जामनेर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे मध्य प्रदेशातून जाणाऱ्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनासह ४५ लाखांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सत्र सुरू होते. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एच.आर.५५/डब्ल्यू ४९८० क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमध्ये देवास, मध्य प्रदेश येथे माल भरण्यात आला. हा ट्रक मध्य प्रदेशातून पहूर मार्गान छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली. त्यानुसार पथकाने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून मालवाहू ट्रक ताब्यात घेतला.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरील कन्हान रेल्वेस्थानकावर तिसरा रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळकडून धावणाऱ्या एलटीटी हटिया एक्स्प्रेसचाही समावेश आहे.क्र. २२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस १२ डिसेंबर, क्र. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ११ डिसेंबर रोजी, तर क्र. १३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस १२ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस ११ डिसेंबर, तर क्र. १२९०१ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस ११ व १२ डिसेंबर रोजी, क्र.१२९०२ शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ११, १३ व १४ डिसेंबर रोजी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका भीषण अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात टायर फुटल्याने उत्तराखंडहून आलेल्या डंपरची धडक बसल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाला उपस्थित लावून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेलं. ही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्यामुळे वातावरण तापले होते तर आता आ.रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे देखील वातावरण तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. दरम्यान रोहित पवाार पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना…
नागपूर : वृत्तसंस्था तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे. राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असून शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजप व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे, विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब…
पुणे : वृत्तसंस्था मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेले तर तुम्ही हातात बंदुका घेऊन केवळ बघ्याची भूमिका घेणार आहात का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचे…
जळगाव : प्रतिनिधी घरात वायरिंगचे काम करतांना विजेचा शॉक लागून प्रौढ जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे विजय वसंत वाघ हे वास्ताव्यास आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास विजय वाघ हे त्यांच्या घरात वायरिंगचे काम करीत होते. त्यांना विजेचा धक्का लागल्याने विजय वसंत वाघ (४५, रा. मोहाडी, ता. जळगाव) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील शिवरे येथील २९ शेतमजुरांना शेतातील अशुद्ध पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली. तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चेतन पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. या मजुरांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, यातील एक वर्षाच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने पुढील – उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे. शिवरे येथील शेत शिवारात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथील शेतमजूर कामासाठी आलेआहेत. शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी ते पिल्यामुळे त्यांना मळमळ होऊ लागली तर काहींना वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून…
जळगाव : प्रतिनिधी मालवाहून रिक्षा घेवून जात असलेल्या रिक्षा चालकाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मारहाण केली. त्यानंतर रिक्षा चालकाच्या खिशातील रोकड आणि महत्वाचे कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत पहून गेले. ही घटना शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाल एकनाथ शिंदे यांच्याकडे मालवाहू रिक्षा आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोपाल शिंदे हे एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोरुन जात होते. यावेळी दुचाकीवरुन दोन तरुण त्यांच्याकडे आले. त्यांनी रिक्षा चालक शिंदे पकडून खाली उतरविले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशातून…
अमळनेर : प्रतिनिधी भावाला मारून टाकण्याच्या धमक्या देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमळनेर शहरात घडली. या आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असे. ही मुलगी क्लाससाठी जात असताना ‘फोन करत जा; नाहीतर तुझ्या लहान भावाला मारून टाकीन’, अशी धमकी देत असे. दि. ७ डिसेंबर रोजी त्याने भावाच्या मोबाइलवर फोन करून ‘मला भेटायला ये’, असे सांगितले. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्याने त्या दोघांनी तडक पोलिस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

