जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरून परिसरात जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमाराचा उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरून परिसरात संशयित आरोपी दादू सोनवणे याने जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजणक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या, पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पुढील कारवाईला सुरुवात करत आहे. दरम्यान गेल्या ३ दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून गावठी पिस्तूल हस्तगत करण्याची घटना समोर आले आहे. यातच आता…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर कारचे ऑइल खाली पडत असल्याचे सांगून कारमधून १ लाख ५० हजारांची रोकड ठेवलेली बॅग अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरेश्वर नगरातील रहिवासी गोपाळ काशीनाथ पलोड (वय ६७, ) यांचे दाणाबाजार परिसरात दुकान असून, व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून गोपाळ पलोड हे कारने घरी जाण्यासाठी निघाले. महात्मा गांधी रोडवरून जात असताना एका द्वाकीवरून आलेले २० ते २५ वयोगट असलेले दोन जण अचानक समोर आले.…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण तलाव परिसरातील जे. के. पार्क येथे गुरुवारी रात्री गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही जणांवर याआधी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सलग दुसन्या दिवशी गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावठी कट्टा घेऊन जे. के. पार्क परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता त्या ठिकाणी एका दुचाकीवर तीन जण उभे असल्याचे दिसून आले. पोलिस आल्यानंतर तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अमन रशीद सय्यद ऊर्फ खेकडा (२१, सुप्रीम कॉलनी) व दीपक लक्ष्मण तरटे (२६, नागसेन नगर) या दोघांना…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणे येथे चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची भागलपूर (बिहार) येथील तिघांनी फसवणूक केली. सुमारे २० हजाराची चांदी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार २५ रोजी घडला. पोलिसांनी संशयावरून विकास विष्णू शाह (भागलपूर) याला अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. संशयिताकडून चांदी गाळण्याचे साहित्य व सुमारे ५ हजाराची चांदी हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, हिंगणे येथील तीन महिला सकाळी ९च्या सुमारास घरासमोर बसलेल्या असताना तीन इसम त्याठिकाणी आले व भांडे घासण्याची पावडर घ्यायची आहे का, अशी विचारणा केली. महिला पावडर पाहत असताना त्यांनी सांगितले की, तुमच्या हातातील चांदीच्या पाटल्या…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. सत्ताधारी पक्षातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, महेंद्र थोरवे यांच्या बोलण्याची पद्धती राग आणणारी असल्याचे दादा भुसे…
जळगाव : प्रतिनिधी स्कूल व्हॅन व रिक्षाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता महाबळ रस्त्यावरच्या सुमंगल कार्यालयाजवळ घडली. या अपघातात रिक्षाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहेत. सुमंगल कार्यालयाजवळून रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. रिक्षाला वळणावर व्हॅनने समोरून धडक दिली, यात रिक्षाच्या एका बाजूचे नुकसान झाले. मात्र, व्हॅनच्या धडकेमुळे रिक्षामधील दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गालावर आणि कानावर इजा झाली होती तर विद्यार्थिनीच्या बोटाला दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर नेऊन तिच्यावर भुसावळ तालुक्यातील खेडी येथे अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १४ वर्षे अल्पवयीन मुलगी राहते. संशयित आरोपी हर्षल दीपक सोनवणे (वय २१, रा. भुसावळ) याने पीडित मुलीला १ जानेवारी रोजी जळगाव शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात नेले. त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीस आली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी बुधवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी हर्षल सोनवणे (वय…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौक परिसरात भुसावळ रस्त्यालगत बुधवारी गावठी कट्टा घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद हमीद ऊर्फ अण्णा (वय २४, रा. गेंदालाल मिल) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा मुगीर बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद हा युवक अजिंठा चौक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अर्शद शेखला ताब्यात घेतले. पोलिस नाईक सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या.…
पुणे : वृत्तसंस्था दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन केली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पोलिस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकूण ४०० भरारी पथके परीक्षा कालावधीत होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत, असेही गोसावी यांनी सांगितले. राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला १ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकप वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील अंतोरा गावचे काही रहिवासी कौंडण्यपूर येथून अस्थिविसर्जन करून परत येत होते. यावेळी तिवसा ते कुऱ्हा मार्गावर त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या मार्गावरील शेंदूरजना बाजारजवळ हे भरधाव पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातामध्ये गाडीमधील १५ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सध्या अपघातातील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

