जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दि.२६ रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले, सुलतानी संकट तर आहेच पण कालचा अस्मानी संकटांने हाता तोडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यावर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ पंचनामा करावा असे आदेश देखील दिल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा तालुक्यात रात्री अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. तर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दि २६ रोजी रात्री तालुक्यातील तामसवाडी, बोळे, वसंतवाडी,…
Author: editor desk
धुळे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्याहनुमान गावाच्या परिसरात तब्बल ३ एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील आज कारवाईस्थळी पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत व अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. यावेळी बाजरी, ज्वारी पिकाच्याआड गांजाची लागवड आढळून आली. सुमारे २ ते ३ एकर क्षेत्रात ५ ते ७ फुट उंचीची…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी धीरज अरुण कानडे वय-३६ रा. आडगाव ता. एरंडोल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी धीरज अरुण कानडे हा फरार झाला होता. दरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धीरज कानडे हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील शहरासह ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोलद येथे माजी सरपंचाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला प्रेत आढळले. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथून दोन किलोमीटर अंतरावर कोलद नावाचं छोटंसं गाव आहे. कोलद येथील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर (वय 60 वर्षे) यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला होता. काही नागरिक तेथून जात होते, तेव्हा त्यांना या शेतरस्त्याच्या नालीत प्रेत आढळून आलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच असलेल्या…
जळगाव : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता ५ मार्च रोजी अकोला, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांच्या सभा होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी १ वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील अमित शाह यांच्या ५ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्याला दुजोरा दिला आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘क्लस्टर’…
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४ विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याचे नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, एन. एन. वाघ दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ,…
भुसावळ : प्रतिनिधी बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २७ रोजी सकाळी उघडकीस आली. इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समृद्धी पार्क अपार्टमेंटमधील मंडलेचा परिवार वास्तव्यास असून इदांत हा सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस सी. स्कूलमध्ये बारावीत शिकत होता. त्याने बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला आणि २७ रोजी त्याचा रसायनशास्त्राचा पेपर होता. मात्र, इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची पोलिस डायरीत नोंद आहे. मध्यरात्री एक वाजता इदांतच्या आईने त्याला कॉफी करून दिली होती. त्यानंतर त्याने सकाळी सहा वाजता अभ्यास करण्यासाठी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचार व विनयभंगाच्या अनेक घटना घडत असताना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे आरोपीच्या घरी घडला आहे. याबाबत विमाननगर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.25) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण चिजवाणी (वय-35 रा. गोल्डकोस्ट सोसायटी, मुंजाबावस्ती, धानोरी) याच्या विरोधात आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
पुणे : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याने अनेक पक्षाकडून मतदार संघात उमेदवार चाचपणी करण्याचे काम सुरु असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मंगळवार, २७ फेब्रुवारी शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत. अशातच मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला कार्यालयामध्ये…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये आता पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरु झाले असून त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, सरकार कोणालाही खुश करण्यासाठी खोटे आश्वासन देणार नाही. नोटिफिकेशनचा प्रश्न तुमच्या सर्वांच्या समोर आहे. त्यावर सहा लाख अक्षेप आले आहेत. त्यामुळे कोणालाही खुश करण्यासाठी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणार नसल्याचे देखील मुख्यमंत्री म्हंटले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भाषा योग्य नाही. हे करा, ते करा, ही भाषा योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आरक्षण टीकरणार…

