Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात छोट्या मोठ्या कारणाने भांडण होत असतात, नुकतेच पुणे शहरात देखील एका परिवारात अशीच भांडणाची सुरुवात झाली मात्र हे भांडण इतक्या टोकाला गेले कि थेट पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील पत्र्याच्या चाळीत घडला आहे. याबाबत जखमी रमेश बबन ससाणे (वय-43 रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जया रमेश ससाणे (वय-34 रा. भवानी पेठ, पुणे) हिच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ‘सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी,’ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. दोघेही एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यात खेळीमेळीत संभाषण झाले. यातील एका संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी आरक्षणाच्या फडणवीस व सरकारमधील मंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण सध्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे-पाटील यांच्या दिशेने का? अशी चर्चाही…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी लग्न समारंभात महिलेची पर्स व कपड्याची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरातील जारगाव चौफुलीवरील रामदेवबाबा मंगल कार्यालयात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी रोजी भाचीच्या लग्नाला आलेल्या सुशांत वाल्मिक पाटील (एकविरा नगर, भडगाव) हे पत्नीसह कार्यालयात वधूच्या स्वतंत्र खोलीत बॅगा ठेवून कार्याचा आंनद घेत होते. वधूच्या बिदाईसाठी तयारी करण्यात मग्न असलेल्या मामीच्या ठेवलेल्या बॅग व पर्सवर पाळत ठेवत चोरट्यांनी पर्स व कपड्याची बॅग लंपास केली. पर्समधील मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने, ५ साड्या असे २० रोख रक्कम एकूण ७३ हजारच्या ६३ हजार किमतीचे दागिने व १० हजार ऐवजाची चोरी झाली आहे. सीसीटीव्ही तपासणी केली असता २ युवक रेकी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा ‘रुममेट’ शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतना नुकतेच फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयासमोर असलेल्या महालक्ष्मी सुपर शॉप मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील वस्तू व एक लाखाची रोकड असा १,९०,७९५ रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि. २४ च्या मध्यरात्री घडली. मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मॉलमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी नाना महाविद्यालयासमोर नीलेश राणे यांच्या मालकीचे महालक्ष्मी सुपर शॉप असून दि.२४ च्या मध्यरात्री सुपर शॉप शेजारी असलेल्या गुरुनानक कापड दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून दोन्ही दुकानाच्या मध्ये असलेला पत्रा वाकवून सुपर शॉपमध्ये प्रवेश करीत तेथील एक लाख ९०० रुपयाची रोख रक्कम,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्ग्ज्नानी  भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनानंतर रक्षा खडसेंनी आपली भूमिका बदलवत, आपण खडसेंना आवाहन केलेच नसल्याचे सांगत आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील डॉ.केतकी पाटील राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, एकनाथ खडसे हे देखील घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत.…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदायी आहे. कौटुंबिक समस्या आज सुटतील. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. काही धार्मिक कार्यक्रमाची आखणी करू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील, तुमचा उत्साह वाढेल, पण पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तुमचे अपूर्ण काम पूर्ण करा, अन्यथा कामाचा ताण वाढेल. हुशारीने वागा. आज गृहिणींचा घरामध्ये कामाचा ताण अचानक वाढेल, आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित कोणत्याही जुन्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही भावंडांशी बिघडलेले संबंध सुधारण्याचा विचार कराल. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता. रस्त्यावरून चालताना सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी झोपेतून उठून जात असतांना गच्चीवरून खाली पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शांताराम सुरवाडे वय ३० रा. करंजी पाचदेवळी ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे नितीन सुरवाडे हा तरूण आपल्या आईवडील पत्नीआणि एक मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून राहत्या घराच्या गच्चीवर जावून झोपला. रात्री ११ वाजता तो लघुशंकेसाठी खाली उतरत असतांना त्याचा तोल गेल्यानंतर गच्चीवरून…

Read More

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या, हा मुद्दा लावून धरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. आज जरांगे पाटील यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंकज उधास यांना 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक…

Read More