जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाळ एकनाथ शिंदे हे जळगाव शहरातील एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी आलेले असतांना त्यांना मारहाण करून पैसे काढून नेल्याप्रकरणी राकेश भीमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) व त्याचा साथीदार गोपाळ रवींद्र पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी गोपाळ शिंदे हे त्यांच्या मालवाहू रिक्षाने औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातून बळजबरीने तीन हजार ५०० रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी…
Author: editor desk
अमरावती : वृत्तसंस्था दोन वर्षांपूर्वी ज्यांनी हनुमान चालिसा पठणाला विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेचे हनुमानाच्या कृपेने दहन झाले आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. रामलल्ला व हनुमान यांच्या आशीर्वादानेच सर्वसामान्यांच्या मनातील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. ज्यांनी १४ दिवस राणा दाम्पत्याला जेलमध्ये टाकले, त्यांची सत्ता बदलवण्याचे काम मी केले, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यातील अमरावती येथे शनिवारपासून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता कथेला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, खोट्या आणि अहंकारी सत्तेची हवा…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील आशा कॉम्प्लेक्सजवळ शाळेतून घरी जात असताना १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याला ट्रकचा धक्का लागला. त्यात त्या मुलाच्या उजव्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोड येथून महामार्गाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ०४ बीयू ३५७२ हा आशा कॉम्प्लेक्स येथून जात असताना त्याच वेळेस काशीफ जफर शेख सय १३, रा. मुस्लिम कॉलनी) हा शाळेतून सायकलने घरी जात होता. ट्रकचालक फैजान खान अमन खान (वय २०, रा. वरदी, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने काशीफला धडक देत त्याच्या उजव्या पायावरून चाक नेले. यामुळे काशीफला गंभीर दुखापत झाली असून, त्यास पुढील…
अकोला प्रतिनिधी : मनीष खर्चे अकोला। विदर्भातील जंनतेला न्याय देन्यासाठी नागपुर करार करण्यात आला होता. त्या करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे घेणे आणि ते पण किमान ६ आठवड्याचे मात्र आजपर्यंतची अधिवेशने ही ६ते १०दिवसात आटोपली ती पण विदर्भातील मुद्यांवर न होता केवळ हुलड बाजी करण्यात येत आहे. यावर्षीच्या अधिवेशनात चिल्लर विषयांवर चर्चा करून अधिवेशन पार पाडले जात आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटिल व छगन भुजबळ यांच्यातच चर्चा करण्यात वेळ वाया घालवला गेला आहे. त्यामुळें विदर्भ मुद्यांवर चर्चा करण्यासाठी नागपुर करारा नुसार अधिवेशन घेतलें जात नसल्याचे आरोप करीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीपूर्वीच भाजप जोरदार कामाला लागली असून नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय २०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना विरोधकांवर टीकास्र सोडले. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होते, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आरक्षणशिवाय दुसरा मुद्दा नाही का? असे सुप्रिया सुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणाल्या होत्या, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना गेल्या काही वर्षापासून घडू लागल्या आहेत. अशीच एक थरारक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. गेल्या चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे आनंद…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच भंडारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीची बाजू मांडणाऱ्या महिला वकिलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरिता माकडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपीचे नाव महेश डोकरिमारे असे असून माझ्याविरुद्ध ते केस का लढत आहेस, असा जाब विचारून त्याने वकील सरिता माकडे यांच्यावर हल्ला केला. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सरिता या वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपी महेश याच्याविरुद्ध घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. सरिता या त्याच्या पत्नीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. याच रागातून आरोपीने हा हल्ला केला.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज पुन्हा एकदा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका – उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने मारहाण केली. याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उपहारगृहातील कामगार रुपेश आणि रमेश दुचाकीवरुन एनडीए रस्त्याने निघाले होते. यावेळी शिवणे परिसरात दोघांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘मी या भागातील दादा आहे. बाजूला चल मी तुला दाखवितो..’ अशी धमकी या दोघांना दिली. तसेच एकाने त्याच्याकडील कोयता उगारुन मारहाण…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात चोरी व दरोड्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील वाघजाळ या गावात सशस्त्र दरोडा पडला असून पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजार रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था ७ वर्षीय चिमुकला शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळता-खेळता एका खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी १० वर्षीय बहिणीने देखील भरलेल्या डबक्यात उडी मारी. मात्र, पाणी जास्त असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमध्ये घडली. समर्थ राहुल देशमुख (वय ८ वर्ष) आणि चैतली राहुल देशमुख (वय १० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या बहिण-भावंडाची नावे आहेत. या घटनेनं देशमुख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल देशमुख पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह वाळूज महानगरातल्या बजाजनगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये भाड्याने राहतात. त्यांना चैताली आणि समर्थ दोन मुले आहेत. चैताली चौथीत तर समर्थ…

