भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझरखेडा, ता.भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना गुरुवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा कारखाना बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती आहे. सुमारे 50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुजित कपाटे व सहकार्यांनी गुरुवारी रात्री बनावट दारूच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारखान्यातील बनावट दारूचा पुरवठा विदर्भात झाल्याची दाट शक्यता आहे. विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, राजकिरण सोनवणे, एएसआय आय.बी.बाविस्कर, जवान सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड, नंदू नन्नवरे यांच्या पथकाने छापा टाकला. यात बनावट…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जळगाव शहरात गुरूवारी जाहीर सभा झाली. मात्र, या सभेला शहरातील पक्षाचे सात माजी नगरसेवक गैरहजर असल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात गुरुवारी रंगली होती. जळगाव लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगाव शहर तसेच ग्रामीण भागात तीन सभा घेतल्या. जळगाव शहरात झालेल्या सभेत शहरातील माजी महापौर नितीन लढा यांच्यासह सहा माजी नगरसेवक सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली. सभेचे नियोजन आणि यशस्वितेची जबाबदारी सुनील महाजन, विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील आणि शरद तायडे यांच्यासह जयश्री महाजन, ज्योती तायडे, राखी सोनवणे, प्रशांत…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसापूर्वीच एका माजी नगरसेवकावर गोळीबार करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवार गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बचावल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. पारनेर शहरातील एका हॉटेल नजीक हा प्रकार घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र गावठी कट्ट्यातून गोळी झाडता न आल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळले. या घटनेनंतर पठारेंनी व अन्य काही जणांनी संबंधितास पकडले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले…
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अडचणी वाढत असतांना आणखी एक अडचण वाढली आहे. पक्षाला लागलेली गळती निवडणुकीच्या तोंडावरही कायम आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर आता स्थानिक नेतेही पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हिंगोली लोकसभेचे संघटक व शिवसेनेचे नेते डॉ. बीडी चव्हाण आज शिवसेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या बी. डी. चव्हाण यांच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील महामार्गावर तेली पेट्रोल पंपाच्या परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. सुमारे काही किलोमीटरपर्यंत दुचाकी फरपटत नेली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मृतांची नावे जितेंद्र सावजी राठोड (वय ३४, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) व त्याचा मित्र प्रकाश उखा तोवर (रा. डोहरीतांडा, ता. जामनेर) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दवाखान्याच्या कामानिमित्त हे दोघे दुचाकीवरून वरणगावकडून भुसावळकडे येत असताना ट्रक (आर जे ११ जीए ९९०३) ने जोरदार धडक दिली. ट्रकने सुमारे एक या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. बुधवारी दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक श्यामबाबू (पूर्ण नाव…
नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथून अशीच एका अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन खरेदी करून गावी जात असतांना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धडगाव तालुक्यातील गोरंबा-लेंघापाणी घाटात घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेंघापाणी (ता. धडगाव) येथील पाडवी व चौधरी परिवाराने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले होते. गुरुवारी हे वाहन (क्रमांक एमएच २० वाय ६७९७) घेऊन सहाजण गावी लेंघापाणी येथे जात होते. घाटात तीव्र वळणावरचे…
मेष : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. वृषभ : आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. ज्या…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला असून एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे येरवडा कारागृहातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी १५ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावे असून शेरखान पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पठाण यांच्यावर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत असतांना १४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्यावर ट्वीट सडकून टीका केली. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने राणे पिता-पुत्रांविरोधात आंदोलने सुरू केली आहे. काही ठिकाणी रास्तारोको देखील करण्यात आलाय. धुळ्यात मराठा समाजाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राणे पिता-पुत्रांचे फोटो असलेले बॅनर जाळले आहेत. तसेच प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेधही केला आहे. यावेळी काही आंदोलकांनी ‘कोंबडी चोर’ असा उल्लेख करत घोषणाबाजी देखील केली. धुळे शहरातील स्वस्तिक चौकात राणे पिता पुत्रांच्या निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकवटले होते.…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु केले असून त्यांची तब्येत देखील बिघडलेली असतांना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री भुजबळ म्हणाले कि, मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची काय गरज आहे?, श्रेय घेण्यासाठी त्यांचे उपोषण सुरू आहे, तसेच मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही भुजबळ म्हणाले. मंत्री भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आधीपासून आहे. मागच्या दाराने कुणबी म्हणून त्यांना घुसवू नका. तसेच सगेसोयरेच्या माध्यमातून नको ती व्याप्ती वाढवू नका. याच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे.…

