मेष राशी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जमिनीशी संबंधित कोणतेही मोठे प्रकरण सोडवले जाईल. कार्यालयात नवीन उपक्रम घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज करिअरमध्ये काही बदल होणार आहेत, प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जोडीदारासोबत डिनरला जाल. वृषभ राशी आजचा दिवस नवीन बदल घडवून आणणार आहे. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला अचानक धनलाभ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. आज तुमचे आरोग्य तंदुरुस्त असणार आहे. या राशीच्या महिलांना आज त्यांच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळू शकते, जे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणात मध्यप्रदेशातील छनेरा गावामधून विष्णू पथरोड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याला भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुहेरी हत्याकांडप्रकरणी आता अटकेत असलेल्या संशयित आरोपींची संख्या ५ वर पोहोचली आहे. यापूर्वी राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया, करण पथरोड, गोपाल कोळी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान छनेरा गावात विष्णू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन विष्णुपथ रोड याच्यासह त्याच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी अंती दोन्ही नातेवाईकांना सोडून देण्यात आले आहे. तर विष्णू पथरोड…
मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण देशाला राज्यातील निकालाने मोठा धक्का दिला असून आता महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. पक्ष…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत. त्यात एनडीएचे सर्व 293 खासदार, राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. सविस्तर वृत्त असे कि, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या तयारीत असून त्यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. त्यानंतर आता आणखी दोन गावातील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंतरवाली सराटीनंतर आता वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालत तिचा हात पकडून विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बुधवार दि. ५ जून रोजी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सन २०२१ पासून गावात राहणारा निलेश हिरामण मराठे हा पिडीत मुलीला लग्नाची मागणी केली. त्यावर पिडीत मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ११ एप्रिल २०२४ रोजी घडली. त्यानंतर पिडीत तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने…
जळगाव : प्रतिनिधी खोट्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिलेले दागिने तारण ठेवून त्यावर २ लाख लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु ते दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सोने तारण ठेवणाऱ्यांना फायनान्स कंपनीने त्याच दागिन्यांवर जास्तीचे कर्ज देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवार दि. ६ जून रोजी सकाळी अकरा वाजता मनप्पूरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीपेठेतील मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीत हर्षल रविंद्र पेटकर (रा. दिग्रस, जि. यवतमाळ) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या कार्यालयात तेजस देविदास ठाकूर (रा. शाहूनगर) हा तरुण क्लर्क असून…
जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढोरे जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदावर रिक्त असलेल्या जागेवर सांगली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर ढेरे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारावा तसा अहवाल शासनास पाठवावा असे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छाप वाले यांनी सहा जून रोजी काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १९मार्च रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉ. विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाकडून पाच वेळा तारखा मिळाल्यानंतर विद्या गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राज्यशासनाच्या…
जळगाव : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंप्राळा येथील मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर (वय ४७, रा. पिंप्राळा) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा येथील तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात दि. १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर दि. २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी…
जळगाव : प्रतिनिधी रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अमळनेर येथील भावा- बहिणीचा वोल्खोव्ह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली. रशियात बुडून मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील तरुणांची संख्या आता तीन झाली आहे. जिया फिरोज पिंजारी (२०) व जिशान अशफाक पिंजारी (२०, दोन्ही रा. अमळनेर), अशी या भावा बहिणीची नावे आहेत. याच घटनेत मंगळवारी भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले (१९) याचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ते भोजन करण्यासाठी बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, व्होल्का नदीकाठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला. तेथे जिया ही नदीपात्रात उतरली. त्याबाबत जिशानने व्हिडिओ कॉल केला होता. अशफाक व त्यांच्या परिवाराने जियाला पटकन पाण्यातून बाहेर काढ,…

