जळगाव : प्रतिनिधी रावेर लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांची विजयी घौडदोड सुरु आहे. तब्बल तीन लाख 88 हजाराचा लीड त्यांनी घेतला आहे.सुरुवातीला रक्षा खडसेंना तिकीट मिळणार की नाही अगदी इतपासून शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र भाजपने रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी दिली. त्यानंतर मतदारसंघात अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी बदलली जावू शकते असेही बोलले जात होते मात्र, रक्षा खडसे यांचे तिकीट बदलले गेले नाही. पंधराव्या फेरी अखेरीस तीन लाख 88 हजार 919 मतांचा लीड घेऊन रक्षा खडसे यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची विजयाची घौडदोड कायम ठेवलेली आहे. पंधराव्या फेरीपर्यंत खडसे यांना 4,15, 432 अशी मते मिळाली असून महाविकास…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्यात आली असून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु असतांना रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप सोडून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांनी सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रार करूनही दखल घेत नसल्याने उमेदवार आक्रमक झाले असून त्यांनी मतमोजणी देखील बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील टेबल नंबर 11 आणि टेबल नंबर 13 यांची व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची केली मागणी असून इव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग कमी कशी काय झाली. इतके दिवस चार्जिंग का कमी झाली नाही. मतदान झाले होते तर…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निकालात आज सकाळपासून रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळत असून जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मोठी गर्दी केली असून जल्लोष देखील सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकदा भाजपचा बोलबाला पहायला मिळत आहे. १३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 70,525 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,61,334 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसत असल्याचे चित्र समोर येत असतांना पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली. परंतु तो प्रयोग यशस्वी होत नसल्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची साथ धरली आणि लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. परंतु या रिंगणात पुणेकरांची पसंत वसंत मोरे ठरु शकले नाही. पुणेकरांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाच साथ दिल्याचे सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कलावरुन दिसूत येत आहे. वसंत मोरे…
जळगाव : प्रतिनिधी देशात लोकसभा मतमोजणीची धामधूम सुरु असून आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालात रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळाले. सकाळी ११ वाजता चौथ्या फेरती रक्षा खडसे ह्या ७४ हजार ९१२ मतांनी तर स्मिताताई वाघ ह्या ७१ हजार ८९३ मतांनी आघाडीवर पुढे असल्याचे दिसून आले. १३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 74,912 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,71,587 इतके मत…
मुंबई : वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज डेटानुसार, मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स 0.21 टक्क्यांनी वाढले आणि आणखी एक विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता होती. पण मतमोजणी सुरु होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 1257 अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये 192 अंकांची घसरण झाली आहे. एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर निफ्टी इंडेक्स सोमवारी 3.25…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशातील प्रत्येक नागरिकांचे लक्ष लागून असून जिल्ह्यातील दोन्ही जागेवर देखील चुरस बघायला मिळाली आहे. आज सुरू झालेल्या मतमोजणीत रावेरमधून रक्षाताई निखील खडसे तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा टपाली मते मोजण्यात आली. यानंतर ईव्हीएमची मते मोजण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आता सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. दरम्यान, आज पहिल्या फेरीत रक्षा खडसे 10,666 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 28249 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 17583 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले…
वाराणसी : वृत्तसंस्था देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला. स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही 642 दशलक्ष मतदारांचा जागतिक विक्रम केला आहे. ही आकडेवारी जी-7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपियन युनियन देशांमधील मतदारांच्या 2.5 पट आहे. यावेळी राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला.जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 68,000 पेक्षा जास्त देखरेख टीम, 1.5 कोटी मतदान केंद्र आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीसाठी सुमारे चार लाख…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नियमित खुनाच्या घटना घडत असतांना आज देखील अशीच एक खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर…

