नाशिक : वृत्तसंस्था देशभर दिवाळी साजरी होत असतांना अभिनेता सलमान खानचा टायगर ३ हा सिनेमा सुरू असताना काही इस्मानी चित्रपटगृहामध्ये फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मालेगाव मध्ये घडला होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर-३ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे पडद्यावर आगमन होताच चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजी केली. अचानक फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरून पळापळ झाली. पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला. यानंतर चित्रपटगृह मालकाने त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीतून ७७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसीतील भाग्यश्री अॅण्ड संकेत चटई कंपनी आणि त्यांच्याच बाजूला असलेली हेमंत काशिनाथ बऱ्हाटे यांचे महालक्ष्मी इलेक्ट्रिक दुकान हे दिवाळीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. कंपनी आणि दुकान बंद असल्याचा फायदा घेत शुक्रवारी १७ नोव्हेंबर रात्री १० वाजेपासून ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चटाई कंपनी व दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत इलेक्ट्रिक मोटारी, वेल्डिंग वायर केबल, ग्राइंडर मशीन, छोटी गॅस हंडी,…
जळगाव : प्रतिनिधी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाने समोर जाणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिल्याने ते रस्त्याच्या कडेला उतरले व चालक राजेंद्र सुभाष महाजन (वय २५, रा. नागोबामठी जवळ) हे जखमी झाले. हा अपघात दि. १० नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे रेल्वे पुलाच्या पुढे झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील नागोबामठीजवळ राजेंद्र महाजन हे वास्तव्यास असून (एमएच १९, सीवाय ६४३९ ) क्रमांकाचे वाहन घेऊन जात असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या मालवाहू वाहनाच्या (एमएच १९, सीवाय ८७४६ ) चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात या वाहनाची महाजन यांच्या वाहनाला धडक बसली व ते रस्त्याच्या खाली उतरले. त्यात महाजन…
रावेर : प्रतिनिधी रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने त्यातील २० प्रवासी सुरक्षित आहेत. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना रावेर-सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या तर व काही जणांनी आपल्याकडील सामान फेकून दिले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी डिकीतील प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. रावेर पुणे ही लक्झरी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवासी घेऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रावेर येथून निघाली. दरम्यान, ही बस वडगाव ते वाघोदादरम्यानच्या सुकी नदीच्या पुलाजवळून…
मलकापूर : वृत्तसंस्था शहरातून पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात मोताळा तालुक्यातील चिंचपूर फाट्यानजीक झाल असून या अपघात ७ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर बोराखेडी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात येऊन बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात चिंचपूर फाट्यावरील कमानीनजीक घडला. बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली व अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तर काहींच्या सांगण्यानुसार बसचालक भ्रमणध्वनीवर बोलत होता. त्यावेळी समोर दुचाकी आल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील विनोद जवरीलाल पाटील हे हवालदार या पदावर अभिमानाने देश सेवेचे काम करीत असतांना ते दि. १७ नोव्हेबर २०२३ शुक्रवार रोजी कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांच्यावर रोटवद येथील मूळगावी शासकीय इतममात रोटवद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हे ८ ऑगस्ट २००२ रोजी ते सेनेत भर्ती झाले होते. तर दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त ही झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जात असताना काल दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी शुक्रवार आकस्मित निधन झाले. आज सकाळी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाल्याचे…
धरणगाव : प्रतिनिधी देशात सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण धरणगावातील स्व.सलीमभाई पटेल यांच्या कार्यालयाजवळ येथे दुपारी २ वाजेपासून सुरु होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव शिवसेनेच्या शाखेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. हा सामना धरणगावकरांनी सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी आयोजन केले आहे. रविवारी, १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे.…
जळगाव : प्रतिनिधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील ९ तांड्यामध्ये तर धरणगाव तालुक्यातील एका तांडा वस्तीत अश्या १० तांडा वस्तीत विविध विकास कामांसाठी १ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधीही वितरीत करण्यात आला आहे. “ वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना” ही तांडा वासियांना वरदान ठरत असून यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्यामुळे तांडा वासियांना मोठा दिलासा मिळाला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरे सुरु असतांना त्यांनी नुकतेच इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे. मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून…
अकोला : वृत्तसंस्था राज्यभरात अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत असतांना पुन्हा एकदा अकोला शहरातून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला. हि घटना अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात ११ वर्षीय पीडित मुलगी वास्तव्यास असून पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने…

