Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून अनेक घडामोडी सुरु असतांना देखील चाळीसगाव तालूक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्ववैम्यन्यातून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अापल्या घरावर गाेळीबार झाल्याचा बनाव करून खाेटी तक्रार दिली. तसेच त्यासाठी परराज्यातून गावठी कट्टा व दोन गोळ्याही विकत घेतल्याचा प्रकार तालुक्यातील भोरस येथे समाेर अाला आहे. याप्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून एकास अटक करण्यात अाली अाहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पहाटे फोन आला की, भोरस चौफुलीवर कैलास रघुनाथ पाटील यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कैलास पाटील यांनी सांगितले की,पहाटे ३…

Read More

पुणे : वृत्तसंस्था देशभरात ‘व्हॅलेंटाइन डे’चा मोठा उत्साह सुरु असतांना नुकतेच पुणे येथे अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका २४ वर्षीय युवकाने स्वतःच्या हातावर ब्लेडने मारून घेऊन स्वतःला जखमी केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (२४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर परिसरातील १६ वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार फिर्यादी मुलीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज याने फिर्यादी मुलीशी २०२३ पासून मैत्री करून तिच्याशी जवळीक वाढवली. तू आवडतेस माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो वारंवार देत होता. तिचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कॉलेजला जाते सांगून घरातून निघालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मुलगी ही सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्याच्यानंतर ती रात्रीपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्या बाबत कुठेही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनीपोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी खडकदेवळा येथून पाचोऱ्याकडे येत असताना जारगावजवळ मागून येणाऱ्या मिनीट्रकने कट मारीत दुचाकीस जोरदार धडक दिल्याने स्वार जागीच ठार झाल्याची घटना १४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन प्रकाश सूर्यवंशी पाटील (३२, खडकदेवळा बु,, ता. पाचोरा) हे दुचाकी (एमएच१९/सीए१९०४) ने पाचोऱ्याकडे येत असताना मागून येणाऱ्या मिनीट्रकने (एमएच१८/बीजी८५७८) कट मारून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार नितीन सूर्यवंशी पाटील हे पुढच्या चाकाखाली येत जागीच ठार झाले. यावेळी मिनीट्रक चालक हा फरार झाला. नितीन पाटील हे प्रकाश पाटील (खडकदेवळा) यांचे पुत्र असून सेवानिवृत्त सैनिक आहेत. ते पाचोरा येथे मुलांच्या शिक्षणासाठी राहत होते. घराकडे येत असताना हा अपघात झाला.…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहीगावातील यावल रस्त्यावरील बालाजी तोल काट्याच्या जवळ जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. येथून समीर तडवी, समशेर तडवी, अमीर तडवी, संदीप पाटील, फारुख तडवी, अकील तडवी व संतोष कोळी या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोटारसायकली, रोख रक्कम, असा एकूण २ लाख १० हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, दहीगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या संतोष कोळीकडून १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये २ लाख ३० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकालाही समान आणि मानाची वागणूक देणं, म्हणजे रामराज्य अशी संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली होती. या संकल्पनेला जागत माझ्या आमदारकीच्या पहिल्या वर्षात मी त्या पद्धतीने काम करत लोकांना उत्तरदायी राहण्याचा प्रयत्न केला, अशी भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. चार दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेल्या आ. तांबे यांनी बुधवारी पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारी ‘आरंभ’ या पुस्तिकेचे अनावरण केले. सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्या! सध्या राज्यात आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. अनुसूचित जाती व जमाती आणि…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी (प्रा. जितेश चव्हाण) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) नुकतीच दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन मूल्यांकन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) समितीचे अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.) समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू आदी मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेसह पुरुषास धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, व पुरुष गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साकेगाव बस स्टॅण्डच्या पुढे समांतर रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. या महिलेसह इसमाची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावातील थांबवली, अन्यथा अपघातग्रस्त महिलेसह प्रौढाला वाहनांनी चिरडले असते. या अपघातामुळे एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, वाल्मीक सोनवणे, विठ्ठल फुसे, विनोद पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणालेत. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोकड मिळून 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शहरातील चिंतामण मोरया नगर भागात घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चिंतामण मोरया नगर परिसरातील रहिवासी भाग्यश्री गोकुळ नन्नवरे (वय 32) यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात…

Read More