Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील अनेक ठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतांना नुकतेच दुचाकीने घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे रत्ना छगन वाडेकर (वय ५५, रा. सिंधी कॉलनी) या जखमी झाल्या. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात रत्ना वाडेकर या वास्तव्यास आहे. त्या आपल्या दुचाकीने ( एमएच १९, एपी ३२५२) ने घरी जाण्यासाठी निघाल्या. काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे येताना भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेला रस्त्यावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकारे रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगाना राज्यातील कोयागुड्डू मंडळ येथील मिलवकुमार पुनम (वय-२८) आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र बुकीया हरिलाल हे दोघे जण सोमवारी रोजी सकाळी ९.३० वाजता भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाका…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने विरारच्या सराफाला भुसावळात बोलावून दोघा भामट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तातल्या सोन्याच्या आमिषाला सराफा पडला बळी विरारमधील सराफा व्यावसायीक राजकुमार जवाहर सोनी (38, विरार ईस्ट, रामू कम्पाउंड, सी विंग, विरार) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा परीचीत मित्र अजय नारायण कुंभार (ठाणे) याने मित्र सुरजसिंग कडे तीन हजार ५०० सोने आहे व तो स्वस्तात ते विक्री करणार असल्याचे सोनी यांना सांगितले. स्वस्तात सोने मिळणार असल्याने या आमिषाला सोनी हे बळी पडले व त्यांनी सुरजसिंगशी संपर्क साधल्यानंतर…

Read More

नाशिक : प्रतिनिधी  जिल्ह्यातील सामनगाव रोड भागात कार अडवून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने वाहनाचे नुकसान करीत जखमी युवकाचा मोबाईल व रोकड पळविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सचिन जगताप,रोशन ढोकणे,प्रविण जगताप,राहूल जगताप व अन्य दोन अनोळखी तरूण अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत विजय भरत धिवर (२५ रा.गोरेवाडी जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. धिवर शनिवारी (दि.९) रात्री सामनगाव रोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संजीवणी हॉस्पिटल भागात टोळक्याने त्यांची कार अडवून सचिन जगताप यास का मारहाण केली याबाबत जाब विचारला. धिवर हे त्यांना…

Read More

अनेक लोकांना नेहमीच हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरूम म्हणजेच ब्लॅकहेड्स काढण्यासाठी महिला कित्येक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या या ब्लॅकहेड्समुळे प्रत्येक महिला त्रस्त राहत असून ते दूर करण्यासाठी महागडे क्रिम्स लावून ते घालवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, नारळ, गाजर यांचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी स्क्रब बनवू शकता. परंतु, हे स्क्रब कसे बनवायचे ते जाणून घ्या… १. गाजराचा स्क्रब: तुमची त्वचा जर निस्तेज झाली असेल आणि त्यावर तुम्हाला तेज आणायचे असेल तर तुम्ही घरी बसल्याच गाजरापासून चेमिकॅल मुक्त स्क्रब बनवू शकता. यासाठी अगोदर गाजर किसून घ्या. त्यामध्ये दही, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण १०…

Read More

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांन चांगलेच हैराण केले असतांना त्यामुळे अनेकांचे उत्पन्नात मोठी घट देखील झाली आहे. वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजल्यामुळे त्याची पत खालावली आहे. या पावसाने भिजलेल्या कापसाला भाव देखील कमी दिला जात आहे. शेतकऱ्याला ६ हजार इतका दराने हा कापूस विकावा लागत आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला. त्याचवेळी वेचणी राहिलेल्या शेतासाठी घातक ठरला आहे. या पावसाने फुटलेला कापूस भिजला, काही ठिकाणी खाली पडल्याने प्रतवारी खराब झाली आहे. शिवाय हा कापूस भिजला असल्याने व्यापारी आता कमी भावात मागत आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या सोशल मिडीयाच्या युगात कोण कुणाच्या प्रेमात पडते कुणीही सांगू शकत नाही अशीच एक घटना घडली आहे. तीन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाचं आपल्याच सासूवर प्रेम जडलं. खरं तर सासू देखील त्याच्या प्रेमात पडली होती. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला होता, की त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं. अशातच पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं. मिळालेल्या माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन अपत्ये देखील झाली. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली व महिलांना टार्गेट करीत त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी पीडित महिला कटनी रेल्वे स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली. तिला उचाहराला येथे जायचं होतं. दरम्यान, आरोपी ट्रेनमध्ये…

Read More

कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत तिची हत्या करणाऱ्या तिचा प्रियकर भूपेंद्र गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत महिला ज्योती तोरडमध्ये आणि भूपेंद्र गिरी यांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र ज्योती भूपेंद्र सोबत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे संतापलेल्या भूपेंद्रने ज्योतीची लॉजमध्ये गळा आवळून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील तृप्ती लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणाहून स्केअर ट्यूब, चॅनल, स्टील रॉड असे साहित्य चोरी झाल्याची घटना शनिवार घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्टोअरकिपर नितीन धाईतडक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी अल्ताफ पठाण यांच्यासह पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एका भंगार व्यवसायिकाकडे लोखो रुपयांचे साहित्य तीन तरुणांनी विक्रीला आणल्याची माहिती…

Read More