मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील तीन नेत्यांची भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी वर्णी लागलीय. यात मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण,अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या नव्या यादीत गुजरातमधील चार उमेदवारांना संधी देण्यात आलीय. तर महाराष्ट्रातील तीन नेत्यांना उमेदवारी देण्यात आलीय. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे मोदी सरकारमध्ये मंत्री पदावर असलेल्या नारायण राणेंना मात्र डावलण्यात आले आहे. जेपी नड्डांसह गोविंद भाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतसिंह सलाम सिंह परमार हे गुजरातमधून उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस १५ फेब्रुवारी आहे. तर अर्जांची पडताळणी १६ फेब्रुवारी रोजी पार पडेल. तसेच उमेदवारांना २० फेब्रुवारीपर्यंत आपला उमेदवारांना अर्ज…
Author: editor desk
जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील सरकारच्या विरोधात लढा देत आहे. त्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे…
सोलापूर : वृत्तसंस्था भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर 1 महामार्गावर भिगवणनजीक स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी आहेत. राधिका अजय मस्के (२२), राजू बाबूराव मस्के (५२, रा. अबिकानगर, चिंचवड, पुणे), बाबासाहेब दत्तात्रय धेंडे (४८, रा. ज्योतिबावाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चालक अजय राजू मस्के व त्यांची बहीण काजल राजू मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. मस्के कुटुंबीय हे पुण्याहून उस्मानाबाद येथे कामानिमित्त निघाले असता, हा अपघात झाला. यामध्ये नवविवाहिता राधिका मस्के हिचा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका परिसरातील फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीन व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली गावाजवळील बुधली धरण परिसरात असलेल्या विजयकुमार कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून ९ फेब्रुवारीला दोन हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशीन, १२०० रुपये किमतीची हँडकटर मशीन, १२०० रुपये किमतीचे वायरचे दोन बॉक्स चोरून नेले होते. अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खंडेरावनगर परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत दरवाजाला लाथा मारत असलेल्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडेरावनगरात योगेश हरीलाल सोनार हे वास्तव्यास असून, १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा एक जण दारूच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारत होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लाथा मारणारा आणखी दोन अनोखळी इसमांसह सोनार यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड : प्रतिनिधी शहरातील एका मंगल कार्यालयाकडे पायी जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याकडून ९ हजार रुपये लांबवल्याची घटना दि.१२ रोजी घडली. या चोरट्याने वृद्धाला मामा म्हणत कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा केला आणि रस्त्यात गाडी थांबवून त्यांच्याकडील रोकड हिसकावून नेली. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील हे वयोवृद्ध जोडपे मंगल कार्यालयाकडे जात होते. त्यात रस्त्यात त्यांना ३५ वर्षांच्या तरुणाने थांबवले आणि मामा, मी तुमचा भाचा आहे, अशी बतावणी केली आणि मंगल कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवले. काही अंतरावर एका निर्जन बोळीत थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दोघेही हताशपणे बसलेले पाहून एका व्यक्तीने चौकशी केली आणि त्यांना मंगल कार्यालयात पोहचवले. लग्नाच्या दिवशी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव रोडवरील अयोध्यानगर भागात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख ५९ हजारांचा ऐवज लांबविला. हा प्रकार दि. ११ फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी उमेश बाळू चिमणकर हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरातून १ लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ७५ हजार रुपये किमतीची मंगल पोत, साडेचार ग्रॅम सोन्याची कर्णफुले, दोन अंगठ्या, लॅपटॉप आणि २० हजार रुपये रोख असा दोन लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घरफोडीची माहिती कळताच, पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे,…
जळगाव : प्रतिनिधी गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती सूत्रांची दिली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरु होते. मात्र त्यात बदल होत असून दि. १५ तारखेचा दौरा पुढे ढकलण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या दौऱ्यानिमित्त ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचे सत्र सुरु केले होते. सोमवारी त्यांनी सागरपार्क येथील सभास्थळाची पाहणी देखील केली होती.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना कारमध्ये येवून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण, सचिन गायकवाड,अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले, संतोष निकुंभ उर्फ संता पेहलवान या आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सात आरोपी पैकी अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख व सचिन गायकवाड या दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा गेल्या काही वर्षापासून होती, मात्र आज हा पक्ष प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात झाला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर…

