मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंचविसावा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा समता व संविधानाच्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आणि सर्व जाती धर्माला…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे गावात मताधिक्य नसल्याच्या बातम्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या आहेत. मात्र सदर बातम्या ह्या खोट्या आकडेवारी वर आधारित व दिशाभूल करणाऱ्या आहेत. जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या गावनिहाय असलेले बुथ क्रमांक व बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारी वरून आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे या दोन्ही गावातील तिन्ही बूथ वर भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना 573 मतांचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसऱ्याच गावाच्या बूथ केंद्राची माहिती हे आमदारांच्या गावाची असल्याचा भासविण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रांनी केला आहे. विशेष…
नाशिक : वृत्तसंस्था बालपणापासून सोबत असलेल्या नाशिकरोड येथील दोन मित्रांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नाशिकरोड येथील गिते मळा परिसरात राहणारा सचिन करवर आणि म्हसोबा मंदिरामागील संकेत राठोड हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते. नुकतीच त्यांनी १२ वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सविस्तर वृत्त असे कि, सचिनचे वडील मालधक्क्यावर तर, संकेतचे वडील मिस्त्री काम करुन घरचा उदरनिर्वाह करत आहेत. दोन्ही मित्रांनी शनिवारी रात्री रेल्वेच्या वालदेवी नदीपुलावरील एका खांबाजवळ उभे राहून मुंबईवरून नाशिकरोडकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी आपल्या भ्रमणध्वनीवर भावपूर्ण श्रध्दांजली असा संदेश टाकला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून लोहमार्ग…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी ३.० सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल सायंकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोढरे येथील प्रेमी युगूलाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर मध्यरात्री मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसखाली उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. गंभीर जखमी तरुणावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तरुणीच्या मृत्यू प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर डाऊन प्लॉट क्रमांक 2 वर शुक्रवार, 7 रोजी रात्री…
मुंबई : वृत्तसंस्था तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई-बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक तरुणांना केले. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक राहा, अशा शब्दांत त्यांनी संयम राखण्याची विनंती केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यालाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावांत चुली न पेटवता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या घटना कानावर…
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या भाविकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल व पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशाराही शाह यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. शिव खेरी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ५३ जणांसह ही बस कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात…
यावल : प्रतिनिधी शहरात नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे जानकीराम शिवदास भिल (वय ३५) हा तरुण काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. ९ जून रोजी सकाळी यावल शेतशिवारात किरण चिंधू बोरोले यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी शेतात जाऊन पाहिले तर जानकीराम भिल याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी सहायक फौजदार विजय पासपोळ, हवालदार उमेश सानप, वसीम तडवी, मोहन तायडे हे दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना आणून विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विश्वनाथ भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद…
भुसावळ : प्रतिनिधी दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी विष्णू पथरोड (वाल्मीक नगर, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील पोखरणी (जि. हरदा) येथून अटक केल्याने आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. अटकेतील विष्णू पथरोडला शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर बुधवारी २९ मे रोजी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कारमधून जात असलेले माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी विनोद चावरिया, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, किरण कोळी व करण पथरोडला यांना अटक केली आहे. चारही…
जळगाव : प्रतिनिधी पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जॉधनखेडा येथील रोहिदास राठोड याने राहुल लवंग चव्हाण (रा. लालगोटा, ता. मुक्ताईनगर) याच्या पत्नीस पळवून नेले होते. त्याचा राग राहुल याच्या मनात होता. शनिवारी दि. ८ रोजी रोहिदास हा राहुल चव्हाण याला दिसला. तेव्हा त्याने रोहिदास याला पकडून हलखेडा येथील नरलाल पवार याच्या घरासमोर ओढत नेले आणि त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रोहिदास राठोड हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.…

