंतर भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, यासंदर्भात अभय माथने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अचलपूरमध्ये भाजपकडून उमेदवार निवडीत चूक झाल्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. एमआयएमच्या उमेदवाराची सभापतीपदी निवड झाली असली, तरी भाजप आणि एमआयएम यांच्यात कोणतीही युती झालेली नाही. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवारांनी…
Author: editor desk
मुंबई : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर २०२५ चा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींच्या खात्यात मतदानापूर्वीच प्रत्येकी १,५०० रुपये जमा होणार आहेत. तसेच तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १ जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा लाभ जमा करण्यात आला होता. डिसेंबरचा लाभ मकरसंक्रांतीला देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र १५ जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुका असल्याने विरोधी पक्षांनी हरकत घेतल्याने…
पारोळा : प्रतिनिधी अतिवृष्टी व सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील चोरवड येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २१ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सतत होणारी नापिकी, कमी- अधिक पाऊस व शेतीमालाला भाव येत नसल्याने व कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी वाल्मीक अजबराव पाटील (वय ४५) यांनी १८ रोजी आपल्या स्वतःच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना तत्काळ नातेवाईकांनी धुळे जिल्ह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २१ रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मलावली. याबाबत धुळे येथे अकस्मात मृत्यूची नोंद…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे पुष्पाबाई काशीनाथ पाटील (रा. फूलगाव, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा महेंद्र पाटील हा जखमी झाला. हा अपघात २० जानेवारी रोजी साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील महेंद्र पाटील हे आई पुष्पाबाई यांच्यासह दुचाकीने जळगावकडे येत होते. साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात पुष्पाबाई पाटील या यांचा मृत्यू झाला. तसेच महेंद्र पाटील हे जखमी झाले. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रशांत…
जळगाव : प्रतिनिधी विभागीय आयुक्तांकडे भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करून परत येत असताना माजी महापौर तथा नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा मालेगावजवळ भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालंबाल बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ नगरसेवक बुधवारी गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामध्ये महाजन दाम्पत्याचाही समावेश होता. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परतीच्या प्रवासात मालेगावच्या अलीकडे भरधाव वेगाने जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार…
आजचे राशिभविष्य दि.२२ जानेवारी २०२६ मेष राशी व्यवसायात एखाद्या व्यक्तीमुळे फायदा होण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे तुमचा उत्साह दुप्पट होईल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल. आज एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे तुमचे वेळापत्रक बदलू शकते. आधी सुरू केलेली बहुतेक कामे आज अखेर पूर्ण होतील. वृषभ राशी तुमच्या नियोजनानुसार महत्वाच्या कामाची प्रगती होत असल्याने, तुमचे मन एकाग्र राहील. सामाजिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. आज जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यावसायिक भागीदारी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. मिथुन राशी महिलांचा दिवस खूप छान जाईल. आज व्यावसायिक महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहू शकतात. तुम्ही कोणाकडून घेतलेले कर्ज परत फेडाल, डोक्याचं टेन्शन मिटेल. कर्क राशी आज तुम्ही ऑफिसमध्ये फोनचा…
नाशिक : प्रतिनिधी रिक्षा प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर करून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केल्यानंतर वाऱ्यावर सोडून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात राहुल संतोष यादव (वय २५, रा. बालाजी नगर) याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्षा प्रवासात तिची संशयित राहुल यादव याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. संशयिताने मुलीचा मोबाईल क्रमांक घेत चॅटिंग व संभाषण करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे वचन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेतील सत्तासंघर्षासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही सुनावणी आता शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी शुक्रवारीही सुनावणी होण्याची शक्यता नसल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर उपरोधक प्रतिक्रिया दिली आहे. “माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अपेक्षेप्रमाणे तारीख पुढे ढकलल्याबद्दल जाहीर आभार!” असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली. यापूर्वी मंगळवारीही त्यांनी ट्विट करून, “37 नंबरचे मॅटर कधी बोर्डावरच येणार नाही. भाबडा आशावाद सोडून ताकदीने लढूया,” असे म्हटले होते. आज पुन्हा ट्विट करत त्यांनी, “आज सुनावणी झाली असती…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेतील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. एका लहानशा गावातील विद्यार्थिनीने थेट सत्तेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत आपली व्यथा पोहोचवल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शाळेत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे, स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब असून अनेक वेळा ती वापरण्यायोग्य नसल्याचे तिने नमूद केले आहे. वर्गखोल्यांची अवस्था बिकट असून छत गळते,…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील हा वाद राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात असून, त्याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीसाठी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या दैनिक कार्यसूचीत क्रमांक 37 वर होती. त्यामुळे…

