भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी (ता.१३) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीने मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख यांचा विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देत असे सांगत एक लाख बहात्तर हजार रुपयात फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिल्लत नगर मधील रहिवासी नसिम अख्तर अब्दुल सुभान शेख (वय ७५) हे दि.१३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जवाहर डेअरी जवळ सार्वजनिक जागी संशयित आरोपी एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील तोंडाला रुमाल लावलेला नाव गाव माहिती नाही. याने फिर्यादीचा विश्वास संपादन…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी भाऊबीजेला भाऊ आणि बहिणींच्या नात्याला मोठे महत्व असून भाऊबीजेच्या दिवशीच तरुण भाऊ गमावल्याने दिवाळीच्या सणावर पूर्णपणे विरजण पडले. बहिणींना भाऊबीजच्या दिवशीच भावाच्या अकाली निधनाच्या बातमीने धक्काच बसला. जामनेर येथील मूळ रहिवासी व धुळे येथे स्थायिक झालेल्या दत्तात्रय सोनार यांचा चाळीसगाव येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील मूळ रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक झालेले दत्तात्रय काशिनाथ सोनार (वय ४२) यांचा चाळीसगाव येथे चारचाकी वाहनातून जाताना हृदयविकाराने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जामनेर व धुळे येथील त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत दत्तात्रय सोनार यांचा भाऊबीजेच्या शुभ दिनीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाने हृदय हेलावून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद नेहमी अनेक वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकत असते. सध्या उर्फी जावेद अडचणीत आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदचा पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता उर्फी जावेदने आज ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे. प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्यासाठी उर्फी जावेद काहीही करत असते. नवनवीन फंडा ती वापरत असते. पण आता उर्फीला प्रसिद्धीसाठी वापरलेला फंडाच भारी पडला आहे. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडवाला…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – पाचोरा रस्त्यावर असलेल्या वावडदा परिसरातील एका शेतात मध्यरात्रीच्या सुमारास शेताची रखवाली करीत असलेल्या ५२ वर्षीय पांडुरंग पंडित पाटील यांचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी ट्रॅक्टर देखील लांबवले होते. पहाटे घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक करत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास या खुनाच्या घटनेची उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव (चार्ज) ऋषीकेश रावले यांनी एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ हा गुन्हा उघडकीस आणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक घरात पाल पाल आणि झुरळ असतात पण घरातील काहीना हे पाहिले कि घाम फुटत असतो. मग विचार करा जर तुमच्या घरात एखादा छोटासा कीटक नव्हे तर भलामोठा किंग कोबरा असेल तर. आपल्यापैकी अनेकांना हे वाचूनच भीती वाटली असेल ना ? साप हा असा सरपटणारा प्राणी आहे,जो कधीही कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक भलामोठा साप चक्क एका किचनच्या सिलिंगमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो चक्क…
वाशीम : वृत्तसंस्था राज्यभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना वाशिम शहरातून एक क्लिनिकला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिकला लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नसल्याचे घटनास्थळावरुन सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिक आहे. या क्लिनिकला रात्री बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीची माहिती वाशिम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग पूर्णपणे विझविली. या आगीत क्लिनिक…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षापासून मोठी गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच एका भाजपचे पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची एका हत्या केलायची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) या दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करत होते. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी राजू डेंगरे यांच्याशी पैशांची मागणी केली. गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडून प्रत्येकी ६…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ रेल्वेमधील प्रवासादरम्यान झालेल्या छोट्या मोठय भांडणाचे व्हायरल होत असतांना नुकतीच एक घटना छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रेनमधील समोर आलीय. ट्रेन लातूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आली असता खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीसोबत वडापाववरून वाद झाला. मात्र, हा वाद त्या प्रवाशाला चांगलाच महागात पडला. त्या प्रवाशाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालाजी दिगंबर जानोळे असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. बालाजी दिगंबर जानोळे हे आपली पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादला जाण्यासाठी ट्रेनमध्ये…
बारामती : वृत्तसंस्था राज्यभर गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या तरुणाचे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. चंद्रकांत वाघमोडे या युवकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची हाक देण्यात आली. या बंदला बारामतीत उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला…
बुलढाणा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नेहमीच बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग असो कि राष्ट्रीय महामार्ग क्र.६ असो नेहमीच काही ना काही छोट्या मोठ्या अपघातामुळे हे दोन महामार्ग चर्चेत येत असतांना भाऊबिजेच्या दिवशी देखील अशीच एक भयानक अपघात मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुण तर कल्याण येथील एक तरुण ठार झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला…

