Author: editor desk

गेल्या काही वर्षापासून अभिनय क्षेत्रात सक्रीय असलेली समंथा रुथ प्रभूने आता सध्या अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. घटस्फोट आणि त्यानंतर – मायोसायटिस आजाराचं निदान यामुळे समंथा कठीण काळातून जात आहे. ब्रेक घेण्यापूर्वी ‘खुशी’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. सध्या ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. नुकतंच समंथाने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा तिने एका चाहत्याच्या प्रश्नावर दुसऱ्या लग्नाविषयी खुलासा केला. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ सेशनदरम्यान एका चाहत्याने समंथाला विचारले, ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?’ यावर तिने गुगल सर्चवरून दुसरे लग्न किती टक्के टिकू शकतं याची आकडेवारीच दाखवली. तिने याचा फोटो शेअर करत लिहिले, ‘आकडेवारी पाहता ही खूपच वाईट…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील काकणबर्डी येथील खंडेरायाच्या यात्रोत्सवात महिलेच्या छेडछाडप्रकरणी मारहाणीत तीनजण जखमी झाले आहेत. अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहराजवळील ३ कि. मी. अंतरावरील काकणबर्डी या उंच टेकडीच्या ठिकाणी खंडेरायाचे जागृत मंदिर आहे. याठिकाणी खंडेरायाची यात्रा मोठ्या जल्लोषात भक्तीभावाने सुरू झाली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भंडारा उधळत भाविक भक्तांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. या यात्रेत तरुण, तरुणी, स्त्री, पुरुष, नवीन विवाहित जोडपे यांनी भांडारा उधळत दर्शन घेतले. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एका तरुणाने महिलेकडे बघून अश्लील भाषा वापरली. त्यास महिलेच्या बहिणीच्या मुलाने हटकले असता त्या तरुणाने महिलेसह तिच्या बहिणीशी व मुलाशी वाद करून त्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कुसुंबा येथे घर भाडे देण्याच्या कारणावरून घर मालकाने शोभाबाई विनोद कोळी (३८) या महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवार, १७ डिसेंबर रोजी घडला. प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथे शोभाबाई विनोद कोळी (३८) या नीलेश दिलीप पाटील यांच्या घरात भाडे तत्वावर राहतात. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी – पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून घरमालक नीलेश पाटील विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गफूर तडवी करीत आहेत.

Read More

जामनेर : प्रतिनिधी पहूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात चारचाकी वाहनातील चालकासह तिघे ठार झाले. यात पैठण येथील दोन जणांचा समावेश आहे. हा भीषण अपघात मुक्ताईनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (४०), शेख समीर शेख नजीर (२०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण) आणि वाहनचालक साजन जगन बडोले (२५ रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे असतांना रात्री नातेवाईक जामनेरला पोहोचले. जामनेर येथील रेल्वे गेट व टाकळी गावाच्या मध्ये असलेल्या नागदेवता मंदिराजवळील वळणावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था शहरातील एका २५ वर्षीय तरुणीने विवाहाच्या दिवशीच गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड परिसरात रविवारी रात्री घरी हळदीचा कार्यक्रम होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सालिया (वय २५ वर्ष) तरुणीचे लग्ना आधीच तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी सालियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत परिसरातील तीन तरुण ब्लॅकमेल करत असल्याचं तिने म्हटलं आहे. सालियाच्या मृत्युला परिसरातील तीन तरुण जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. सालियाच्या वडिलांच्या आरोपानुसार, मुलीचे लग्न ठरल्यानंतर परिसरातील काही युवक तिला ब्लॅकमेलिंग करीत होते. आरोपींनी सालियाचे…

Read More

सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आले आहे. काही शेतकर्यांनी आपल्या शेतात नागर चालविले आहे तर काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास दूर झाल्याने शेतकरी चिंतेत आहे तर सांगली येथे दुष्काळी परस्थितीत टँकरने पाणी आणून जगावलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उध्वस्त करण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास १५ ते २० शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे. जवळपास १५ ते २० एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने शेजाऱ्यासोबत भांडण झाले असून या भांडणात शेजाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची तक्रार झाल्यानंतर पाेलिस संबंधित संशयित आराेपीस पकडण्यासाठी गेले असता त्याने दहशत निर्माण करण्यासाठी नांदेड पाेलिसांवर तलवार उगारली. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी स्वसरंक्षणासाठी संशयितावर गोळीबार करुन त्यास अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेरसिंघ गिल हा एका खून प्रकरणातून पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत त्याचे काही कारणाने भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ गेले असता शेरसिंघ त्यांच्यामागे तलावर घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हुदयविकाराचा झटका…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना घडत असतांना नुकतेच कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा लागला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता. या चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीत येथे काल रविवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना या कुटुंबावर…

Read More

लातूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आज सोमवार रोजी लातूर शहरात सकाळच्या सुमारास झालेल्या खासगी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनास्थळी नागरिकांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती. मिळालेली माहिती अशी कि, लातूर शहरातील सम्राट चौकात आज सकाळी आठ वाजता खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात घडताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामधील दुचाकीचा पुढचा भागाचे माठे नुकसान झाले हाेते. दरम्यान या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच मृत्यू झाला. अन्य एक युवक गंभीररित्या जखमी झाला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे, एनआयएने गेल्या वर्षी बक्षीस रकमेची यादी जाहीर केली होती. यामध्ये दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असून सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल आहे. त्याला विष देण्यात आल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तो २ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. त्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दाऊदला ज्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे, त्या हॉस्पिटलमध्ये दुसरा कोणताही रुग्ण नाही. फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य तिथे जाऊ शकतात. मुंबई पोलिसही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दाऊदच्या मुंबईतील नातेवाईकांकडून माहिती गोळा…

Read More