वडीगोद्री : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दोन्ही गटाकडून उपोषण सुरु आहे तर नुकतेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ यांनीच मराठा धनगर यांच्यातील वाद पेटवला. त्यांना आता सुट्टी नाही. त्यांचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलेन असे म्हटले आहे. ”छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. आम्ही…
सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा मतदार संघ प्रत्येक निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत असतो, आता पुन्हा एकदा साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात बोलतांना दंड थोपटले. कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असे त्यांनी म्हंटले आहे. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. ते म्हणाले, ”आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय?…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अवजड कंटेनरचा पुढील भाग खाली उतरून हा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना शिरसोली ते वावडदा दरम्यान गुरुवार, २० जून रोजी रात्री नऊ वाजता घडली. रात्री एक वाजता क्रेन आल्यावर कंटेनरला हटविण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथून एक कंटेनर (क्र. एमएच १९ झेड ४२०७) मुंबईकडे येथे जात होता. शिरसोली ते वावडदा दरम्यान हॉटेल फौजीजवळ चालकाला रस्त्यावरचा अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या खाली उतरला. पुढील चाक रस्त्याच्या खाली तर मागील भाग हा महामार्गावरच अडकला होता. त्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, दि. २२ जून रोजी सायंकाळी जळगाव शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत खान्देशातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री नाशिककडे विमानाने रवाना होतील. नाशिकमधील संस्था चालकांसोबत बैठक आटोपून ते दुपारी ४ वाजता अहमदनगर येथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून ते सायंकाळी ५:५० वाजता एमआयडीसीतील आदित्य लॉन्स येथे येतील. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्था चालकांसोबतची बैठक आटोपून ते पावणे आठ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
जामनेर : प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या १५ संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रुटमार्चही काढला. छर्रे असलेल्या बंदुकीतून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यातील संशयित सुभाष उमाजी भिल ३५) याला गुरुवारी भुसावळात अटक करण्यात आली. या आरोपीला ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी जमाव आधीच जामनेर येथील पोलिस ठाण्याबाहेर थांबून होता. मात्र, आरोपी जळगावला असल्याचे कळताच जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर…
मेष खर्च अधिक वाढणार असल्याने आज तुम्ही त्रस्त व्हाल. तुमच्या बजेटवर लक्ष द्या. पैशाचा वापर जपून करा. उधळपट्टी करू नका. घाईगडबडीत कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू नका. कुटुंब आणि मित्रांसोबत व्हॅकेशन्सचा प्लान करू शकता. काही लोकांना वारसा हक्काने चालत आलेल्या संपत्तीचा लाभ मिळेल. करिअरमध्ये मनाला वाटेल अशा गोष्टी घडतील. नव्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. पण तुमच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. रोज योग आणि मेडिटेशन करा. डायट हेल्दी ठेवा. वृषभ आज अत्यंत सावध राहावं लागणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लाइफमध्ये नव्या संधी मिळतील. अनेक आव्हाने पार पाडताना तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील आर्थिक वाद निवळेल. नवी मालमत्ता खरेदी…
मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते आ.एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गत काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या खांद्यावर भाजप एखादी मोठी जबाबदारी देईल अशी चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले. फडणवीस…

