जळगाव : प्रतिनिधी पैशांच्या कारणावरु न वाद होवून दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना दि. १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरातील अक्षय रुपेश साळुंखे (वय २२) हा तरुण मजूरी करतो. दि. १७ जून रोजी त्याच परिसरातील नितीन आनंदा भोई, जितू आनंदा भोई, आनंदा भोई या तिघांनी अक्षय साळुंखे याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जखमी अक्षय याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तर…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीवर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे. ही थरारक घटना तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे पतीचा अपघाती मृत्यूच्या बनाव तिने केला आणि नंतर खुनाचा हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सिताराम पवार (३५, रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मृत इसमाचे नाव आहे. तो पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होता. वंदना हिस बाळू हा दारु पिवून शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती. तसेच तिचे व…
जळगाव : प्रतिनिधी टेलिग्राम व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात नफ्याचे आमिष दाखवत विशाल रामराव सूर्यवंशी (२७, रा. चाळीसगाव) यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० मे ते १८ जून दरम्यान घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी नोकरी करणारे विशाल सूर्यवंशी यांना १० मे रोजी टेलिग्राम तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. यात विशाल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन रक्कम स्वीकारली. यात त्यांना एक लाख ५३ हजार ३२ रुपये परतावा दिला. त्यात विश्वास संपादन करून रक्कम स्वीकारतच राहिले. अशा प्रकारे एकूण १४…
वरणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या एका गावातील २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीवर अॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला बकऱ्या चारण्यास गेली असता, संशयित आरोपी अजय कैलास पाटील (वय ४०, रा. पिंपळगाव खुर्द) याने १९ रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या महिलेला अश्लील बोलला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह करीत आहेत. दरम्यान, आरोपीस लोकांनी जबर मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. त्यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जळगाव येथील तरुण ठार झाला. जळगाव येथून धुळ्याकडे येत असताना फागणे गावाजवळ बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी आहेत. मयत तरुणाचे जुनेर शेख (वय २५, रा. जळगाव) असे नाव आहे. जळगावमधील तांबापुरा भागात राहणारे जुनेर शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक हे २० ते २५ वयोगटातील तरुण दुचाकीने जळगावहून धुळ्याकडे ट्रिपल सीट येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळे दुभाजकावर जाऊन धडकली. यात जुनेर शेख याचा मृत्यू झाला. तर अरबाज आणि सलमान हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना विमानाचा पुढील बाजूचा लैंडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरून अपघात झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवार (दि. १९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लैंडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत…
मेष : जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. वृषभ : आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुमच्या…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दौऱ्यावर असतांना ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतले, त्यांच्या या कृती “विरोधात जळगावात भाजपने ‘निषेध आंदोलन’ केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ केतकीताई पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉ.राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजाताई पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखाताई कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारतीताई सोनवणे, महेश पाटील, नूर मोहम्मद, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, पवन खंबायत, नीलाताई चौधरी, पंकज जैन, नगरसेविका दीपमालाताई काळे , मंडळ अध्यक्ष संजय…
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आमदारांची जमावजमव सुरू केली आहे. त्यामुळे आमदारांच्या मतांच्या फाटाफुटीचा धोका सर्व पक्षांना असल्याने विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर केली या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया २५ जूनला सुरू होणार आहे, तर २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जाची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच विनोद चौहान यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांनाही तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी न्यायालयाला केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. कारण दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याच्या तपासासाठी हे महत्त्वाचे आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की विनोद चौहान यांनी गोव्यातील निवडणुकीसाठी अभिषेक बोईनपल्ली यांच्यामार्फत बीआरएस नेत्या के. कविता यांच्या स्वीय सहाय्यकाकडून (PA) २५ कोटी रुपये घेतले. तसेच या महिन्याच्या अखेरीस विनोद चौहान यांच्या…

