जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु होते. आता त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे. या दरम्यान जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाची धग देखील वाढत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला चढवला आहे. लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सराकर पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आापण…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी उच्च शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय प्रमोद करांडे (वय २७, रा. महाजन गल्ली, यावल) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले असता अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी…
मुंबई : वृत्तसंस्था उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभतू झालेले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची राज्यातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र काँग्रेसने निकम यांच्या नियुक्तीस तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने तातडीनं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲड. उज्वल निकम निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांना पराभूत केलंय. यांनतर आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते न्याय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव असून त्यांचे वय 25 वर्षे आहे. ते आंबेडकर नगर येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी राम मंदिर परिसरात गोळीबाराचा आवाज आला. सहकारी सुरक्षा कर्मचारी धावत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की जवानाला गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले. जवानाच्या मृत्यूने मंदिर परिसरात खळबळ उडाली. आयजी आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची चौकशी केली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून…
जळगाव : प्रतिनिधी कर्जाला कंटाळून किसन मोरसिंग राठोड (४६, रा. खेडगाव, ता. एरंडोल) या शेतकऱ्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. ही घटना १५ जून रोजी घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्री २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, किसन राठोड यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज वाढतच असल्याने कर्जाला कंटाळून त्यांनी १५ जून रोजी दुपारी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवार, १७ जून रोजी मध्यरात्री…
चोपडा : प्रतिनिधी अवैध पध्दतीने गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. वैजापूर ते बोरअजंटी रस्त्यादरम्यान चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाइ केली. या वेळी पिस्तूल, काडतूस, दुचाकी, मोबाइल असा जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १७ रोजी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरापासून १८ किमी अंतरावरील गावठी तेल्या घाटातून तुषार हनुमंत पवार (वय २०) व भरत सुखदेव जायगुडे (वय२२) हे दोघे दोन गावठी कट्टे नेताना पोलिसांनी त्यांना मध्यरात्री पकडले. हे दोघे आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याजवळील ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे, चार हजार रुपये…
चोपडा : प्रतिनिधी काल दि. १८/०६ /२०२४ रोजी अनेकांना विष बाधा झाल्याची उघडकीस आली. सोमवार रोजी १७/०६ /२०२४ रोजी कमळगाव येथे आठवले बाजार भरत असतो. त्या अनुशंगाने आसपासचे गावातील अनेक लोक हे बाजार निमित्ताने तेथे बाजारासाठी येत असतात. तेथे पाणीपुरीवाला हा कमळगाव येथे पाणीपुरी हातगाडीवर पाणीपुरी विकतो. दरम्यान तेथे आसपासच्या गाव चांदसनी, पिंप्री, मितावली, येथील अनेक लहान मुले, तरुण, वृद्ध अनेक्कानी पाणीपुरी खाली. ती खाल्याने सोमवार रोजी रात्री पर्यंत कोणालाही काहीच त्रास जाणवला नाही. सकाळी मंगळवार १० ते ११ सकाळच्या सुमारापासून अनेकांना त्याची लक्षणे जाणवू लागली. तसेच काहींना ताप, उलटी, मळमळ चक्कर येणे अशा प्रकारची जाणवत होती. दरम्यान खाजगी दवाखाना…
मेष राशी कुटुंबात एखाद्याच्या प्रगतीमुळे उत्सवाचे वातावरण असेल आणि मुलांना भेटवस्तू दिल्या जातील. मुलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण असेल. आज काही काळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. घराची व्यवस्था चांगली राहील. राजकीय-सामाजिक वर्तुळ विस्तारण्यास फायदा होईल. आज ज्येष्ठांसोबत वेळ घालवा, त्यांना आनंद मिळेल. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याने तुमचे मन उत्साहाने भरले जाईल आणि भविष्यातील योजनाही लवकरच पूर्ण होतील. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. घरामध्ये सुखसोयींशी संबंधित काही नवीन वस्तूंची खरेदी होण्याचीही शक्यता आहे. आज व्यावसायिक कामे मंद असतील, परंतु सध्याच्या परिस्थितीत संयम राखणे चांगले. आज नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. आज तुमचा जोडीदार तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यातच आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच अजित पवार गटात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत बोलतांना सुनील तटकरे यांनी या चर्चा अफवा असल्याचे म्हंटले आहे. सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ओबीसी आरक्षणामुळे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा करून…

