चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय मुलीचा विनयभंग ५७ वर्षीय व्यक्तीनेकेल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात संतापाची भावना निर्माण झाली. चोपडा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात मुलीचे आई-वडील शेतात ऊसतोड करण्यासाठी गेले असताना अशोक देवराम पाटील (वय ५७) हा त्यांच्या घरी गेला. तिथे त्याने ७ वर्षीय मुलीशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. घडलेली घटना पीडित मुलीने घराबाहेर येऊन मोठ्या बहिणीला सांगितले असता मोठ्या बहिणीने मुलीच्या आई वडिलांना ती गोष्ट सांगितली. त्यावरुन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक पाटील याच्या विरोधात पोस्को, अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत व कलम…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जुना वाद उफाळून समतानगर परिसरात रविवारी झालेल्या अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना वाद तसेच मयताचे पुतणीसोबत होणाऱ्या विवाहाला मारेकऱ्याचा असणारा विरोध यातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर परिसरात रविवारी अरुण सोनवणे या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे याने रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्याचा चुलत भाऊ गणेश सोनवणे याच्यासोबत झालेला वाद मिटविण्यासाठी अरुण सोनवणे व त्याचा मित्र आशिष सोनवणे यांना सोनू आढाळे (रा. समतानगर) याने वंजारी टेकडी येथे बोलावले.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील जळके येथील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून त्याच्या वायर तोडून एटीएममधील तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळके येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एटीएम केंद्रामध्ये १० डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याच्या वायर तोडल्या. त्यानंतर एटीएममधील २४ हजार रुपये किमतीच्या एकूण तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक दौलत तिवारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असून अनेकांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा तरुणाचे स्वप्न साकार होण्याची बातमी समोर आली आहे. आता थेट समाजकल्याण विभागामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मोठी मेगा भरती सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या समाजकल्याण विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी संबंधित अधिकृत साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया 200 पदांसाठी सुरू आहे. 15 डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी jkssb.nic.in या साईटला भेट देऊन अर्ज करावा. 40 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा इंग्रजीमध्ये पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात राजस्थानातील राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण तापले होते. आता याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना चंदिगड येथून अटक केली. तिघेही चंदिगड सेक्टर 22 ए येथे लपून बसले होते. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत तिघांनाही पकडले. रोहित राठोड, नितीन फौजी, आणि उधम अशी तिघांची नावे आहेत. तिघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर जयपूरला नेण्यात आले. याआधी जयपूर पोलिसांनी शूटर्सची मदत करणाऱया रामवीरला अटक केली होती. तिघांमधील एक रोहित राठोड (गोदारा) हा गँगस्टर लॉरेन्स विष्णई गँगचा असून त्याने गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली…
मुंबई : वृत्तसंस्था मागील दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे प्रचंड फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यानंतर आता अधूनमधून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे एकामागून एक संकट उभे आहे. अवकाळी पावसानंतर वातावरण बदलले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम पिकांवर झालेला पाहावयास मिळत आहे. यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा आदी पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले असतांना आता अनेकांना थंडीचा तडाखा बसणार आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशासह राज्यातील वातावरणात अनेक बदल झाले. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट होते. मात्र आता अवकाळीचे सावट आता कमी झाले आहे. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. राज्यातील किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पहाटे गारठा, दिवसा काहीसा उकाडा आणि रात्री…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात बसमधील चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चोपडा येथून झुरखेडा येथे मुक्कामी जाणारी बस (एमएच२०/बीएल३५५६) ही बस धरणगाव बस स्थानकावरून निघाली. त्याच वेळेस जळगावकडून धरणगाव शहराकडे येणारा ट्रक (एमएच१८/बीजी११७५) च्या ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला धडक दिली. यात ड्रायव्हर जखमी झाला आहे. अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
जळगाव : प्रतिनिधी घरात सर्वजण झोपलेले असताना आरती पंकज चौधरी (वय ३१) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पेठ परिसरातील चौधरी कुटुंबीय शनिवार, ९ डिसेंबर रोजी रात्री झोपले असताना आरती चौधरी यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री हा प्रकार लक्षात आला. आरती यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी आक्रोश दिसताच केला. या विषयी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी शनिपेठ…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील तस्मिरा परवेझ सय्यद (वय सात वर्षे) या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आलेल्या नातेवाईकांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात डुप्लेक्स योजनेंतर्गत आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत…

