चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले नाही ते जमा करावे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उद्या दि.२१ जून रोजी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात यावर्षी दुष्काळी घोषित असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही ते तत्काळ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र अशी मागणी करणारे माजी खासदार – आमदार यांनीच लाखोचे अनुदान आपल्या खात्यात पाडून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. माजी खासदार उन्मेष पाटील हे आधी आमदार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. जळगांव जिल्हा प्रशासन च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव,…
मुंबई : वृत्तसंस्था बीड लोकसभा निवडणुकित मोठ्या चर्चेची ठरली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभवाचा मोठा धक्का देणारा ठरलं असून आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. राज्यात…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलगी घरात असतांना यशवंत अनिल अहिरे (वय २०, रा. आमलेश्वर नगर, अमळनेर, – ह. मु. मेस्कोमाता नगर) हा तरुण अल्पवयीन मुलीच्या घरात शिरला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला तु मेरी जिंदगी है असे म्हणत तिच्याकडे वाईट नजरेने बघून – तिचा विनयभंग केला. ही घटना दि. १९ जून रोजी – रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १७ जून रोजी ही मुलगी घरात एकटी असतांना मेस्को माता नगरातील यशवंत अनिल अहिरे हा तरुण त्या…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चहार्डी ते वेले रस्त्यावर गुरुवारी चोपडा-भाई ही बस दुपारी १२ वाजेच्या दरम्यान डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटली. या अपघातात दोन प्रवाशांसह चालक, वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-भाई ही बस (एमएच१४ / बीटी २०८३) भाई येथून चहार्डी मार्गे चोपडा येथे परत येत असताना चहार्डी ते वेले गावादरम्यान कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुरूमाने भरलेला डंपर पुढे जात असताना बसचालकाने डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात साईडपट्ट्यांवर मुरूम असल्याने मुरूम खचून बसची एक बाजू पूर्ण खोल भागात गेली व बस विरुद्ध दिशेला खड्यात गेली. डंपर चालकाने साईड न दिल्याने बस उलटली असल्याची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळ ३०० रुपये न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संजय अकोलकर (वय २०, रा. मारुती मंदिरजवळ, शिवाजीनगर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी सकाळी १०:३० वाजता अक्षय अकोलकर हा रेल्वे स्टेशन रोडवरील दत्त मंदिराजवळील नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा गजू उर्फ गजानन विलास बाविस्कर (रा. शिवाजीनगर) हा तिथे आला. त्याने अक्षयकडे ३०० रुपये मागितले.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता, जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या.…
मेष राशी आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद घेऊन येणार आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास कराल. तुमच्या मुलाचे यश तुम्हाला आनंदित करेल, लोक तुमचे अभिनंदन करण्यासाठी तुमच्या घरी येतील. आज तुम्ही घरामध्ये एक छोटी पार्टी आयोजित करू शकता, ज्यामुळे घरातील लोकांना चांगले मनोरंजन मिळेल. आज तुमचे नशीब चमकेल कारण व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांची शिस्त त्यांना लवकरच यश मिळवून देईल, अभ्यास आणि काम यात संतुलन राहील. आज तुमचा लोकांबद्दलचा चांगला दृष्टीकोन तुम्हाला त्यांचा आवडता बनवेल. वृषभ राशी आज तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत कराल. तुमच्या…
अहमदनगर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघाची राज्यभर चर्चा सुरु असतांना नुकतेच नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटणार आहे असे विधान त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांचे आशीर्वादही घेणार असल्याचे म्हंटले आहे. याबाबत बोलतांना नीलेश लंके म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीमध्ये मी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीला उभा होतो. त्यांच्यावर आता टीका टिपण्णी करणे योग्य नाही. कारण आता लोकसभेचा निकाल लागला आहे. झाले गेले सोडून द्यायचे हे मी नुकतेच म्हंटले होते. विखे कुटुंबिय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिची येथे बुधवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कन्नूकुट्टी (49) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे. त्यात मिथेनॉल मिसळले जाते. या घटनेबाबत सीएम एमके स्टॅलिन यांनी x वर लिहिले: कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्याने लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणी गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 18 जून…

