जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात महिलेच्या घरासमोर संशयित गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद) याने महिलेच्या पतीला बघून त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. २९ रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. महिला या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद, ता. जळगाव) या संशयिताने महिलेच्या पतीला बघुन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने महिलेला देखील अश्लिल शिवीगाळ करीत त्यांच्या विनयभंग केला. दरम्यान, महिलेने तात्काळ तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एकूण १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहाळ येथील शेतकरी भगवान काशिनाथ मोरे यांनी बँक ऑफ बडोदा चाळीसगाव शाखेतून ८० हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम व पासबुक घेऊन त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. ही पिशवी घेऊन दुचाकीवरून जात असताना रस्त्यात राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कॉर्नरजवळ त्यांच्या पाठीला खाज सुटू लागली. त्यांनी हातातील पिशवी भेळच्या गाडीवर बाजूला ठेवून पाणी घेतले. पाणी पिऊन झाल्यावर पिशवी आढळली नाही काही क्षणातच हा प्रकार घडल्याने आजूबाजूला शोध घेतला असता, पैशाची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची त्यांची खात्री झाली. दुसऱ्या घटनेतही असाच…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून सोहम गोपाळ ठाकरे (१८, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्यांना एमआयडीसी पोलिसांनी धुळे येथील देवपूर परिसरातून अटक केली आहे. दीक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे (२०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) याने गोळी झाडल्यानंतर तो दोन साथीदारांसह धुळे येथे आत्याच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी त्याला तेथूनच शनिवार, २ मार्च रोजी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगरातील सोहम ठाकरे व त्याच परिसरात राहणारा दीक्षांत उर्फ दादू सपकाळे या दोघांमध्ये वाद झाले होते. शुक्रवार, १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा त्याचे मित्र भैय्या राजपूत, ऋषिकेश वंजारी, सनी सोनवणे यांच्यासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने तीन जणांनी कंपनीचे व्यवस्थापक चेतन पुंडलिक सोनवणे (३२, रा. भोकर, ता. जळगाव) यांच्यासह दोन जणांना मारहाण केली. तसेच सोनवणे यांच्यावर धारदार चाकूने वार करत दुखापत केली. ही घटना १ मार्च रोजी कानळदा गावाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील चेतन सोनवणे हे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांनी महेश भरत सोनवणे (रा. कानळदा, ता. जळगाव) याला कंपनीतून काढून टाकले होते. व्यवस्थापक सोनवणे व त्यांचे मित्र विशाल बाबुलाल सोनवणे व सचिन देवीदास सोनवणे हे १ मार्च रोजी कानळदा येथील सरकारी दवाखान्याजवळून जात असताना महेश…
जळगाव : प्रतिनिधी नशेतील एका तरुणाने सांगितल्याप्रमाणे पोलिस पथक त्याच्या घरी एमडी ड्रग्ज शोधायला गेले खरे; मात्र त्याच्या घरात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. शहर पोलिसांनी ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात १ मार्च रोजी पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकों तेजस मराठे हे पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (२०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. त्याने एमडी ड्रग्जची नशा केली असून, ते घरात ठेवले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस त्याच्या घरी गेले असता, तेथे त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (२२) होता. घर झडतीत एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा मिळाला,…
मेष आज थोडी मेहनत केल्याने मोठा फायदा होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. लहान मुलांना भेटवस्तू मिळू शकतात, ज्यामुळे ते दिवसभर आनंदी राहतील. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवरून तुमच्यासाठी काहीतरी ऑर्डर करू शकता, आज तुम्ही दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करत राहाल. आज तुम्हाला तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला आहे. गायीला भाकरी खाऊ द्या, सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील. वृषभ आज तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. तुम्ही केलेले काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. या राशीचे अभियंते आज त्यांचा अनुभव योग्य दिशेने वापरतील.त्यांना आज चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला…
पुणे : वृत्तसंस्था पत्नीने फोनवर आय लव्ह यू म्हटले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीला लाकडी बांबूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील लेकटाउन सोसायटीच्या दुचाकी पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय महिलेने शुक्रवारी दि.१ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज रमेश खुडे (वय-28 रा. गोसावी वस्ती, कोथरुड) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरकाम करता. गुरुवारी सायंकाळी त्या लेकटाउन सोसायटीत राहणाऱ्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकी येत असतांना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ८ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती माहिती. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालक धास्तावले आहेत. जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, उद्धाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर शुक्रवारी (१ मार्च) अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल जामनेर तालुक्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पपई, कांदा, टरभूजसह गहू, हरभरा, दादर, मका पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. चोपडा तालुक्यातील पश्चिम भागातील वढोदा येथे १ मार्चला दुपारी ३.३० वाजता अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व वादळी वाऱ्याने अवघ्या १० ते १५ मिनिटात पपई, मका, केळी पिकांचे नुकसान झाले. वढोदा येथील छगन बळीराम पाटील या शेतकऱ्याचे कापणीवर आलेल्या ३०० पपईचा बाग उध्वस्त झाल्या असून पूर्ण बाग वाऱ्याने उन्मळून गेली आहे.…

