जळगाव : प्रतिनिधी गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचत आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्य संपन्न होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले .या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, भिवपूर, दानापूर व पिंपळगाव रेणुकाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र खासगी बाजारात दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नाफेड व खासगी व्यापाऱ्यांच्या दरात १०० ते २०० रुपयांचा फरक असून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर स्कूल व्हॅनच्या चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेच्या जखमा ताज्या असतानाच, या नवीन प्रकरणाने संपूर्ण बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकली नेहमीप्रमाणे शाळे सुटल्यानंतर स्कूल व्हॅनने घरी परतत होती. याच प्रवासादरम्यान नराधम चालकाने तिला आपल्या पाशवी वासनेचे शिकार बनवले. घरी पोहोचल्यानंतर या घाबरलेल्या चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या…
जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसतांना अक्षय शरद सकट (वय २२, रा. अर्जुन नगर, हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या मित्राला तिघांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेला दगड त्याच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजीवगांधी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारे अक्षय सकट हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २० जानेवारी रोजी राजीव गांधी नगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास तेजस लोंढे, सितेश लोंढे व गणेश लोंढे या तिघांनी काहीही कारण नसतांना अक्षय व त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत सासुरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या सात वर्षांपासून पत्नी व चार मुलांसह आव्हाणे येथील सासुरवाडीला राहण्यासाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचा गावातील काही तरुणांसोबत किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील ओम नगर परिसरातील एका तरुणाला बनावट ‘एसबीआय योनो’ लोगो असलेल्या फाईलद्वारे ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांना गंडविण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय धर्मराज चव्हाण (३५, रा. ओम नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि.१७ जानेवारी २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने ‘आधार केवायसी अपडेट’ नावाने एक संशयास्पद फाईल पाठवली होती. ही फाईल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने विजय यांच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून खात्यातील शिल्लक रक्कमच चोरली नाही, तर त्या खात्याशी संबंधित असलेली एफडीदेखील परस्पर मोडून सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. एकूण ५ लाख…
भुसावळ : प्रतिनिधी चारचाकी वाहनाचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार डिव्हायडर तोडून उलटली. त्याचवेळी ही कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धडकली. यात भुसावळ येथील तरुणीचा मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, झोया नदीम पठाण (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे तर वाहनचालक अरबाज खान (२६, रा. खडका रोड, रजा टॉवर परिसर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. जळगावहून भुसावळकडे येणारी कार नशिराबाद टोलनाक्याजवळ पोहोचली असता अचानक वाहनाचे पुढील टायर फुटले. त्यावेळी हा अपघात घडला. जखमी तरुणास गोदावरी…
आजचे राशिभविष्य दि.२३ जानेवारी २०२६ मेष राशी आज, रखडलेले व्यावसायिक प्रकल्प पुन्हा सुरू केल्याने तुम्ही व्यस्त व्हाल. आज ऑफीसमध्ये नेमलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा वरिष्ठांकडून फटकारले जाऊ शकते. जोडीदाराबाबत लाँग ड्राइव्हला जायचा प्लान बनू शकतो. वृषभ राशी आज तुमचा व्यवसाय फायदेशीर राहील. पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज काम करणाऱ्यांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांना आज स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगले निकाल दिसतील. मिथुन राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कोणालाही पैसे देताना सावध रहा, 4 वेळा विचार करा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून ऑफीस प्रोजेक्टच्या कामात सहकार्य मिळेल. कर्क…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भादरवाह भागात गुरुवारी भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. उंचावरील पोस्टकडे जात असलेली भारतीय सैन्याची बुलेटप्रूफ गाडी सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले, तर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनामध्ये एकूण 17 जवान प्रवास करत होते. भादरवाह परिसरातील अरुंद व वळणदार रस्त्यावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन खोल दरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच लष्कर व पोलिसांच्या पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. दुर्गम परिसर असूनही स्थानिक नागरिकांनी देखील रेस्क्यू टीमला मोलाची मदत केली. दीर्घकाळ चाललेल्या बचाव कार्यादरम्यान 10 जवानांचे…
चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस (स्वित्झर्लंड) येथे घडला. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, महाराष्ट्र शासनाने SAF प्रकल्पासाठी अमेरिका स्थित सॅन फॅन्सीस्को येथील ACTUAL HQ या कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार असून, यामुळे तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद…

