मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. अनेक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मोठी घोषणा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता कमाल रशीद खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तो मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा संध्याकाळी केआरकेला ओशिवरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत केआरकेने गोळीबार त्याच्या परवानाधारक बंदुकीतूनच झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याची बंदूक जप्त करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. १८ जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीतील एका निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोन गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेमधील दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी मोहीम आता तीव्र झाली असून, दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत मोठी तफावत आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आतापर्यंत १३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन निश्चित मानले जात असून, यामध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निलंबनाबाबतचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे सादर करण्यात आले असून, यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात अनेकजण प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. तपासणी प्रक्रियेनंतर संबंधितांचे अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त होत असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे. प्रशासनाची कारवाई केवळ निलंबनापुरती मर्यादित राहणार नसून,…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेले आव्हाणे येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादातून सागर अरुण बिन्हाडे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना, २२ जानेवारी रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या उमेश सपकाळे (वय २०) याला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत इतरही काहींचा सहभाग असल्याचा दावा करत मयताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. यावेळी संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या सपकाळे याने सागर बिन्हाडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने सागर यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मयताची…
आजचे राशिभविष्य दि.२४ जानेवारी २०२६ मेष राशी आज, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने, तुमच्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील. तुमचे वर्तन सुधारण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची हीच वेळ आहे. तुम्ही ताकदीने नवीन सुरुवात कराल. नव्या प्रोजेक्टसाठी मस्त आयडिया सुचेल. वृषभ राशी आज कुठेतरी अडकलेले जुने पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या राशीखाली जन्मलेल्या कला विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या मित्रासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. मिथुन राशी आज व्यवसायातील बारकावे समजून घेणे महत्वाचे आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. आज तुमची खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा तुमचा उत्साह वाढवेल.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधान इतिहासाची मोडतोड व विकृतीकरण करण्यात तज्ञ असल्याचा आरोप करत, गेल्या महिन्यात संसदेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान राष्ट्रगीताच्या इतिहासाचा अपलाप करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदी पद्धतशीरपणे महात्मा गांधींच्या स्मृती आणि वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेत राष्ट्रगीतावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी ‘उघड’ झाल्याचा दावाही त्यांनी केला. आज, २३ जानेवारी २०२६ रोजी देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती…
मुंबई : वृत्तसंस्था २२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौर बसवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असून अनेक नावांची चर्चा रंगू लागली आहे. तर उपमहापौरपद शिंदेसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. “एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता…
जळगाव : प्रतिनिधी गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचत आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्य संपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, भिवपूर, दानापूर व पिंपळगाव रेणुकाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र खासगी बाजारात दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नाफेड व खासगी व्यापाऱ्यांच्या दरात १०० ते २०० रुपयांचा फरक असून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, या नवीन प्रकरणाने संपूर्ण बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकली नेहमीप्रमाणे शाळे सुटल्यानंतर स्कूल व्हॅनने घरी परतत होती. याच प्रवासादरम्यान नराधम चालकाने तिला आपल्या पाशवी वासनेचे शिकार बनवले. घरी पोहोचल्यानंतर या घाबरलेल्या चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या…

