मुंबई : वृत्तसंस्था अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकत असून याच शाळेच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रम दि.१५ डिसेंबर शुक्रवारी होता या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वेगळ्या कारमधून येताना दिसले. वेगवेगळ्या कारमधून येणा-या कपलला पाहून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या विभक्त झाल्याची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या आता अभिषेक आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. ती त्यांच्यापासून वेगळी तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही ऐश्वर्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनफॉलो केले होते. ऐश्वर्या इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चनशिवाय इतर कोणालाही फॉलो करत नाही. अशा परिस्थितीत बच्चन कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज वर्तवला…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी अमोल संसारे (वय ३१) याने अल्पवयीन मुलीस आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अल्पवयीन मुलीने विरोध करत जोराने ओरडली असता अमोलने पीडितेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १५ डिसेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित अमोल संसारे याच्याविरुध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस…
अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील शिर्डी शहरातील नगर- मनमाड रोडनजीकच्या हॉटेलमध्ये साईदर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल किशोर वारुळे (वय 30, रा. खैरी निमगाव, हल्ली चाकण, पुणे) व निकिता किशोर वारुळे (वय २५) या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलचालक वसीम आयुब शेख (रा. शिर्डी) यांनी घटनेची माहिती शिडीं पोलिसांना दिली. मयताने डायरीवर वडिलांचा फोन नंबर लिहून ‘आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे लिहिले होते.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायल संदीप चौधरी रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा या गावात पायल संदीप चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी ४ वाजता उघडकीला आला. दरम्यान तरूणीने गळफास घेतल्याचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पुरुष व स्त्री जातीचे नवजात अभ्रक अनेक ठिकाणी बेवारस आढळून येत असतांना आज पुन्हा एकदा पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक पुरुष जातीचे नवजात अभ्रक कचऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोरील रस्त्यावर शुक्रवारी दि.१५ सकाळी आठच्या सुमारास हे अभ्रक सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक दिसले. त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात…
धुळे : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सुरु असून त्याची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच इंदोरहून कंटेनरमधून वाहतूक केला जात असलेला ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली. इंदोरहुन भिवंडीच्या दिशेने जात असलेला हा गुटख्याने भरलेला कंटेनर नेला जात असल्याची माहिती देखील कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालकाने दिली आहे. या कारवाईत जवळपास ४२ लाखाहुन अधिकचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील अट्रावल तसेच उत्राण, ता.एरंडोल येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (41, अट्रावल, ता.यावल) तर कासोदा हद्दीतील भिकन रमेश कोळी (35, उत्राण, ता.एरंडोल) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आगामी काळात आणखी काही उपद्रवींवर हद्दपारी तसेच स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अट्रावल, ता.यावल येथील पिंटू तायडे विरोधात यावल पोलिसात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात प्राणघातक हल्ला, दंगल, विनयभंग यासह अन्य गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयिताविरोधात एक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. त्यानंतरही कृतीत सुधारणा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागामधील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मन्याड धरणातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या गुप्त माहितीनुसार, सदर पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून धुळे येथील एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नागझिरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या नागझिरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात एका बाजूला अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या संदर्भात धानोरा गावाचे उपसरपंच अनिल भील यांनी जळगाव तालुका पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील समता नगरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चॉपरने वार करून अरुण बळीराम सोनवणे (वय २८) या तरुणाचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने तिसऱ्या संशयिताला अटक केली आहे. प्रवीण उर्फ दोघ्या पिंट्या शिरसाळे असे संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण सोनवणे सोबत प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. यातूनच अरुणचा खून झाला असल्याची माहिती समोर आली होती. संशयीत अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य…

